शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

एक चम्मच देसी घी की किमत तुम क्या जानो? जाणून घ्याच, कारण तुमचं वजन होईल झटपट कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 17:17 IST

तुपाचा आहारात समावेश करावा का? रिकाम्या पोटी तूप खावं का, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उभे राहतात.

रोजच्या आहारात तूप (Desi Ghee/Clarified Butter) वापरणं हे आरोग्यासाठी घातक असल्याचं काही काळापूर्वी मानलं जात होतं. त्यामुळं अनेकांनी आपल्या आहारातून तूप वर्ज्य केलं होतं; मात्र अलीकडे पुन्हा गायीच्या तुपाचा किंवा म्हशीच्या तुपाचा वापर रोजच्या आहारात करावा असं सांगितलं जात आहे.

खरं तर भारतीय खाद्यसंस्कृतीत पूर्वीपासूनच तुपाचा, लोण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. उदाहरणार्थ, पंजाबमध्ये पराठ्यापासून ते सरसों का सागपर्यंत अनेक पदार्थांत भरपूर तूप वापरलं जातं. महाराष्ट्रात वरण किंवा डाळीच्या आमटीत चमचाभर तूप घातलं जातंच. आयुर्वेदातही (Ayuerveda) रिकाम्या पोटी तूप सेवन करण्याचा सल्ला दिला आहे; मात्र खरंच तुपाचा आहारात समावेश करावा का? रिकाम्या पोटी तूप खावं का, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उभे राहतात.

तुपामध्ये ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिड्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी असे घटक असतात. या पोषक तत्त्वांसह त्यात कॅलरीजचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे तूप भरपूर प्रमाणात खाल्ल्यास वजन (Weight) वाढू शकतं. १४ ग्रॅम तुपामध्ये १२३ कॅलरीज असतात दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी एक चमचा देशी तूप खाऊन (One Spoon Deshi ghee on Empty Stomach) करावी अशी शिफारस आहारतज्ज्ञ अवंती देशपांडे यांनी केली आहे. याचे नेमके काय फायदे आहेत, याची माहिती 'टाइम्स नाऊ'ने दिली आहे.

अवंती देशपांडे यांनी सांगतिलं, 'तूप हे लोण्याचं (Butter) शुद्ध रूप आहे. आयुर्वेदानुसार, तुपामुळे लहान आतड्यांची शोषण क्षमता सुधारते आणि आपल्या जठर मार्गात म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये आम्लयुक्त पीएच (Acidic PH) त्यामुळे कमी होतो. त्यामुळे अन्न शोषून घेण्याची आणि पचवण्याची आतड्याची (Intestine) क्षमता वाढते. तणाव किंवा झोप न लागणे, बैठ्या कामामुळे होणारे त्रास, अँटीबायोटिक्सच्या वापरामुळे आपल्या आतड्याचं आरोग्य बिघडतं.

दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी एक चमचा तूप घेऊन केल्यास आतड्याचं आरोग्य सुधारतं आणि हे त्रास दूर होतात. तसंच रिकाम्या पोटी देशी तूप खाल्ल्यानं त्वचेचं आरोग्यही सुधारतं. त्वचा नितळ, तुकतुकीत होते. पचनसंस्था स्वच्छ होते. आतड्याची कार्यक्षमता सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. भूक नियंत्रित राहते. चांगल्या बॅक्टेरियामुळे आतड्यांचं पोषण होतं. हाडं मजबूत होतात. तुपामुळे हृदयाचं आरोग्यही सुधारण्यास मदत होते. केसांचंही आरोग्य सुधारतं. त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठीही याचा फायदा होतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स