शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

मुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय? असं करणं ठरू शकतं घातक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 19:23 IST

मुलांचा सांभाळ करताना अनेकदा आई-वडिलांची दमछाक होत असते. त्यांचे हट्ट पुरवणं, त्यांना काय हवं नको ते पाहणं यामध्ये अगदी दमून जातात. अनेकदा मुलं खाण्याच्याबाबतीत हट्ट करतात किंवा खाण्याचा कंटाळा करतात.

मुलांचा सांभाळ करताना अनेकदा आई-वडिलांची दमछाक होत असते. त्यांचे हट्ट पुरवणं, त्यांना काय हवं नको ते पाहणं यामध्ये अगदी दमून जातात. अनेकदा मुलं खाण्याच्याबाबतीत हट्ट करतात किंवा खाण्याचा कंटाळा करतात. मग अनेक पालकांची कसरत सुरू होते. त्यांना खाऊ घालण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. कधी त्यांना काऊ-चिऊच्या गोष्टी सांगतात तर कधी मोबाईल, टिव्ही समोर बसवून जेवण भरवतात. एवढं करूनही मुलं बऱ्याचदा दाद देत नाहीत. अशावेळी नाइलाजाने पालक त्यांच्यावर दमदाटी करून किंवा प्रसंगी जबरदस्ती करून त्यांना खाऊ घालतात. पण तुम्हाला माहीत आहे का? मुलांना असं जबरदस्तीने खाऊ घालणं त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. असं आम्ही नाही तर एका रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून असं सिद्ध झालं आहे की, जर मुलांना जबरदस्तीने जेवण भरवत असाल तर ते त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या तोंडात घास कोंबून त्यांना जेवणं भरवत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, असं केल्यामुळे मुलांना फार कमी वयातच लठ्ठपणासारख्या गंभीर समस्येचा सामना करावा लागू शकतो. जे त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरते. 

मुलांच्या जेवणावर करण्यात आलेलं हे संशोधन 'पीडियाट्रिक सायकोलॉजी' नावाच्या एका जर्नलमधून प्रकाशित करण्यात आले होते. हे संशोधन दीर्घकालीन चालणाऱ्या अध्ययनाचा हिस्सा असून यातंर्गत अनेक वर्षांपर्यंत मुलांच्या मनोवैज्ञानिक तसेच मनोसामाजिक विकासावर अभ्यास करण्यात येतो. संशोधनानुसार, जर मुलांना ताटातील खाद्यपदार्थ संपवण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत असेल तर ते आपल्या शरीराचे संकेत ओळखू शकत नाहीत. तुमच्या धाकापोटी मुलं भूक नसतानाही ते संपवण्याचा प्रयत्न करतात.' त्यांची भूक वाढविण्यासाठी किंवा त्यांना योग्य आहार देण्यासाठी त्यांना स्वतःला ठरवू द्या की, त्यांनी किती जेवण जेवण्याची गरज आहे. 

संशोधनाचे परिणाम

नॉर्वे यूनिवर्सिटी ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये सहाय्यक प्रोफेसर सिल्जे स्टेनस्बेक यांनी सांगितल्यानुसार, 'काही मुलांचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय इतर मुलांच्या तुलनेमध्ये का वाढतं? याचा शोध घेण्यासाठी आम्ही त्यांच्या दैनंदीन जीवनाचा अभ्यास केला तसेच त्याची टीव्ही पाहण्याची वेळ आणि भूक या गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित केलं. 

स्टेनस्बेक यांनी सांगितल्यानुसार, संशोधनातून ही गोष्ट सिद्ध झाली की, त्या मुलांमध्ये बीएमआयची वाढ झाल्याचे दिसून येते ज्यांना जबरदस्तीने जेवणं संपवायला सांगितलं जातं. ते किती खातात हे त्यांच्यानुसार भूकेनुसार ठरवले जात नाही तर जेवण पाहून किंवा त्याच्या गंधानुसार ठरविले जाते. 

टॅग्स :Parenting Tipsपालकत्वHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य