शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिता?; होऊ शकतात 'या' समस्या, 'ही' आहे वापरण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 14:07 IST

तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं, परंतु ते वापरण्यापूर्वी योग्य पद्धत जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

आजकाल लोक आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. त्यामुळेच प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टीलची, काचेची, तांब्याची बाटली वापरतात. काही लोक तांब्याच्या बाटलीतील पाणी पिणं अधिक आरोग्यदायी मानतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, जर तुम्ही तांब्याच्या भांड्यात पिण्याचे पाणी साठवून ठेवत असाल आणि त्याचा जास्त वापर करत असाल तर तुमच्या पचनसंस्थेत समस्या निर्माण होऊ शकतात. हेल्थ कोच ल्यूक कॉटिन्हो यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. 

ल्यूक कॉटिन्हो यांनी सांगितलं की, तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं, परंतु ते वापरण्यापूर्वी योग्य पद्धत जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही ते वापरताना काही चुका करत असाल तर यामुळे तुमच्या पचनक्रियेमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात, शरीरात झिंकची कमतरता, पोटदुखी आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

वापरण्याची योग्य पद्धत

- तांब्याचं मोठं भांड, ग्लास किंवा बाटलीत गरम पाणी कधीही साठवू नका. त्यात साधं पिण्याचं पाणी ठेवा.

- लिंबूपाण्यासारख्या सायट्रिक गोष्टी तांब्याच्या भांड्यात ठेवू नका कारण त्याची रिएक्शन होऊ शकते आणि आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

- नारळ पाणी किंवा इतर कोणतेही पेय कधीही साठवू नका. काही काळ साधं पाणी साठवून ठेवू शकता.

अतिवापर टाळा

लोक तांब्याच्या बाटल्या वापरतात आणि दिवसरात्र पाणी पितात. पण असं केल्याने शरीरात तांब्याचे प्रमाण खूप वाढू शकते, ज्यामुळे इतर हानी होऊ शकते आणि ते शरीरासाठी विषारी ठरू शकतं. त्याचा जास्त वापर केल्याने शरीरातील झिंकची पातळी झपाट्याने कमी होऊ शकते, जी तुमची रोगप्रतिकार शक्ती, केस, त्वचा आणि हार्मोन्स चांगली ठेवण्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आहे.

किती वापर करणं योग्य आहे?

तांब्याच्या भांड्यात, बॉटलमध्ये ठेवलेलं पाणी प्यायल्यानंतर तुमच्या पोटात दुखत नसेल आणि ते तुम्हाला अनुकूल असेल तर तुम्ही एक ग्लास म्हणजे १५० मिली तांब्याच्या भांड्यातील पाणी दिवसभर पिऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. पण थोडीशीही अडचण आली तर वापर करणं टाळा. 

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स