शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर 'हा' आजार ठरणार जगातील सर्वाधिक मृत्यूंचे कारण; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2021 13:37 IST

कोरोनाची लागण झाल्यावर सेप्सिसचा धोका वाढत असल्याचं संशोधनातून नुकतच समोर आलं आहे. डब्ल्यूएचओने देखील सेप्सिस हा कॅन्सर आणि हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा अधिक धोकादायक असणार आहे, असा इशारा दिला आहे.

कोरोना व्हायरस केव्हा संपणार याबाबत कोणाकडेही ठोस उत्तर नाही. मात्र या व्हायरसचे दुष्पपरिणाम दिसून येत आहेत. विशेषत: ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे किंवा ज्यांना आधीच काही गंभीर आजार आहेत, त्यांना यीचा जास्त धोका आहे. कोरोनाची लागण झाल्यावर सेप्सिसचा धोका वाढत असल्याचं संशोधनातून नुकतच समोर आलं आहे. डब्ल्यूएचओने देखील सेप्सिस हा कॅन्सर आणि हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा अधिक धोकादायक असणार आहे, असा इशारा दिला आहे.

डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते, २०५० पर्यंत कॅन्सर आणि हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा सेप्सिसमुळे जास्त लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, सेप्सिस ही संसर्गाची सिंड्रोमिक रिएक्शन आहे आणि संसर्गजन्य रोग हे जगभरात मृत्यूचं प्रमुख कारण आहेत.

लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत की, २०१७ मध्ये जगभरात ४८९ दशलक्ष आणि ११ दशलक्ष केसेस या सेप्सिस मृत्यू पावलेल्यांच्या होत्या. हा आकडा जगातील मृत्यूच्या संख्येच्या २० टक्के आहे.

अफगाणिस्तान वगळता इतर दक्षिण आशियाई देशांच्या तुलनेत भारतात सेप्सिसमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचंही अभ्यासातून समोर आले आहे. गुरुग्रामच्या इंस्टीट्यूट ऑफ क्रिटिकल केयर अँड एनेस्थिसियोलॉजी, मेदांता द मेडिसिटीचे अध्यक्ष यतीन मेहता यांनी झी न्युज हिंदीला दिलेल्या माहितीत असे सांगितले की, "सेप्सिस २०५० पर्यंत कॅन्सर किंवा हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा जास्त लोकांचा बळी घेऊ शकतो. हा सर्वात मोठा किलर ठरणार आहे. भारतासारख्या विकसनशील देशात, अँटीबायोटिक्सचा अति वापर बहुधा उच्च मृत्यूचं कारण बनत आहे.''

डेंग्यू, मलेरिया, यूटीआय किंवा अगदी डायरिया सारख्या अनेक सामान्य आजारांमुळे सेप्सिस देखील होऊ शकतो. डॉ मेहता म्हणाले, अँटीबायोटीक्सचा वापर करण्याव्यतिरिक्त, जागरूकतेची कमतरता आणि तात्काळ मिळणाऱ्या उपचारांचा अभाव हे देखील या आजारमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याचं एक मोठं कारण आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना