शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

तणावामुळे आता आयुष्य घटणार नाही, तर वाढणार; वाचा 'हे' कसं घडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 11:27 IST

स्ट्रेस म्हणजेच, तणाव आणि चिंता यांसारख्या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. परंतु, आता वैज्ञानिकांनी स्ट्रेसच्या एका अशा कॅटेगरीचा शोध लावला आहे, ज्यामुळे व्यक्तीचं आयुष्य कमी नाही तर वाढू शकतं.

स्ट्रेस म्हणजेच, तणाव आणि चिंता यांसारख्या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. परंतु, आता वैज्ञानिकांनी स्ट्रेसच्या एका अशा कॅटेगरीचा शोध लावला आहे, ज्यामुळे व्यक्तीचं आयुष्य कमी नाही तर वाढू शकतं. आश्चर्य वाटलं ना?, कारण आतापर्यंत आपण तणावामुळे आरोग्याच्या उद्भवणाऱ्या समस्यांबाबतच ऐकलं होतं. पण आता संशोधकांनी तणाव आयुष्य कमी करत नसून वाढवत असल्याचा दावा केला आहे. यामुळे व्यक्तीमध्ये वाढणाऱ्या वयाची प्रक्रिया संथ गतीने होत असल्याचे देखील संशोधकांनी सांगितलं आहे. 

उंदरांवर करण्यात आलं तणावाच्या प्रभावाचं संशोधन 

अमेरिकेतील ह्यूस्टन मेथडिस्ट रिसर्च इंस्टिट्यूटच्या वैज्ञानिकांनी, काही छोट्या किटकांमध्ये आणि उंदरांमधील तणावाच्या प्रभावाचा अभ्यास केला. यीस्टच्या प्रकरणांमध्ये संशोधकांना, स्ट्रेसच्या प्रभावामुळे वाढत्या वयाच्या लक्षणांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले. या तणावाला संशोधकांनी 'क्रोमॅटिन स्ट्रेस' असं नाव दिलं असून यामुळे एखाद्या सजीवाच्या डिएनएमध्ये बदल घडून आल्याचं दिसून आलं. 

मानवामध्येही असू शकतो 'हा' तणाव 

संशोधकांनी सांगितले की, उंदरांव्यतिरिक्त क्रोमॅटिन स्ट्रेस दुसऱ्या सजीवांमध्येही असतो. म्हणजेच, याचं अस्तित्व मानवांमध्येही दिसू शकतं. जर असं झालं तर हे मानवी शरीरामधील वाढत्या वयाच्या प्रक्रियेला संथ करणं आणि आयुष्य वाढविण्याच्या नवीन संभावना खुल्या करण्यासाठी मदत करतो. 

टिप : वरील सर्व गोष्टी या संशोधनातून सिद्ध झालेल्या असून आम्ही या फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. आपल्यापैकी प्रत्येकाचीच शारीरिक क्षमता वेगळी असते, त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स