शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

प्रत्येक १० पैकी २ शाळकरी मुलांना हायपरटेंशनची समस्या - स्टडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 11:35 IST

हायपरटेंशन म्हणजेच उच्च रक्तदाबाची समस्या केवळ तरुण आणि वयोवृद्धांनाच नाही तर याच्या जाळ्यात आता शाळकरी मुलंही येऊ लागली आहेत.

(Image Credit : www.repertoiremag.com)

हायपरटेंशन म्हणजेच उच्च रक्तदाबाची समस्या केवळ तरुण आणि वयोवृद्धांनाच नाही तर याच्या जाळ्यात आता शाळकरी मुलंही येऊ लागली आहेत. हरियाणा, गुजरात, गोवा आणि मणिपुरमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेतून हा खुलासा झाला आहे. त्यात सांगण्यात आलं की, प्रत्येक १० पैकी दोन शाळकरी मुलं-मुली हायपरटेंशनने पीडित आहेत. 

अभ्यासातून हे समोर आलं की, काही मुलांमध्ये उच्च रक्तदाब फार कमी असतो आणि हे जीवनशैलीमध्ये बदल करुन म्हणजेच नियमित व्यायाम, योग्य आहाराने ठीक केलं जाऊ शकतं. जाड मुलांमधील ही समस्या चटपटीत खाद्यपदार्थ कमी करुन आणि वजन कमी करुन दूर केली जाऊ शकते. जर असं केलं गेलं नाही तर स्थिती आणखी वाईट होऊ शकते आणि नंतर डायबिटीज, हार्ट डिजीज आणि स्ट्रोकसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. 

या चार राज्यांमधील प्राथमिक आणि वरिष्ठ माध्यमिक शाळांमधील १४, ९५७ विद्यार्थ्यांवर हा सर्व्हे करण्यात आला. २०१६ मध्ये AIIMS द्वारे जर्नल पीडियाट्रिक्समध्ये प्रकाशित एका दुसऱ्या सर्व्हेमध्ये देण्यात आलेल्या सूचनांनुसार, या सर्व्हेसाठी ५, १० आणि १५ वयोगटातील मुलांची तपासणी करण्यात आली.

यूरोपियन जर्नल ऑफ प्रिवेंटिव कार्डियोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाच्या लेखिका डॉ. अनीत सक्सेना यांनी सांगितले की, २३ टक्के मुलांमध्ये हायपरटेंशनची समस्या होती. हा अभ्यास AIIMS, गोवा मेडिकल कॉलेज, मणिपुरच्या नेहरु आयुर्विज्ञान संस्थान, मुंबईतील कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल आणि यूकेच्या यूनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोने एकत्र मिळून केला.

हरियाणा(26.5 टक्के), गुजरात(१५ टक्के), गोवा(१० टक्के) आणि मणिपुर (२९ टक्के) विद्यार्थ्यांमध्ये जास्त रक्तदाब आढळून आला. हायपरटेंशनमधील ही विविधता वेगवेगळ्या ठिकाणांवरील वेगवेगळ्या खाद्य संस्कृती आणि वातावरण यामुळे बघायला मिळाली.

डॉ. अनीता सक्सेना यांनी सांगितले की, शाळेतील मुलांच्या उच्च रक्तदाबाची नियमीत तपासणी केली गेली पाहिजे. जेणेकरुन त्यावर उपाय केले जातील. यासाठी शाळांनी आरोग्य कार्यक्रमांमध्ये ब्लड प्रेशरच्या तपासणीचा समावेश करावा. ज्या मुलांमध्ये हे प्रमाण जास्त असेल त्यांना वेळीच स्पेशलिस्टकडे घेऊन जावं. तसेच शाळेत निरोगी जीवनशैलीच्या सवयींबाबतही शिक्षण दिलं गेलं पाहिजे. जर या सूचना वेळीच पाळल्या गेल्या तर पुढे जाऊन डायबिटीज, हृदयरोग आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांना रोखण्यास मदत मिळू शकते. 

उच्च रक्तदाब हेच हृदयविकारांचं कारण

उच्च रक्तदाब हेच भारतीयांना होणाऱ्या हृदयविकाराचे मुख्य कारण असून, या पाठोपाठ मधुमेह, तंबाखूचे सेवन व हाय कोलेस्टरॉल याही बाबी हृदयविकाराला कारणीभूत ठरत आहेत. ‘आऊटपेशन्ट केअर’वरील अभ्यासात ही बाब दिसून आली आहे.

अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या पिनॅकल इंडिया कार्यक्रमात भारतीय नागरिकात वेगाने वाढणाऱ्या हृदयविकाराच्या कारणांचा अभ्यास करण्यात आला. संशोधकांच्या मते भारतात हृदयविकाराची शक्यता वाढत आहे; पण हृदयविकार असणाऱ्यांची काळजी किती व कशी घेतली जाते याची मात्र फारशी माहिती नाही. हे संशोधन जर्नल ऑफ अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रसिद्ध झाले. 

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगResearchसंशोधन