शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

भारतात लठ्ठपणाचा 200 वर्षाच्या ब्रिटिश शासनाशी काय आहे संबंध? रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2023 11:48 IST

Obesity In India Due To British Rule: लठ्ठपणासाठी चुकीची लाइफस्टाईल, चुकीचं खाणं-पिणं ही मुख्य कारणं मानली जातात. पण आता आणखी एक कारण समोर आलं आहे जे हैराण करणारं आहे.

Obesity In India Due To British Rule:  भारतात मोठ्या प्रमाणात लोक लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. ज्यामुळे डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट डिजीजचा धोका वाढतो. बरेच लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी ते जिम आणि डाएट फॉलो करतात. तशी तर लठ्ठपणासाठी चुकीची लाइफस्टाईल, चुकीचं खाणं-पिणं ही मुख्य कारणं मानली जातात. पण आता आणखी एक कारण समोर आलं आहे जे हैराण करणारं आहे.

लठ्ठपणाचं कारण आहे 200 वर्षाची गुलामी

एका रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, भारतात लठ्ठपणासाठी सगळ्यात जास्त जबाबदार साधारण 200 वर्ष चाललेलं ब्रिटिश शासन आहे. इंग्रजांनी 1757 ते 1947 पर्यंत देशावर राज्य केलं. यादरम्यान देशात अनेकदा दुष्काळ पडला आणि पूरही आले. इतिहासकारांनुसार, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नीतिमुळे भारत-पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये एकूण 25 मोठे दुष्काळ पडले ज्यात 6 कोटींपेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. 

एपिजेनेटिक्समधून धक्कादायक बाबींचा खुलासा

एपिजेनेटिक्स अशी स्टडी आहे ज्यात आपलं बिहेविअर आणि पर्यावरणाचा आपल्या डीएनएवर पडणाऱ्या प्रभावाची माहिती मिळते. एपिजेनेटिक्सच्या सायंटिस्टनुसार, 200 वर्षात अनेकदा दुष्काळ पडल्याने दक्षिण आशियातील लोकांच्या डीएनएमध्ये बरेच बदल झाले. याकारणाने अनेक पीढ्यांदरम्यान भारतीयांचं शरीर भूकेच्या अनुकूल झालं. याच कारणाने लठ्ठपणा, डायबिटीस, हाड ब्लड प्रेशर आणि हार्ट डिजीजचा धोका वाढला.

अमेरिकेच्या मर्सी हेल्थ-स्प्रिंगफील्ज रीजनल मेडिकल सेंटरचे एमडी डॉ. मुबीन सैय्यद यांनी आपला रिसर्च "The Susceptibility of South Asians to Cardiometabolic Disease as a Result of Starvation Adaptation Exacerbated During the Colonial Famines"मध्ये सांगितलं की, दुष्काळात जिवंत राहिलेल्या लोकांच्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये डायबिटीस आणि हाइपरग्लेसेमियाचा धोका दुप्पट वाढतो.

इंसुलिन सेंसिटिव्हिटी वाढली

डॉ. मुबीन सैय्यद यांच्यानुसार, एशिअन लोकांची बॉडी इन्सुलिन रेसिस्टेंट झाली आहे. यामुळे मसल्स, फॅट आणि लिव्हर सेल्स रक्तातील ग्लूकोजचं एब्जॉर्ब्शन करू शकत नाही आणि एनर्जीसाठी याचा वापर होऊ शकत नाही. ही मेडिकल कंडिशन डायबिटीस आणि लठ्ठपणाचं मोठं कारण ठरते.

टॅग्स :Healthआरोग्यIndiaभारतInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स