शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
5
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
6
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
7
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
8
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
9
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
10
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
11
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
12
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
13
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
14
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
15
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
16
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
17
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
18
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
19
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
20
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्या टिकवतात तारुण्य : वाचा कोणती भाजी कोणत्या रोगावर ठरते उपयोगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2019 14:57 IST

पालेभाज्या खायच्या म्हटल्यावर लहानांसोबत मोठ्यांच्याही कपाळावर आठ्या पडतात. पण आरोग्य टिकवण्यासाठी पालेभाजी खाणे अतिशय गरजेचे आहे. विशेषतः प्रत्येक ऋतूनुसार बाजारात येणाऱ्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे अनेक आजार दूर होऊ शकतात.

पुणे : पालेभाज्या खायच्या म्हटल्यावर लहानांसोबत मोठ्यांच्याही कपाळावर आठ्या पडतात. पण आरोग्य टिकवण्यासाठी पालेभाजी खाणे अतिशय गरजेचे आहे. विशेषतः प्रत्येक ऋतूनुसार बाजारात येणाऱ्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे अनेक आजार दूर होऊ शकतात. चला तर माहिती घेऊया या भाज्यांची . 

 पालेभाज्यातून मिळतात ही जीवनसत्वे : जीवनसत्त्वे व खनिजे तर कमी अधिक प्रमाणात मिळतात. त्यातही विशेष करून कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम व आयोडिनचा समावेश होतो. माठ, मेथी, शेवग्याचा पाला यामध्ये कॅल्शियम आढळते. स्नायूंच्या कार्याकरिता हाडे, दात बळकटीसाठी, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी कॅल्शियमची आवश्‍यकता असते. मेथी, माठ, आळू, कोथिंबीर, लाल माठ अशा अनेक पालेभाज्यांत लोह असते. रक्तक्षय असणाऱ्यांनी हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी पालेभाज्या अधिक खाणे आवश्‍यक आहे. 

 

पालक : क' व 'ब' जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असल्याने शरीर तंदुरुस्त राहण्यास ते अधिक लाभदायी असतात. पालकमध्ये सल्फर, सोडियम, पोटेंशियम व अमिनो ऑम्लही असते.

 

मेथी :  शारीरिक शक्ती वाढते. या भाजीत  अ' जीवनसत्व, कॅल्शियम, प्रथिने तसेच काबौहायड्रेडचे प्रमाण अधिक असते.मेथीची भाजी ही वातनाशक असून खोकला व तापावर उत्तम औषध आहे.मेथीचे दररोजच्या आहारात सेवन केल्याने कंबरेचे दुखणे दूर होते. मात्र आम्लपित्त असणाऱ्यांनी दररोज मेथीचे सेवन टाळावे. 

 

कढीपत्ता : कढीपत्त्यामध्ये दुधाच्या चौपट कॅल्शियम असते. ऍसिड आणि कॅरेटिनचेही प्रमाण त्यात आढळत असल्याने केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता उपयॊगी आहे.कोलेस्टेरॉल शर्करा कमी करण्याचा गुण कोथिंबिरीप्रमाणे यातदेखील आहे. भाजीसाठी ओला मसाला बनवताना, कोणतीही चटणी बनवताना कढीपत्याचा भरपूर वापर करावा.

 

कोथिंबीर :कोथिंबीर शीत गुणाची असूनही पाचक व रुची टिकवणारी आहे. जळजळीत पदार्थ खाणा-यांना उष्णता, पित्त याचा त्रास होऊ नये याची काळजी कोथिंबीर घेते.कोथिंबिरीची पाने जठराला सशक्त करुन त्याला कार्यप्रवण करतात. जठराची जळजळ कमी करून तेथील अंतःस्त्राव वाढवतात.

 

अळू :अळूची भाजी शरीरात ताकद वाढवणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी आहे. विषारी प्राणी चावले असताना वेदना कमी करण्याकरिता अळूची पाने वाटून त्यांचा चौथा थापावा व पोटात रस घ्यावा.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सvegetableभाज्या