शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

'देशातील ५० टक्के लोकांना 'या' जीवघेण्या आजाराबाबत माहीत नाही' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 10:30 IST

जगभरात बदलत्या लाइफस्टाइल आणि बदलत्या वातावरणामुळे वेगवेगळे आजार आपलं डोकं वर काढत आहेत.

(Image Credit : evlilikhazirlik.com)

जगभरात बदलत्या लाइफस्टाइल आणि बदलत्या वातावरणामुळे वेगवेगळे आजार आपलं डोकं वर काढत आहेत. सतत लोकांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. असाच एक भारतात वाढत असलेला आजार म्हणजे हायपरटेंशन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर. पण त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे भारतातील केवळ ४५ टक्के लोकांनाच हाय ब्लड प्रेशरचा सामना कसा करायचा हे माहीत आहे. 

देशभरात करण्यात आलेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे. हा सर्व्हे १५ ते ४९ वयोगटातील ७ लाख ३१ हजार ८६४ लोकांवर करण्यात आला. यात २९ राज्य आणि ७ केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे. सर्व्हेनुसार, हाय ब्लड प्रेशरचे सर्वात कमी म्हणजे ६१.३ टक्के रूग्ण मध्य प्रदेशात आहेत तर सर्वात जास्त ९३.५ टक्के रूग्ण हरयाणामध्ये आहेत. 

४ पैकी ३ लोकांनी बीपी कधीच तपासला नाही

PLOS जर्नलमध्ये प्रकाशित सर्व्हेनुसार, भारतात दर ४ पैकी ३ व्यक्ती असे आहेत, ज्यांनी कधीही ब्लड प्रेशर मोजलं नही. तर ५० टक्क्यांपेक्षा अधिक भारतीयांना हे माहीत नाही की, त्यांना हायपरटेंशनची समस्या आहे की, नाही. ४५ टक्के असे रूग्ण आहेत, जे हाय ब्लड प्रेशरचे शिकार झाले आहेत. १३ टक्के रूग्ण वर्तमानात हाय बीपी दूर करण्यासाठी औषधे घेत आहेत. तसेच ८ टक्के असे आहेत ज्यांचं ब्लड प्रेशर नियंत्रित आहे. 

सर्वात जास्त जागरूकता कुठे आणि कुठे कमी

१५ ते १९ वयोगटातील ५.३ टक्के परूष आणि १०.९ टक्के महिलांमध्ये ब्लड प्रेशर नियंत्रित आढळला. कारण यातील जास्तीत जास्त लोकांचा बीपी सामान्य आहे. किंवा बीपी नियंत्रित करण्यासाठी औषधं घेत आहेत. हाय बीपीबाबत जागरूकतेचा स्तर सर्वात कमी छत्तीसगढ(२२.१ टक्के) आणि सर्वाधिक पुद्दुचेरी(८०.५ टक्के) आहे. 

हाय बीपी कंट्रोल करणे कठिण नाही

या सर्व्हेतून समोर आलं आहे की, देशभरात हायपरटेंशन नियंत्रित करण्याचा स्तर १० टक्क्यांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे या रिसर्चमध्ये हायपरटेंशन रोखणे आणि जागरूक करण्याचे प्रयत्न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या रिसर्चशी संबंधित डॉ. दोराईराज प्रभाकरन यांनी सांगितले की, 'हायपरटेंशनची माहिती मिळवणे आणि त्यावर उपचार करणे सोपं आहे. त्यामुळे याला नियंत्रित केलं जाऊ शकतं. याला कंट्रोल करून स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि मृत्यूचा धोका थांबवला जाऊ शकतो'.

(Image Credit : Healthline)

ग्रामीण भागात काय स्थिती?

हा रिसर्च पब्लिक हेल्थ फाउंडेशन, हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, बरमिंगघम यूनिव्हर्सिटी, गोटिनजेन विश्वविद्यालय आणि हिडेबबर्ग इन्स्टीट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थ यांनी मिळून केला. रिसर्चमध्ये आढळलं की, ग्रामीण भागांमध्ये राहणारे लोक स्वत:ची काळजी घेण्यात कमी पडत आहेत. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य