शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

पावसाळ्यात दही खावं की नाही? आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितला सल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 09:03 IST

Monsoon Food Tips: सामान्यपणे उन्हाळ्यात भरपूर लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दह्याचं भरपूर सेवन करतात. पण आता पावसाळ्यात दही खावं की नाही? असा प्रश्न काही लोकांना पडतो. 

Monsoon Food Tips: पावसाला काही भागांमध्ये नुकतीच सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेकांना असह्य उकाड्यातून थोडातरी दिलासा मिळाला आहे. पावसाळा आला की, सोबत काही आजारांनाही घेऊन येतो. त्यामुळे दिवसांमध्ये आरोग्याची खूप काळजी घेतली पाहिजे. सामान्यपणे उन्हाळ्यात भरपूर लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दह्याचं भरपूर सेवन करतात. पण आता पावसाळ्यात दही खावं की नाही? असा प्रश्न काही लोकांना पडतो. 

आयुर्वेदानुसार, वातावरण बदलताच आपल्याला आहारातही बदल करायला हवा. असं केलं नाही तर त्या आहाराचे गुण बदलतात आणि त्यांचे फायदे होण्याऐवजी नुकसान अधिक होतात. आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे की, पावसाळ्यात पोटातील पचन अग्नि कमजोर होते. अशात आहारात बदल करणं गरजेचं असतं. जे आपल्या शरीराला उष्णता देतील आणि पचनक्रियेत मदत करतील असेच पदार्थ खायला हवेत. पावसाळ्यात दही खावं की नाही याबाबत आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. 

पावसाळ्यात दही खावं की नाही?

डॉक्टर विलास शिंदे यांच्यानुसार, पावसाळ्यात दही खाणं टाळलं पाहिजे. या दिवसांमध्ये दही खाल्लं तर कफ तयार होतो, ज्यामुळे खोकला आणि सर्दी होते. सोबतच पचनक्रियाही योग्यप्रकारे होत नाही. पावसाळ्यात या पदार्थांचं सेवन केलं तर घसा खराब होतो, पोटात गडबड होते आणि तापही येऊ शकतो. डॉक्टर म्हणाले की, जर तुम्हाला या दिवसात दही खायचंय असेल तर त्यात साखर टाकून खावे. तसेच रात्री दही अजिबात खाऊ नये. असं केल्याने पोटासंबंधी समस्या होऊ शकतात.

पावसाळ्यात काय खावे?

आयुर्वेदानुसार, पावसाळ्यात शरीराचं तापमान योग्य ठेवण्यासाठी आलं, सुंठ, हींग, काळे मिरे आणि गव्हाच्या चपात्या यांचं सेवन करावं. पावसाळ्यात शरीरातील दोष दूर करण्यासाठी चटकदार आणि गोड पदार्थ खावेत. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य