शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

'देशातील ५० टक्के लोकांना 'या' जीवघेण्या आजाराबाबत माहीत नाही' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 10:30 IST

जगभरात बदलत्या लाइफस्टाइल आणि बदलत्या वातावरणामुळे वेगवेगळे आजार आपलं डोकं वर काढत आहेत.

(Image Credit : evlilikhazirlik.com)

जगभरात बदलत्या लाइफस्टाइल आणि बदलत्या वातावरणामुळे वेगवेगळे आजार आपलं डोकं वर काढत आहेत. सतत लोकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. असाच एक भारतात वाढत असलेला आजार म्हणजे हायपरटेंशन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर. पण त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे भारतातील केवळ ४५ टक्के लोकांनाच हाय ब्लड प्रेशरचा सामना कसा करायचा हे माहीत आहे. 

देशभरात करण्यात आलेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे. हा सर्व्हे १५ ते ४९ वयोगटातील ७ लाख ३१ हजार ८६४ लोकांवर करण्यात आला. यात २९ राज्य आणि ७ केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे. सर्व्हेनुसार, हाय ब्लड प्रेशरचे सर्वात कमी म्हणजे ६१.३ टक्के रूग्ण मध्य प्रदेशात आहेत तर सर्वात जास्त ९३.५ टक्के रूग्ण हरयाणामध्ये आहेत. 

४ पैकी ३ लोकांनी बीपी कधीच तपासला नाही

PLOS जर्नलमध्ये प्रकाशित सर्व्हेनुसार, भारतात दर ४ पैकी ३ व्यक्ती असे आहेत, ज्यांनी कधीही ब्लड प्रेशर मोजलं नही. तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक भारतीयांना हे माहीत नाही की, त्यांना हायपरटेंशनची समस्या आहे की, नाही. ४५ टक्के असे रूग्ण आहेत, जे हाय ब्लड प्रेशरचे शिकार झाले आहेत. १३ टक्के रूग्ण वर्तमानात हाय बीपी दूर करण्यासाठी औषधे घेत आहेत. तसेच ८ टक्के असे आहेत ज्यांचं ब्लड प्रेशर नियंत्रित आहे. 

सर्वात जास्त जागरूकता कुठे आणि कुठे कमी

१५ ते १९ वयोगटातील ५.३ टक्के परूष आणि १०.९ टक्के महिलांमध्ये ब्लड प्रेशर नियंत्रित आढळला. कारण यातील जास्तीत जास्त लोकांचा बीपी सामान्य आहे. किंवा बीपी नियंत्रित करण्यासाठी औषधं घेत आहेत. हाय बीपीबाबत जागरूकतेचा स्तर सर्वात कमी छत्तीसगढ(२२.१ टक्के) आणि सर्वाधिक पुद्दुचेरी(८०.५ टक्के) आहे. 

हाय बीपी कंट्रोल करणे कठिण नाही

या सर्व्हेतून समोर आलं आहे की, देशभरात हायपरटेंशन नियंत्रित करण्याचा स्तर १० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे या रिसर्चमध्ये हायपरटेंशन रोखणे आणि जागरूक करण्याचे प्रयत्न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या रिसर्चशी संबंधित डॉ. दोराईराज प्रभाकरन यांनी सांगितले की, 'हायपरटेंशनची माहिती मिळवणे आणि त्यावर उपचार करणे सोपं आहे. त्यामुळे याला नियंत्रित केलं जाऊ शकतं. याला कंट्रोल करून स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि मृत्यूचा धोका थांबवला जाऊ शकतो'.

(Image Credit : Healthline)

ग्रामीण भागात काय स्थिती?

हा रिसर्च पब्लिक हेल्थ फाउंडेशन, हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, बरमिंगघम यूनिव्हर्सिटी, गोटिनजेन विश्वविद्यालय आणि हिडेबबर्ग इन्स्टीट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थ यांनी मिळून केला. रिसर्चमध्ये आढळलं की, ग्रामीण भागांमध्ये राहणारे लोक स्वत:ची काळजी घेण्यात कमी पडत आहेत. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य