शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

भारतातील 77 टक्के लोकांना डाएटशी देणं-घेणं नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 13:31 IST

जगभरात वेगान वाढणारी समस्या म्हणजे लठ्ठपणाची. त्यासाठी अनेक लोक डाएटचा आधार घेत असतात. आपण बऱ्याचदा पाहतो अनेक लोक आपलं डाएट पाळण्यासाठी अनेक उपाय करत असतात.

जगभरात वेगान वाढणारी समस्या म्हणजे लठ्ठपणाची. त्यासाठी अनेक लोक डाएटचा आधार घेत असतात. आपण बऱ्याचदा पाहतो अनेक लोक आपलं डाएट पाळण्यासाठी अनेक उपाय करत असतात. तसेच ते डाएट फ्रिक असतात असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आपल्याला अनेक लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत असले किंवा डाएट कॉन्शिअस असल्याचे पाहायला मिळत असले तरी बऱ्याच लोकांना डाएट किंवा वजन कमी करण्याबाबत काहीच वाटत नाही. अशी लोकं डाएटऐवजी चांगल्या आणि चविष्ट खाण्याला पहिली पसंती देतात. त्याना आपलं वाढलेलं वजन आणि लूक यामुळे काही फरक पडत नाही. आता तुम्ही म्हणाल की, हे तुम्हाला कोणी सांगितलं? आमच्या ओळखीतले अनेक जण आपलं डाएट व्यवस्थित फॉलो करतात. तर हे आम्ही बोलत नसून, एका सर्वेमधून हा खुलासा करण्यात आला आहे. 

डाएटिंगऐवजी टेस्टी फूड खाणं पसंत करतात अनेक लोक 

ग्लोबल मार्केट रिसर्च कंपनी lpsosने काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे केला होता. ज्यामध्ये एका गोष्टीचा खुलासा झाला की, जर भारतातील लोकांना डाएटिंग आणि टेस्टी फूड यांमधील फक्त एकच गोष्ट निवडण्यास सांगितली तर, जास्तीत जास्त भारतीय टेस्टी फूडचीच निवड करतील. कंपनीच्या सर्वेनुसार जवळपास 77 टक्के भारतीय असे आहेत जे टेस्टी फूड आणि वजन नियंत्रणात ठेवणं यामध्ये टेस्टी फूडलाच प्राधान्य देतात. 

मिडल क्लास लोकांना डाएटिंगचे आकर्षण फार कमी

lpsosने हा सर्व्हे ऑगस्ट ते सप्टेंबर 2018मध्ये एक हजार शहरात राहणाऱ्या भारतीय नागरिकांवर केला होता. याबाबत कंपनीने असा दावा केला आहे की, हा सर्व्हे एका छोट्या समूहावर करण्यात आला असून त्यावरून संपूर्ण देशभरातील लोकांबाबत निष्कर्ष काढू शकत नाही. सर्व्हेतून मांडण्यात आलेल्या निष्कर्षांनुसार, भारतातील मिडल क्लास वर्ग टेस्टी फूड खाण्यास जास्त प्राधान्य देतात आणि डाएटिंगबाबत ते फार कमी विचार करतात. 

आपल्या असलेल्या वजनामुळे संतुष्ट आहेत 74 टक्के लोक

या सर्व्हेची आणखी एक खास गोष्ट ही होती की, सर्व्हेमध्ये सहभागी झालेले 74 टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की, ते आपल्या सध्याच्या वजनामुळे फार संतुष्ट असून जर त्यांना चविष्ट पदार्थ आणि वजन कमी करणं यांपैकी एखाद्या गोष्टीची निवड करायला सांगितली तर ते चविष्ट पदार्थांची निवड करतील. तसेच 57 टक्के लोकांनी असंही सांगितलं की, ते आपलं वजन कमी करण्यासाठी कधी-कधी शरीरातील कॅलरी कमी करण्याचा प्रयत्न करतात. एवढचं नाही तर जवळपास 59 टक्के भारतीयांचं असं म्हणणं आहे की, जास्तीत जास्त डाएट प्लॅनचा त्यांना फायदाच होत नाही. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार