शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

Navratri 2018 : 'या' आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी उपवास फायद्याचा, जाणून घ्या फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 11:49 IST

नवरात्रीच्या ९ दिवसात अनेकांनी दिनचर्या बदलते. जे लोक ९ दिवस उपवास ठेवतात त्यांच्यासाठी हा उपवास केवळ डाएट नसून त्यांचं रुटीनही बदलतं.

(Image Credit : gujarati.boldsky.com)

नवरात्रीच्या ९ दिवसात अनेकांनी दिनचर्या बदलते. जे लोक ९ दिवस उपवास ठेवतात त्यांच्यासाठी हा उपवास केवळ डाएट नसून त्यांचं रुटीनही बदलतं. आध्यात्मात उपवासाला इश्वराच्या जवळ जाण्याचं माध्यम सांगितलं आहे तर आयुर्वेदामध्ये याला सर्वोत्तम औषधी मानलं गेलं आहे. चला जाणून घेऊ उपवासाचे फायदे...

आयुर्वेदासहीत दुसऱ्या सर्वच चिकित्सेमध्ये उपवास म्हणजेच पोट रिकामं ठेवण्याची प्रथा आहे. याचा अर्थ हा नाही की प्रत्येक आजारावर उपाय म्हणून उपवास केला जावा, पण अनेक समस्यांवर उपवास हा चांगला उपचार ठरतो. आयुर्वेदात आजार दूर करण्यासाठी शरीरातील विषारी तत्व दूर करण्याबाबत सांगण्यात आलं आहे आणि उपवास केल्याने विषारी तत्व शरीरातून काढले जातात. त्यामुळेच उपवासाला आयुर्वेदात सर्वोत्तम औषधी मानलं आहे. 

हे आजार केले जाऊ शकतात दूर

जर तुम्ही पूर्ण नियमाने उपवास केला तर याने तुमची पचनक्रियाच चांगली होत नाही तर अनेक आजारांपासूनही सुटका मिळते. याने आर्थरायटिस, असथमा, हाय ब्लड प्रेशर, नेहमीचा थकवा, कोलाइटिस, स्पास्टिक कोलन, इरिटेबल बॉवेल आणि अनेकप्रकारच्या मानसिक आजारांपासूनही सुटका मिळते. 

वाढते एनर्जी लेव्हल

काही दिवसांचा उपवास भलेही तुमची एनर्जी कमी करतो, पण याने तुमची इच्छाशक्ती वाढते. उपवास जितका जास्त दिवसांचा असेल शरीराची ऊर्जा तितकी जास्त वाढेल. उपवास करणाऱ्यांना श्वासोच्छवासाचा त्रास कमी होतो. तसेच याने चवीच्या ग्रंथी पुन्हा सक्रिय होऊन काम करु लागतात. उपवासाने आत्मविश्वास इतका वाढतो की, तुम्हाला अनेक आजारांशी लढण्याची एनर्जी मिळते. 

असा करा उपवास

उपवासादरम्यान ताज्या फळांचं सेवन करणे सर्वात चांगलं. त्यासोबतच तुम्ही ताज्या कच्च्या भाज्या, सलाद इत्यादी सेवन करु शकता. उपवासात जितकं जास्त पाणी प्याल तितकं चांगलं. त्यासोबतच नारळाचं पाणीही तुमच्या आरोग्यासाठी चांगलं ठरतं.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सNavratriनवरात्रीHealthआरोग्य