शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

...म्हणून जमिनीवर बसून जेवणं ठरतं फायदेशीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 18:49 IST

सध्या आपल्या मॉर्डन लाइफस्टाइलमध्ये बुफे लंच किंवा डिनरची क्रेझ वाढताना दिसत आहे. पूर्वीच्या पंक्तीची जागा आता अगदी सहजपणे बुफेने घेतली असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही.

सध्या आपल्या मॉर्डन लाइफस्टाइलमध्ये बुफे लंच किंवा डिनरची क्रेझ वाढताना दिसत आहे. पूर्वीच्या पंक्तीची जागा आता अगदी सहजपणे बुफेने घेतली असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. अजूनही वयोवृद्ध लोकांकडून वाढत्या बुफेच्या क्रेझबाबत टोमणे ऐकायला मिळतात. त्यांचा नेहमी एकच आग्रह तो म्हणजे, बुफे म्हणजे उगाच पाश्चात्य संस्कृतीचा आणलेला आव आहे. कशाला हवीत ही थेरं? पंगतीतलं जेवणं म्हणजे अन्नपुर्णेनं तथास्तु म्हटल्यासारखं.... वाढप्यांनी आग्रहाने ताटात वाढावं आणि जेवणाऱ्याने तेवढ्याच आत्मियतेने ते पोटात ढकलून तृप्त व्हावं! असं आहे का तुमच्या बुफेत....? असो, पण अनेकदा या बुफेमध्ये उभं राहून ताट हातात धरून जेवावं लागतं किंवा मग अनेक ठिकाणी टेबल्सची व्यवस्था करण्यात आलेली असते. पण तुम्हाला माहीत आहे का? बुफे किंवा हॉटेलमध्ये टेबलवर बसून जेवण्यापेक्षा जमिनीवर बसून जेवण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. 

आपल्या भारतीय संस्कृतीनुसार जमिनीवर बसून जेवण्याची पद्धत आहे. अजूनही उभं राहून न जेवता जमिनीवर बसून जेवण्याचा सल्ला देण्यात येतो. जमिनीवर बसून जेवण्याचे आपल्या आरोग्यासाठीही अनेक फायदे आहेत. जमिनीवर मांडी घालून बसणं हा पद्मासनाचाच  एक प्रकार असून या आसनाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदेही आहेत. जाणून घेऊया  जमिनीवर बसून जेवण्याचे आरोग्यदायी फायदे...

- आपल्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकदा आपण जंक फूडचा आधार घेतो. त्यामुळे पोटाच्या समस्यांचाही सामना करावा लागतो. जमिनीवर बसून जेवल्याने पचन क्रिया नीट होते. जेवताना जेव्हा आपण घास खाण्यासाठी खाली वाकतो त्यावेळी पोटातील मांसपेशींची हालचाल होते आणि त्या सक्रिय होतात. त्यामुळे अन्न पचवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या अॅसिडचे प्रमाण वाढते आणि अन्न पचवण्यासाठी मदत होते. 

- जमिनीवर बसून जेवल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. जेवताना जेव्हा आपण मांडी घालून खाली बसतो. त्यावेळी आपला मेंदू शांत होतो. त्यामुळे जेवणावर लक्ष केंद्रीत होणं सोपं जातं. बसून जेवल्यामुळे पोटाला आणि मेंदूला पोट भरल्यानंतर समजणं शक्य होतं. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त खाण्यापासून वाचणं शक्य होतं. 

- जेव्हा मांडी घालून जमिनीवर बसतो. त्यावेळी पाठीचा मणका आणि पोटाच्या आजूबाजूचे स्नायू ताणले जातात. स्नायूंची हालचाल झाल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. 

- जमिनीवर बसून जेवल्याने आपलं ध्यान फक्त जेवणावरच राहतं. त्यामुळे मन शांत राहतं आणि शरीराला योग्य पोषक तत्व स्वीकारण्यास मदत मिळते. 

- जमिनीवर बसून जेवल्याने तारुण्य टिकून राहण्यास मदत होते. कारण मांडी घालून जेवल्याने पाठीचा मणका आणि पाठीच्या इतर समस्या होत नाहीत.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य