शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिता?; होऊ शकतात 'या' समस्या, 'ही' आहे वापरण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 14:07 IST

तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं, परंतु ते वापरण्यापूर्वी योग्य पद्धत जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे.

आजकाल लोक आरोग्याबाबत जागरूक झाले आहेत. त्यामुळेच प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टीलची, काचेची, तांब्याची बाटली वापरतात. काही लोक तांब्याच्या बाटलीतील पाणी पिणं अधिक आरोग्यदायी मानतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, जर तुम्ही तांब्याच्या भांड्यात पिण्याचे पाणी साठवून ठेवत असाल आणि त्याचा जास्त वापर करत असाल तर तुमच्या पचनसंस्थेत समस्या निर्माण होऊ शकतात. हेल्थ कोच ल्यूक कॉटिन्हो यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. 

ल्यूक कॉटिन्हो यांनी सांगितलं की, तांब्याच्या भांड्यात पाणी पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं, परंतु ते वापरण्यापूर्वी योग्य पद्धत जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही ते वापरताना काही चुका करत असाल तर यामुळे तुमच्या पचनक्रियेमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात, शरीरात झिंकची कमतरता, पोटदुखी आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

वापरण्याची योग्य पद्धत

- तांब्याचं मोठं भांड, ग्लास किंवा बाटलीत गरम पाणी कधीही साठवू नका. त्यात साधं पिण्याचं पाणी ठेवा.

- लिंबूपाण्यासारख्या सायट्रिक गोष्टी तांब्याच्या भांड्यात ठेवू नका कारण त्याची रिएक्शन होऊ शकते आणि आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

- नारळ पाणी किंवा इतर कोणतेही पेय कधीही साठवू नका. काही काळ साधं पाणी साठवून ठेवू शकता.

अतिवापर टाळा

लोक तांब्याच्या बाटल्या वापरतात आणि दिवसरात्र पाणी पितात. पण असं केल्याने शरीरात तांब्याचे प्रमाण खूप वाढू शकते, ज्यामुळे इतर हानी होऊ शकते आणि ते शरीरासाठी विषारी ठरू शकतं. त्याचा जास्त वापर केल्याने शरीरातील झिंकची पातळी झपाट्याने कमी होऊ शकते, जी तुमची रोगप्रतिकार शक्ती, केस, त्वचा आणि हार्मोन्स चांगली ठेवण्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आहे.

किती वापर करणं योग्य आहे?

तांब्याच्या भांड्यात, बॉटलमध्ये ठेवलेलं पाणी प्यायल्यानंतर तुमच्या पोटात दुखत नसेल आणि ते तुम्हाला अनुकूल असेल तर तुम्ही एक ग्लास म्हणजे १५० मिली तांब्याच्या भांड्यातील पाणी दिवसभर पिऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. पण थोडीशीही अडचण आली तर वापर करणं टाळा. 

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स