शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

भारतातील 77 टक्के लोकांना डाएटशी देणं-घेणं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 13:31 IST

जगभरात वेगान वाढणारी समस्या म्हणजे लठ्ठपणाची. त्यासाठी अनेक लोक डाएटचा आधार घेत असतात. आपण बऱ्याचदा पाहतो अनेक लोक आपलं डाएट पाळण्यासाठी अनेक उपाय करत असतात.

जगभरात वेगान वाढणारी समस्या म्हणजे लठ्ठपणाची. त्यासाठी अनेक लोक डाएटचा आधार घेत असतात. आपण बऱ्याचदा पाहतो अनेक लोक आपलं डाएट पाळण्यासाठी अनेक उपाय करत असतात. तसेच ते डाएट फ्रिक असतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्याला अनेक लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत असले किंवा डाएट कॉन्शिअस असल्याचे पाहायला मिळत असले तरी बऱ्याच लोकांना डाएट किंवा वजन कमी करण्याबाबत काहीच वाटत नाही. अशी लोकं डाएटऐवजी चांगल्या आणि चविष्ट खाण्याला पहिली पसंती देतात. त्याना आपलं वाढलेलं वजन आणि लूक यामुळे काही फरक पडत नाही. आता तुम्ही म्हणाल की, हे तुम्हाला कोणी सांगितलं? आमच्या ओळखीतले अनेक जण आपलं डाएट व्यवस्थित फॉलो करतात. तर हे आम्ही बोलत नसून, एका सर्वेमधून हा खुलासा करण्यात आला आहे. 

डाएटिंगऐवजी टेस्टी फूड खाणं पसंत करतात अनेक लोक 

ग्लोबल मार्केट रिसर्च कंपनी lpsosने काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे केला होता. ज्यामध्ये एका गोष्टीचा खुलासा झाला की, जर भारतातील लोकांना डाएटिंग आणि टेस्टी फूड यांमधील फक्त एकच गोष्ट निवडण्यास सांगितली तर, जास्तीत जास्त भारतीय टेस्टी फूडचीच निवड करतील. कंपनीच्या सर्वेनुसार जवळपास 77 टक्के भारतीय असे आहेत जे टेस्टी फूड आणि वजन नियंत्रणात ठेवणं यामध्ये टेस्टी फूडलाच प्राधान्य देतात. 

मिडल क्लास लोकांना डाएटिंगचे आकर्षण फार कमी

lpsosने हा सर्व्हे ऑगस्ट ते सप्टेंबर 2018मध्ये एक हजार शहरात राहणाऱ्या भारतीय नागरिकांवर केला होता. याबाबत कंपनीने असा दावा केला आहे की, हा सर्व्हे एका छोट्या समूहावर करण्यात आला असून त्यावरून संपूर्ण देशभरातील लोकांबाबत निष्कर्ष काढू शकत नाही. सर्व्हेतून मांडण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार, भारतातील मिडल क्लास वर्ग टेस्टी फूड खाण्यास जास्त प्राधान्य देतात आणि डाएटिंगबाबत ते फार कमी विचार करतात. 

आपल्या असलेल्या वजनामुळे संतुष्ट आहेत 74 टक्के लोक

या सर्व्हेची आणखी एक खास गोष्ट ही होती की, सर्व्हेमध्ये सहभागी झालेले 74 टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की, ते आपल्या सध्याच्या वजनामुळे फार संतुष्ट असून जर त्यांना चविष्ट पदार्थ आणि वजन कमी करणं यांपैकी एखाद्या गोष्टीची निवड करायला सांगितली तर ते चविष्ट पदार्थांची निवड करतील. तसेच 57 टक्के लोकांनी असंही सांगितलं की, ते आपलं वजन कमी करण्यासाठी कधी-कधी शरीरातील कॅलरी कमी करण्याचा प्रयत्न करतात. एवढचं नाही तर जवळपास 59 टक्के भारतीयांचं असं म्हणणं आहे की, जास्तीत जास्त डाएट प्लॅनचा त्यांना फायदाच होत नाही. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार