शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

भारतातील 77 टक्के लोकांना डाएटशी देणं-घेणं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 13:31 IST

जगभरात वेगान वाढणारी समस्या म्हणजे लठ्ठपणाची. त्यासाठी अनेक लोक डाएटचा आधार घेत असतात. आपण बऱ्याचदा पाहतो अनेक लोक आपलं डाएट पाळण्यासाठी अनेक उपाय करत असतात.

जगभरात वेगान वाढणारी समस्या म्हणजे लठ्ठपणाची. त्यासाठी अनेक लोक डाएटचा आधार घेत असतात. आपण बऱ्याचदा पाहतो अनेक लोक आपलं डाएट पाळण्यासाठी अनेक उपाय करत असतात. तसेच ते डाएट फ्रिक असतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्याला अनेक लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत असले किंवा डाएट कॉन्शिअस असल्याचे पाहायला मिळत असले तरी बऱ्याच लोकांना डाएट किंवा वजन कमी करण्याबाबत काहीच वाटत नाही. अशी लोकं डाएटऐवजी चांगल्या आणि चविष्ट खाण्याला पहिली पसंती देतात. त्याना आपलं वाढलेलं वजन आणि लूक यामुळे काही फरक पडत नाही. आता तुम्ही म्हणाल की, हे तुम्हाला कोणी सांगितलं? आमच्या ओळखीतले अनेक जण आपलं डाएट व्यवस्थित फॉलो करतात. तर हे आम्ही बोलत नसून, एका सर्वेमधून हा खुलासा करण्यात आला आहे. 

डाएटिंगऐवजी टेस्टी फूड खाणं पसंत करतात अनेक लोक 

ग्लोबल मार्केट रिसर्च कंपनी lpsosने काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे केला होता. ज्यामध्ये एका गोष्टीचा खुलासा झाला की, जर भारतातील लोकांना डाएटिंग आणि टेस्टी फूड यांमधील फक्त एकच गोष्ट निवडण्यास सांगितली तर, जास्तीत जास्त भारतीय टेस्टी फूडचीच निवड करतील. कंपनीच्या सर्वेनुसार जवळपास 77 टक्के भारतीय असे आहेत जे टेस्टी फूड आणि वजन नियंत्रणात ठेवणं यामध्ये टेस्टी फूडलाच प्राधान्य देतात. 

मिडल क्लास लोकांना डाएटिंगचे आकर्षण फार कमी

lpsosने हा सर्व्हे ऑगस्ट ते सप्टेंबर 2018मध्ये एक हजार शहरात राहणाऱ्या भारतीय नागरिकांवर केला होता. याबाबत कंपनीने असा दावा केला आहे की, हा सर्व्हे एका छोट्या समूहावर करण्यात आला असून त्यावरून संपूर्ण देशभरातील लोकांबाबत निष्कर्ष काढू शकत नाही. सर्व्हेतून मांडण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार, भारतातील मिडल क्लास वर्ग टेस्टी फूड खाण्यास जास्त प्राधान्य देतात आणि डाएटिंगबाबत ते फार कमी विचार करतात. 

आपल्या असलेल्या वजनामुळे संतुष्ट आहेत 74 टक्के लोक

या सर्व्हेची आणखी एक खास गोष्ट ही होती की, सर्व्हेमध्ये सहभागी झालेले 74 टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की, ते आपल्या सध्याच्या वजनामुळे फार संतुष्ट असून जर त्यांना चविष्ट पदार्थ आणि वजन कमी करणं यांपैकी एखाद्या गोष्टीची निवड करायला सांगितली तर ते चविष्ट पदार्थांची निवड करतील. तसेच 57 टक्के लोकांनी असंही सांगितलं की, ते आपलं वजन कमी करण्यासाठी कधी-कधी शरीरातील कॅलरी कमी करण्याचा प्रयत्न करतात. एवढचं नाही तर जवळपास 59 टक्के भारतीयांचं असं म्हणणं आहे की, जास्तीत जास्त डाएट प्लॅनचा त्यांना फायदाच होत नाही. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार