शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
4
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
5
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
6
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
7
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
8
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
9
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
10
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
11
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

'या' उपायांनी ब्रिटनने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरही केली मात; भारतातही अशाच पद्धतीनं कोरोनाला हरवता येणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2021 21:00 IST

CoronaVirus News : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येथे दररोज 60 ते 67 हजार रुग्ण आढळले होते. 20 जानेवारी रोजी येथे सर्वाधिक 1823 रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. परंतु ब्रिटनची दुसरी लाटही अत्यंत धोकादायक होती, ज्यामध्ये ब्रिटन यशस्वी झाला आहे. आज ब्रिटन हा जगातील अशा काही मोठ्या देशांपैकी एक आहे, जेथे जलद गतीनं संसर्ग कमी होऊ लागला आहे. ब्रिटन ज्या पद्धती अवलंबण्यात यशस्वी झाले. भारतानेही ब्रिटनच्या मार्गाचा अवलंब केला तर कोरोनाचा पराभव होऊ शकतो का? यााबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

ब्रिटनच्या दुसर्‍या लाटेमागील कारण नवीन कोरोना व्हेरिएंट बी 117 होते. कोरोना विषाणूच्या अनुवांशिक घटकांमधील बदलांमुळे या प्रकाराचा विकास होऊ लागला, जो 70 टक्के अधिक संसर्गजन्य होता. डिसेंबरपर्यंत, या व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्यांपैकी एकट्या लंडनचाच वाटा आहे. या प्रकारासह कोरोना विषाणू भारत, अमेरिका, आफ्रिका आणि अमेरिकेतही पसरला. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात येथे दररोज 60 ते 67 हजार रुग्ण आढळले होते. 20 जानेवारी रोजी येथे सर्वाधिक 1823 रुग्णांचा मृत्यू झाला.

दुसऱ्या म्यूटेशननंतर कोरोना झपाट्याने पसरल्यामुळे दुसरी लहर भारतात शक्तिशाली बनली आहे. ब्रिटनमध्ये दुसर्‍या लाटेला कारणीभूत ठरणारा प्रकार म्हणजे 23 म्यूटेशन्ससह कोरोना व्हायरस. तथापि, यावर नियंत्रण ब्रिटनने  ठेवण्यासाठी काही निर्बंधही लागू होते.

१) लॉकडाऊन

जानेवारीच्या सुरुवातीस येथे कडक राष्ट्रीय लॉकडाऊन केला गेला. दररोज 60 हजाराहून अधिक रुग्ण समोर येत होते आणि मृत्यूंमध्ये 20% वाढ झाली होती. या लॉकडाऊनच्या तीन महिन्यांनंतर आता दैनंदिन प्रकरणे कमी झाली असून ती 3 हजारांपेक्षा अधिक कमी झाली आहे.

२) वेगानं लसीकरण

लसीकरणाला गती देण्यासाठी सरकारने लसीचा दुसरा डोस घेण्याचा कालावधी एक महिन्यापासून तीन महिन्यांपर्यंत वाढविला. यामुळे  पहिल्या लसीच्या वेगवान विकासामुळे लोकांची संक्रमणशी लढण्याची क्षमता तात्पुरती विकसित करण्यात मदत झाली. येथे  63.02 लोकांना  लोकांना डोस मिळाला, ज्यामुळे मृत्यूची संख्या ९५ टक्क्यांपर्यंत कमी झाली.

३) रुग्ण पडताळणी

लंडनमधील सेंट थॉमस हॉस्पिटलचे एमडी डॉ. निशित सूद म्हणाले की, रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता येण्याची परिस्थिती टाळण्यासाठी रुग्णालयातील व्यवस्थापकांनी फक्त सर्वात गंभीर रूग्ण भरती करण्याचा नियम बनविला. कोणत्याही व्यक्तीला बेड किंवा व्हेंटिलेटर देण्यासारख्या गोष्टींचा निर्णय घेतल्यास त्याचे कडक निरीक्षण केले जाते. त्यांचे म्हणणे आहे की, 99 टक्के रुग्ण सौम्य लक्षणांसह आहेत. अशा स्थिती गंभीर स्थितीतील रुग्णांसाठी बेड्स राखून ठेवायला हवेत. 

४) नियमांचे पालन

कोविड प्रोटोकॉलचे अत्यंत काटेकोर पालन करण्यासाठी मास्क न वापरल्याबद्दल सरकारकडून जोरदार दंड आकारला जात आहे. मोकळ्या जागांवरही मुलांसह सहापेक्षा जास्त लोकांना एकत्र उभे राहण्यास बंदी घालण्यात आली होती. बार-रेस्टॉरंट इ. पूर्णपणे बंद होते. तसेच एकदा पॉझिटिव्ह अहवाल आला की संसाधन वाया जाऊ नये म्हणून पुन्हा अहवाल दिला जात नव्हता. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या