शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

उपवास करत असताना खाय खावे, काय खाऊ नये? वाचाल तर रहाल फायद्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 11:30 IST

Shrawan fasting : तुम्ही उपवास सोडता तेव्हा तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, तुम्ही काय खावं आणि काय खाल्लं तर तब्येत बिघडू शकते.

Fasting Diet Tips: श्रावणात बरेच लोक उपवास करतात. पहिल्यांदाच उपवास करणाऱ्या लोकांना हे माहीत नसतं की, उपवास सोडताना काय खावे आणि काय नाही. जेणेकरून तब्येत बिघडणार नाही. दिवसभर उपवास केल्यावर जेव्हा सायंकाळी तुम्ही उपवास सोडता तेव्हा तुम्हाला माहीत असलं पाहिजे की, तुम्ही काय खावं आणि काय खाल्लं तर तब्येत बिघडू शकते. हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

उपवास सोडताना काय खावं?

- दिवसभर काही न खाता-पिता राहिल्याने सायंकाळी उपवास सोडताना सगळ्यात आधी केळी खावीत. केळींमध्ये पोटॅशिअम असतं, ज्यामुळे हे खाल्ल्याने पोट जास्त वेळ भरून राहतं आणि लवकर भूक लागत नाही.

- उपवास सोडताना तुम्ही बडीशेप आणि ओव्याचं पाणी पिऊ शकता. याने ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची आणि गॅसची समस्या होणार नाही.

- उपवास सोडताना तुम्ही ताक, फ्रूट चाट किंवा साबूदाण्याची खीरही खाऊ शकता.

- उपवास सोडण्यासाठी बटाटे एक चांगला पर्याय आहेत. बटाटा खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं आणि एनर्जी मिळते.

- उपवास करताना बरेच लोक पाणी कमी पितात ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकतं. त्यामुळे उपवास सोडताना तुम्ही काकडी देखील खाऊ शकता.  याने शरीरात पाणी नियंत्रित राहील.

काय खाऊ नये?

- शरीर डिटॉक्स करण्यासाठी उपवास करत असाल तर जास्त तळलेले, भाजलेले, मैद्याचे आणि बेसनाचे पदार्थ खाऊ नका.

- उपवासादरम्यान जास्त गोड पदार्थ खाणं टाळावे. कारण रिकाम्या पोटी गोड खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल वेगाने वाढू शकते.

- श्रावणात किंवा कोणत्याही उपवासात पांढऱ्या मिठाचा वापर करू नका. याऐवजी सैंधव मिठाचा वापर करा.

- उपवासादरम्यान जास्त तळलेले, भाजलेले, मसालेदार पदार्थ खाऊ नये. याने अ‍ॅसिडिटी, अपचन किंवा बद्धकोष्ठता अशा समस्या होतात.

- फळं आणि हिरव्या भाज्या खाताना काळजी घ्या. कारण पावसाळ्यात फळं आणि भाज्यांवर किटाणू असतात. ज्यामुळे इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. फळं-भाज्या चांगल्या साफ करून सेवन करा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य