शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

जर कोलेस्ट्रॉलमध्ये झाला बदल तर होऊ शकतो मेंदुतून रक्तस्त्राव, जाणून घ्या याबाबत अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 16:07 IST

आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्याची कारणं कोणती आहेत आणि त्यामुळे लोकांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, याबद्दल माहिती देणार आहोत.

सध्याची बदलती जीवनशैली, (Lifestyle) मसालेदार पदार्थ, जंक फूड याचं सेवन यामुळे लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. धावपळीच्या युगात व्यायामाला पुरेसा वेळ देणं शक्य होत नाही. त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलचं (Cholesterol) प्रमाण वाढतं.

कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यामुळे होणाऱ्या समस्या आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे उपाय तुम्ही अनेकदा ऐकले असतील. तुम्हाला माहीत आहे का की कोलेस्ट्रॉलची पातळी फक्त वाढतच नाही, तर सामान्यापेक्षा कमीदेखील असू शकते. होय, काही कारणांमुळे आपली कोलेस्ट्रॉलची पातळी खूप कमी होऊ शकते. मुख्य म्हणजे ती जर 50 च्या खाली गेली तर कॅन्सर (Cancer) किंवा मेंदूतील रक्तस्त्राव म्हणजेच ब्रेन ब्लीडिंग (Brain Bleeding) यासारख्या गंभीर परिस्थिती उद्भवू शकतात आणि एखाद्याचा मृत्यूही होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्याची कारणं कोणती आहेत आणि त्यामुळे लोकांना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, याबद्दल माहिती देणार आहोत.

कमी कोलेस्ट्रॉलमुळे काय होतं?वेब एमडीच्या रिपोर्टनुसार, आपल्या रक्तातील एकूण कोलेस्ट्रॉलची पातळी 150 असावी. तर, बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी (LDL) 100 mg/dL असावी. ही सामान्य पातळी मानली जाते. रक्त तपासणीत कोलेस्ट्रॉलची पातळी ओळखता येते. जेव्हा रक्तातील एकूण कोलेस्ट्रॉलची पातळी 120 mg/dL च्या खाली येते आणि बॅड कोलेस्ट्रॉलची (LDL) पातळी 50 mg/dL च्या खाली पोहोचते तेव्हा कमी कोलेस्ट्रॉलची स्थिती निर्माण होते. या स्थितीला हायपरलिपिडेमिया (Hypolipidemia) किंवा हायपोकोलेस्टेरेरोलेमिया (hypocholesterolaemia) म्हणतात. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य असावी.

कमी कोलेस्ट्रॉलची कारणं काय?कोणताही दुर्मिळ कौटुंबिक विकार, कुपोषण, शरीरात फॅट अब्झॉर्ब न झाल्यास, अ‍ॅनिमिया (लाल रक्तपेशींची कमतरता), थायरॉईडची समस्या, यकृतासंबंधीत आजार, हिपॅटायटिस सी संसर्ग, गंभीर आजार किंवा दुखापत या कारणांनी माणसाच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते.

कोणते आजार होण्याचा धोका?कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्यापेक्षा कमी असणाऱ्या व्यक्तींना बऱ्याचदा तर यामुळे कोणतीही समस्या उद्भवत नाही. पण काही वेळा जेव्हा कोलेस्ट्रॉलची पातळी अत्यंत कमी होते, तेव्हा चिंता, डिप्रेशन, मेंदूतील रक्तस्राव आणि कॅन्सर यांसारख्या धोकादायक आजारांचा धोका वाढतो. गर्भवती महिलांमध्ये या समस्येमुळे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी, जन्माला येण्याऱ्या बाळाचं वजन कमी असणं, अशा समस्या उद्भवू शकतात. खरं तर या समस्या केवळ दुर्मिळ प्रकरणात घडतात. पण तरीही हे टाळण्यासाठी लोकांनी वेळोवेळी रक्त तपासणी करून घ्यावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावे, असं वैद्यकी तज्ज्ञांचं मत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स