शहरं
Join us  
Trending Stories
1
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
2
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
3
विशेष लेखः भाजप - यश कळसाला, शिस्त तळाला! पक्षाची संस्कृती ढासळली तर...
4
फेब्रुवारीची ही संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा...; आठपैकी सहा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार, सातवी पृथ्वी, ज्यावर तुम्ही असणार...
5
निष्ठेला शिक्षा, सत्तेचा दर्प! इतर पक्षातील इच्छुकांना उमेदवारी द्या, हे कोणत्या सर्वेक्षणातून समोर आले?
6
Numerology: 'या' जन्मतारखांसाठी २०२६ ठरणार 'गोल्डन वर्ष'; पैसा, प्रसिद्धी आणि लक्झरीने भरणार झोळी
7
“मराठी महापौरच हवा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही, ममदानी मुंबईत...”; कुणी केला दावा?
8
ट्रम्प यांचे हात निळे का पडले? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीचं गूढ वाढलं; खुद्द ट्रम्प यांनीच सांगितलं कारण!
9
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
10
तुमची पत्नी गृहिणी आहे आणि SIP चालवतेय, मग टॅक्स नक्की कोण भरणार? जाणून घ्या इन्कम टॅक्सचा महत्त्वाचा नियम
11
Stock Market Today: कमकुवत सुरुवातीनंतर शेअर बाजारात वाढ, निफ्टीत ३० अंकांची तेजी; FMCG इंडेक्स आजही घसरला
12
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
13
Astro Tips: २०२६ मध्ये प्रगतीचे शिखर गाठायचे आहे? शेंदरी हनुमानाची 'ही' उपासना सुरु करा!
14
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
15
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
16
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
17
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
18
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
19
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
20
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
Daily Top 2Weekly Top 5

मार्ग सुदृढ मनाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 11:50 IST

स्वतःच्या बुद्धीची आणि भावनेची कुवत समजून कार्य करताना समाधानी राहून येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यास समर्थ म्हणजे मानसिक स्वास्थ्य.

- डॉ. चेतन लोखंडे/ डॉ. अदिती आचार्य-लोखंडे

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, तसंच सामाजिक दृष्टीनं व्यवस्थित आणि रोगमुक्त असणे. आज आपण समाजामध्ये शारीरिक आरोग्याबद्दल जनजागृती झालेली पाहतोय. परंतु मानसिक आरोग्याबाबत अजूनही उदासीनता दिसते. स्वतःच्या बुद्धीची आणि भावनेची कुवत समजून कार्य करताना समाधानी राहून येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यास समर्थ म्हणजे मानसिक स्वास्थ्य. परंतु आजही आपल्याकडे मानसिक आरोग्याबाबत बोलणं म्हणजे एक प्रकारचा सामाजिक कलंक मानला जातो. एखाद्या व्यक्तीला मानसिक त्रास असेल तर ते त्याची वाच्यता करत नाहीत. कारण त्याला भीती असते की, लोक काय विचार करतील? अशी माणसे त्याचा त्रास सहन करतात आणि आनंदी जीवनाला मुकतात. 

आपण आता 21व्या शतकात आहोत. 2020 साली भारताची लोकसंख्या 130 कोटींच्या पुढे असणार आहे. भारतासारख्या विकसनशील देशाची सर्वांत मोठी शक्ती आहे ती म्हणजे मानवी शक्ती. या मानवी शक्तीचे शिक्षणाच्या आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून विकासाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु ITच्या भाषेत म्हणायचं झालं तर माणसाचं शरीर हे जर त्याचं हार्डवेअर असेल तर त्याचं मन हे सॉफ्टवेअर आहे आणि बदलत्या काळात हे सॉफ्टवेअर अपडेट ठेवणं महत्त्वाचे आहे. अन्यथा सिस्टम हँग होऊ शकते.  आजच्या बदलत्या काळात सभोवताली माहितीचा पूर आलेला आपल्याला दिसतो. स्पर्धात्मक आयुष्य, बदलेली जीवनशैली, नाते संबंधांतील दुरावा, चंगळवादाची संस्कृती, डिजिटल आव्हाने यामुळे लोकांची उडालेली तारांबळ आपण पाहतोच आहोत. 

याचं उदाहरण द्यायचे झाले तर, माझ्या क्लिनिकमध्ये आलेला 19 वर्षीय मधू परीक्षेत एका विषयात नापास झाल्यानं आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो. 35 वर्षीय मनोज कामाच्या आणि आयुष्याच्या स्पर्धेत मागे पडल्यानं उदासीनतेच्या खोल दरीत गेलेला दिसतो.45 वर्षीय नीलमताई 20 वर्षांच्या आपल्या सांसारिक आयुष्यानंतर त्यांना नातेसंबंधांमध्ये दुरावा जाणवतो आणि संसारात ओलावा नसल्याचे जाणवून त्यांचे मन दुःखी होते. औद्योगिक क्रांतीनंतर माणसासमोरील आव्हाने बदलली आहेत. आता समस्या या मुख्यत्वे मनोसामाजिक (मानसिक आणि सामाजिक) आहेत. आपल्या विचारपद्धतीचा प्रभाव हा आपल्या मानसिक आरोग्यावर होत असतो. सदोष विचार पद्धती मानसिक समस्यांना निमंत्रणच असते. आपण जर शांत बसून आपल्या विचार पद्धतींचे विवेचन केले तर आपल्या लक्षात येईल की आपले विचार किती पूर्वग्रहदूषित असतात. सतत दुसऱ्याला जबाबदार धरणे किंवा दोष देणं, याकडे आपला कल असतो. या विचारांतून विविध भावना जन्मतात, त्यावर आपलं वर्तन ठरतं. त्यांचं नकळतपणे सवयींमध्ये कधी रूपांतर होतं हेसुद्धा आपल्या लक्षात येत नाही.

म्हणूनच आनंदी आयुष्य जगण्यासाठी निरोगी आणि मनाचं स्वास्थ्य अत्यंत महत्त्वाचे आहे. येणाऱ्या लेखात आपण जाणून घेणार आहोत, मन म्हणजे काय?, ते कसं काम करतं?, मनाच्या सवयी कशा तयार होतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स