शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्या टिकवतात तारुण्य : वाचा कोणती भाजी कोणत्या रोगावर ठरते उपयोगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 14:57 IST

पालेभाज्या खायच्या म्हटल्यावर लहानांसोबत मोठ्यांच्याही कपाळावर आठ्या पडतात. पण आरोग्य टिकवण्यासाठी पालेभाजी खाणे अतिशय गरजेचे आहे. विशेषतः प्रत्येक ऋतूनुसार बाजारात येणाऱ्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे अनेक आजार दूर होऊ शकतात.

पुणे : पालेभाज्या खायच्या म्हटल्यावर लहानांसोबत मोठ्यांच्याही कपाळावर आठ्या पडतात. पण आरोग्य टिकवण्यासाठी पालेभाजी खाणे अतिशय गरजेचे आहे. विशेषतः प्रत्येक ऋतूनुसार बाजारात येणाऱ्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे अनेक आजार दूर होऊ शकतात. चला तर माहिती घेऊया या भाज्यांची . 

 पालेभाज्यातून मिळतात ही जीवनसत्वे : जीवनसत्त्वे व खनिजे तर कमी अधिक प्रमाणात मिळतात. त्यातही विशेष करून कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम व आयोडिनचा समावेश होतो. माठ, मेथी, शेवग्याचा पाला यामध्ये कॅल्शियम आढळते. स्नायूंच्या कार्याकरिता हाडे, दात बळकटीसाठी, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी कॅल्शियमची आवश्‍यकता असते. मेथी, माठ, आळू, कोथिंबीर, लाल माठ अशा अनेक पालेभाज्यांत लोह असते. रक्तक्षय असणाऱ्यांनी हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी पालेभाज्या अधिक खाणे आवश्‍यक आहे. 

 

पालक : क' व 'ब' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असल्याने शरीर तंदुरुस्त राहण्यास ते अधिक लाभदायी असतात. पालकमध्ये सल्फर, सोडियम, पोटेंशियम व अमिनो ऑम्लही असते.

 

मेथी :  शारीरिक शक्ती वाढते. या भाजीत  अ' जीवनसत्व, कॅल्शियम, प्रथिने तसेच काबौहायड्रेडचे प्रमाण अधिक असते.मेथीची भाजी ही वातनाशक असून खोकला व तापावर उत्तम औषध आहे.मेथीचे दररोजच्या आहारात सेवन केल्याने कंबरेचे दुखणे दूर होते. मात्र आम्लपित्त असणाऱ्यांनी दररोज मेथीचे सेवन टाळावे. 

 

कढीपत्ता : कढीपत्त्यामध्ये दुधाच्या चौपट कॅल्शियम असते. ऍसिड आणि कॅरेटिनचेही प्रमाण त्यात आढळत असल्याने केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता उपयॊगी आहे.कोलेस्टेरॉल शर्करा कमी करण्याचा गुण कोथिंबिरीप्रमाणे यातदेखील आहे. भाजीसाठी ओला मसाला बनवताना, कोणतीही चटणी बनवताना कढीपत्याचा भरपूर वापर करावा.

 

कोथिंबीर :कोथिंबीर शीत गुणाची असूनही पाचक व रुची टिकवणारी आहे. जळजळीत पदार्थ खाणा-यांना उष्णता, पित्त याचा त्रास होऊ नये याची काळजी कोथिंबीर घेते.कोथिंबिरीची पाने जठराला सशक्त करुन त्याला कार्यप्रवण करतात. जठराची जळजळ कमी करून तेथील अंतःस्त्राव वाढवतात.

 

अळू :अळूची भाजी शरीरात ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. विषारी प्राणी चावले असताना वेदना कमी करण्याकरिता अळूची पाने वाटून त्यांचा चौथा थापावा व पोटात रस घ्यावा.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सvegetableभाज्या