शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

मुलांना जबरदस्तीने जेवण भरवताय? असं करणं ठरू शकतं घातक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 19:23 IST

मुलांचा सांभाळ करताना अनेकदा आई-वडिलांची दमछाक होत असते. त्यांचे हट्ट पुरवणं, त्यांना काय हवं नको ते पाहणं यामध्ये अगदी दमून जातात. अनेकदा मुलं खाण्याच्याबाबतीत हट्ट करतात किंवा खाण्याचा कंटाळा करतात.

मुलांचा सांभाळ करताना अनेकदा आई-वडिलांची दमछाक होत असते. त्यांचे हट्ट पुरवणं, त्यांना काय हवं नको ते पाहणं यामध्ये अगदी दमून जातात. अनेकदा मुलं खाण्याच्याबाबतीत हट्ट करतात किंवा खाण्याचा कंटाळा करतात. मग अनेक पालकांची कसरत सुरू होते. त्यांना खाऊ घालण्यासाठी अनेक उपाय करण्यात येतात. कधी त्यांना काऊ-चिऊच्या गोष्टी सांगतात तर कधी मोबाईल, टिव्ही समोर बसवून जेवण भरवतात. एवढं करूनही मुलं बऱ्याचदा दाद देत नाहीत. अशावेळी नाइलाजाने पालक त्यांच्यावर दमदाटी करून किंवा प्रसंगी जबरदस्ती करून त्यांना खाऊ घालतात. पण तुम्हाला माहीत आहे का? मुलांना असं जबरदस्तीने खाऊ घालणं त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. असं आम्ही नाही तर एका रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून असं सिद्ध झालं आहे की, जर मुलांना जबरदस्तीने जेवण भरवत असाल तर ते त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या तोंडात घास कोंबून त्यांना जेवणं भरवत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, असं केल्यामुळे मुलांना फार कमी वयातच लठ्ठपणासारख्या गंभीर समस्येचा सामना करावा लागू शकतो. जे त्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरते. 

मुलांच्या जेवणावर करण्यात आलेलं हे संशोधन 'पीडियाट्रिक सायकोलॉजी' नावाच्या एका जर्नलमधून प्रकाशित करण्यात आले होते. हे संशोधन दीर्घकालीन चालणाऱ्या अध्ययनाचा हिस्सा असून यातंर्गत अनेक वर्षांपर्यंत मुलांच्या मनोवैज्ञानिक तसेच मनोसामाजिक विकासावर अभ्यास करण्यात येतो. संशोधनानुसार, जर मुलांना ताटातील खाद्यपदार्थ संपवण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत असेल तर ते आपल्या शरीराचे संकेत ओळखू शकत नाहीत. तुमच्या धाकापोटी मुलं भूक नसतानाही ते संपवण्याचा प्रयत्न करतात.' त्यांची भूक वाढविण्यासाठी किंवा त्यांना योग्य आहार देण्यासाठी त्यांना स्वतःला ठरवू द्या की, त्यांनी किती जेवण जेवण्याची गरज आहे. 

संशोधनाचे परिणाम

नॉर्वे यूनिवर्सिटी ऑफ सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीमध्ये सहाय्यक प्रोफेसर सिल्जे स्टेनस्बेक यांनी सांगितल्यानुसार, 'काही मुलांचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय इतर मुलांच्या तुलनेमध्ये का वाढतं? याचा शोध घेण्यासाठी आम्ही त्यांच्या दैनंदीन जीवनाचा अभ्यास केला तसेच त्याची टीव्ही पाहण्याची वेळ आणि भूक या गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित केलं. 

स्टेनस्बेक यांनी सांगितल्यानुसार, संशोधनातून ही गोष्ट सिद्ध झाली की, त्या मुलांमध्ये बीएमआयची वाढ झाल्याचे दिसून येते ज्यांना जबरदस्तीने जेवणं संपवायला सांगितलं जातं. ते किती खातात हे त्यांच्यानुसार भूकेनुसार ठरवले जात नाही तर जेवण पाहून किंवा त्याच्या गंधानुसार ठरविले जाते. 

टॅग्स :Parenting Tipsपालकत्वHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य