शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

मार्ग सुदृढ मनाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 11:50 IST

स्वतःच्या बुद्धीची आणि भावनेची कुवत समजून कार्य करताना समाधानी राहून येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यास समर्थ म्हणजे मानसिक स्वास्थ्य.

- डॉ. चेतन लोखंडे/ डॉ. अदिती आचार्य-लोखंडे

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, तसंच सामाजिक दृष्टीनं व्यवस्थित आणि रोगमुक्त असणे. आज आपण समाजामध्ये शारीरिक आरोग्याबद्दल जनजागृती झालेली पाहतोय. परंतु मानसिक आरोग्याबाबत अजूनही उदासीनता दिसते. स्वतःच्या बुद्धीची आणि भावनेची कुवत समजून कार्य करताना समाधानी राहून येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यास समर्थ म्हणजे मानसिक स्वास्थ्य. परंतु आजही आपल्याकडे मानसिक आरोग्याबाबत बोलणं म्हणजे एक प्रकारचा सामाजिक कलंक मानला जातो. एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास असेल तर ते त्याची वाच्यता करत नाहीत. कारण त्याला भीती असते की, लोक काय विचार करतील? अशी माणसे त्याचा त्रास सहन करतात आणि आनंदी जीवनाला मुकतात. 

आपण आता 21व्या शतकात आहोत. 2020 साली भारताची लोकसंख्या 130 कोटींच्या पुढे असणार आहे. भारतासारख्या विकसनशील देशाची सर्वांत मोठी शक्ती आहे ती म्हणजे मानवी शक्ती. या मानवी शक्तीचे शिक्षणाच्या आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून विकासाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु ITच्या भाषेत म्हणायचं झालं तर माणसाचं शरीर हे जर त्याचं हार्डवेअर असेल तर त्याचं मन हे सॉफ्टवेअर आहे आणि बदलत्या काळात हे सॉफ्टवेअर अपडेट ठेवणं महत्त्वाचे आहे. अन्यथा सिस्टम हँग होऊ शकते.  आजच्या बदलत्या काळात सभोवताली माहितीचा पूर आलेला आपल्याला दिसतो. स्पर्धात्मक आयुष्य, बदलेली जीवनशैली, नाते संबंधांतील दुरावा, चंगळवादाची संस्कृती, डिजिटल आव्हाने यामुळे लोकांची उडालेली तारांबळ आपण पाहतोच आहोत. 

याचं उदाहरण द्यायचे झाले तर, माझ्या क्लिनिकमध्ये आलेला 19 वर्षीय मधू परीक्षेत एका विषयात नापास झाल्यानं आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो. 35 वर्षीय मनोज कामाच्या आणि आयुष्याच्या स्पर्धेत मागे पडल्यानं उदासीनतेच्या खोल दरीत गेलेला दिसतो.45 वर्षीय नीलमताई 20 वर्षांच्या आपल्या सांसारिक आयुष्यानंतर त्यांना नातेसंबंधांमध्ये दुरावा जाणवतो आणि संसारात ओलावा नसल्याचे जाणवून त्यांचे मन दुःखी होते. औद्योगिक क्रांतीनंतर माणसासमोरील आव्हाने बदलली आहेत. आता समस्या या मुख्यत्वे मनोसामाजिक (मानसिक आणि सामाजिक) आहेत. आपल्या विचारपद्धतीचा प्रभाव हा आपल्या मानसिक आरोग्यावर होत असतो. सदोष विचार पद्धती मानसिक समस्यांना निमंत्रणच असते. आपण जर शांत बसून आपल्या विचार पद्धतींचे विवेचन केले तर आपल्या लक्षात येईल की आपले विचार किती पूर्वग्रहदूषित असतात. सतत दुसऱ्याला जबाबदार धरणे किंवा दोष देणं, याकडे आपला कल असतो. या विचारांतून विविध भावना जन्मतात, त्यावर आपलं वर्तन ठरतं. त्यांचं नकळतपणे सवयींमध्ये कधी रूपांतर होतं हेसुद्धा आपल्या लक्षात येत नाही.

म्हणूनच आनंदी आयुष्य जगण्यासाठी निरोगी आणि मनाचं स्वास्थ्य अत्यंत महत्त्वाचे आहे. येणाऱ्या लेखात आपण जाणून घेणार आहोत, मन म्हणजे काय?, ते कसं काम करतं?, मनाच्या सवयी कशा तयार होतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स