शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

एक चम्मच देसी घी की किमत तुम क्या जानो? जाणून घ्याच, कारण तुमचं वजन होईल झटपट कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 17:17 IST

तुपाचा आहारात समावेश करावा का? रिकाम्या पोटी तूप खावं का, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उभे राहतात.

रोजच्या आहारात तूप (Desi Ghee/Clarified Butter) वापरणं हे आरोग्यासाठी घातक असल्याचं काही काळापूर्वी मानलं जात होतं. त्यामुळं अनेकांनी आपल्या आहारातून तूप वर्ज्य केलं होतं; मात्र अलीकडे पुन्हा गायीच्या तुपाचा किंवा म्हशीच्या तुपाचा वापर रोजच्या आहारात करावा असं सांगितलं जात आहे.

खरं तर भारतीय खाद्यसंस्कृतीत पूर्वीपासूनच तुपाचा, लोण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. उदाहरणार्थ, पंजाबमध्ये पराठ्यापासून ते सरसों का सागपर्यंत अनेक पदार्थांत भरपूर तूप वापरलं जातं. महाराष्ट्रात वरण किंवा डाळीच्या आमटीत चमचाभर तूप घातलं जातंच. आयुर्वेदातही (Ayuerveda) रिकाम्या पोटी तूप सेवन करण्याचा सल्ला दिला आहे; मात्र खरंच तुपाचा आहारात समावेश करावा का? रिकाम्या पोटी तूप खावं का, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उभे राहतात.

तुपामध्ये ओमेगा थ्री फॅटी अ‍ॅसिड्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन ई, प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी असे घटक असतात. या पोषक तत्त्वांसह त्यात कॅलरीजचं प्रमाणही जास्त असतं. त्यामुळे तूप भरपूर प्रमाणात खाल्ल्यास वजन (Weight) वाढू शकतं. १४ ग्रॅम तुपामध्ये १२३ कॅलरीज असतात दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी एक चमचा देशी तूप खाऊन (One Spoon Deshi ghee on Empty Stomach) करावी अशी शिफारस आहारतज्ज्ञ अवंती देशपांडे यांनी केली आहे. याचे नेमके काय फायदे आहेत, याची माहिती 'टाइम्स नाऊ'ने दिली आहे.

अवंती देशपांडे यांनी सांगतिलं, 'तूप हे लोण्याचं (Butter) शुद्ध रूप आहे. आयुर्वेदानुसार, तुपामुळे लहान आतड्यांची शोषण क्षमता सुधारते आणि आपल्या जठर मार्गात म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये आम्लयुक्त पीएच (Acidic PH) त्यामुळे कमी होतो. त्यामुळे अन्न शोषून घेण्याची आणि पचवण्याची आतड्याची (Intestine) क्षमता वाढते. तणाव किंवा झोप न लागणे, बैठ्या कामामुळे होणारे त्रास, अँटीबायोटिक्सच्या वापरामुळे आपल्या आतड्याचं आरोग्य बिघडतं.

दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी एक चमचा तूप घेऊन केल्यास आतड्याचं आरोग्य सुधारतं आणि हे त्रास दूर होतात. तसंच रिकाम्या पोटी देशी तूप खाल्ल्यानं त्वचेचं आरोग्यही सुधारतं. त्वचा नितळ, तुकतुकीत होते. पचनसंस्था स्वच्छ होते. आतड्याची कार्यक्षमता सुधारते. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. भूक नियंत्रित राहते. चांगल्या बॅक्टेरियामुळे आतड्यांचं पोषण होतं. हाडं मजबूत होतात. तुपामुळे हृदयाचं आरोग्यही सुधारण्यास मदत होते. केसांचंही आरोग्य सुधारतं. त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठीही याचा फायदा होतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स