शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
4
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
5
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
6
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
7
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
8
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
9
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
10
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
11
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
12
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
13
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
14
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
15
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
16
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
17
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
18
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
19
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
20
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर

Sadguru Diet: डाएट सुरु केलं की काही दिवसातच मोडतं? फॉलो करा सद्गुरुंच्या वेट लॉस टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 16:23 IST

Sadguru Diet Tips:फॅन्सी डाएट वजन घटवण्याचा दावे करतात, त्यामुळे उत्साहाच्या भरात आपण ते सुरु करतो पण त्यात सातत्य ठेवत नाही, म्हणून सद्गुरु सांगताहेत सोप्या टिप्स!

मधुमेह, रक्तदाब आणि हृदयविकार या आजारांच्या बरोबरीने घरातघरात थैमान घालत असलेला आणखी एक आजार म्हणजे कर्करोग! पूर्वीच्या काळातही कर्करोगाचे रुग्ण हाते, परंतु त्यांच्या संख्या शंभरात दोन किंवा तीन इतकी असे. आता हे प्रमाण उलट होऊन शंभरात दोन ते तीन जण निरोगी आढळतात. एकाएक हे गुणोत्तर व्यस्त होण्याचे कारण आहे, बदलती जीवनशैली आणि चुकीची आहारपद्धती! 

उदाहरणार्थ, प्रत्येकाच्या शरीरात कर्करोगाच्या पेशी असतात. परंतु त्या विखरलेल्या असतात. त्या एकत्र आल्या की त्यांची टोळी मोठा घातपात करते. त्या एकट्या दुकट्याने असतात, तेव्हा आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु त्या एकत्र आल्यावर त्या घालवण्यासाठी आपण पाण्यासारखा पैसा घालतो. कर्करोगाच्या पेशी वाढतात, कारण त्यांना गरजेपेक्षा जास्त अन्न पुरवले जात आहे. आता तर परदेशातील शास्त्रज्ञही सांगत आहेत, की रोज अधून मधून उपास करा. दोन जेवणांमध्ये सोळा तासांचे अंतर ठेवा. परंतु हजारो वर्षांपासून आपल्याकडे हेच सांगितले जाते. मात्र, आपण ती आहारपद्धती न अनुसरता कधीही, कितीही, कसेही खाऊन रोगांना आमंत्रण देतो. 

सद्गुरुंच्या सांगण्यानुसार दिवसातून दोन वेळा जेवण पुरेसे आहे. तेही सकाळी १० आणि सायंकाळी ६ वाजता. दिवसभरातून एकदाच जेवलात, तर तेवढेही जेवण पुरेसे आहे. ऊर्जानिमित्ती हा अन्नसेवाचा हेतू आहे. परंतु, जेवणानंतर तुम्हाला झोप येत असेल, तर ते अन्न तुमच्या आरोग्यासाठी योग्य नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. 

भूकेने कळवळणे आणि उपाशी राहणे, या दोन भिन्न स्थिती आहेत. भूकेने कळवळणारी व्यक्ती रागराग, चिडचिड करते. तर आपणहून उपाशी राहणारी व्यक्ती शरीर हलके झाल्याचे अनुभवते. शरीर हलके ठेवले, तर कामात लक्ष लागते. कामात गुंतून राहिल्यामुळे वारंवार खाण्याची सवय मोडते. जेवायच्या वेळी जेवण हे कर्तव्यासारखे पार न पाडता, भूक लागली की जेवणे इष्ट ठरते. अतिरिक्त जेवण अनावश्यक पेशींना खतपाणी घालते. उपाशी पोटी झोप लागत नाही, ही चुकीची मानसिकता आहे. आपणच हे मनाशी ठरवून टाकले आहे, की झोप लागणार नाही. न जेवताही दुपारी थोडा वेळ वामकुक्षी घेता आली पाहिजे. 

आहारपद्धतीत आणखी एक चांगली सवय म्हणजे जेवणाआधी अन्नाला स्पर्श करा. अन्न कसे आहे, ते जाणून घ्या. कोणते पदार्थ खायला हवेत आणि कोणते नाही, हे तुम्हाला स्पर्शाने जाणवले पाहिजे. जे पदार्थ नको, ते उष्टे करण्याआधीच परत करा. अन्नाची नासाडी करू नका. शक्यतो हाताने जेवा. कारण हाताच्या स्वच्छतेची काळजी तुम्ही घेऊ शकता. चमचे स्वच्छ असतील, याची खात्री नाही. 

ग्रहण करत असलेल्या अन्नाकडे कृतज्ञतेने पाहिले पाहिजे. अन्न केवळ पदार्थ नाही, तर तुमचे जीवन आहे. अनेकांना ते मिळत नाही, याची जाणीव ठेवली पाहिजे. जाणीवेचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. सवय म्हणजे जागरुकपणे काम करण़े  मनुष्य म्हणून जगण्याची सुंदरता यात आहे, की आपण प्रत्येक काम जागरुकतेपणे करू लागतो. जे लोक जागरुकतेने काम करतात त्यांचे तेज दिसून येते. 

अन्नाबद्दल सूज्ञपणा कमी होत चालला आहे. केवळ जीभेला बरे वाटत आहे म्हणून न खाता शरीराला आवश्यक घटक कसे मिळतील, याचा बारकाईने विचार केला पहिजे. आपल्या आहारशैलीवर आपली दैनंदिन झोप अवलंबून असते. चांगल्या झोपेसाठी योग्य आणि संतुलित आहार घेतला पाहिजे. मग कर्करोगच काय, अन्य कोणतेही रोग जवळही फिरकणार नाहीत.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सfoodअन्न