शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
2
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
3
आलिशान घर, राईस मिल, पेट्रोल पंप... अधिकाऱ्याकडे सापडलं ४० लाखांसह कोट्यवधींचं घबाड
4
पुढील ३ वर्षांत २ IPO आणण्याची रिलायन्सची तयारी; पाहा काय आहे मुकेश अंबानींचा प्लॅन
5
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
6
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
7
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
8
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
9
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
10
Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
11
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
12
शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट
13
सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!
14
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
15
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
16
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
17
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
18
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
19
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
20
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

हाय बीपीला घाबरताय? मग 'हे' वाचाच, गैरसमज होतील दूर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 12:35 IST

रक्तदाबाची समस्या सध्याच्या काळात तरूणांपासून  सगळ्यांनाच जाणवत असतात.

रक्तदाबाची समस्या सध्याच्या काळात तरूणांपासून  सगळ्यांनाच जाणवत असतात. अनियमित जीवनशैली, बाहेरचे अन्नपदार्थ जास्त खाणे, कमी झोप, मोबाईलचा जास्त वापर त्यामुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. अतिराग केल्यामुळे, मद्याचे सेवन जास्त प्रमाणात केल्यामुळे, ताण-तणावामुळे बीपीचा त्रास वाढतो हे खरं असलं तरी बीपी लो होणे किंवा बीपी हाय होणे याबाबत अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत.  

उच्च रक्तदाबाच्या समस्येला हायपरटेंशन सुद्धा म्हटलं जातं.  जर वेळेवर उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णाने उपचार घेतले नाहीत तर  हृदयरोग, स्ट्रोक, हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. ही एक गंभीर समस्या आहे. पण आज आम्ही तुम्हाला काही गैरसमज उलगडून सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या मनातील बीपी संबंधी गैरसमज दूर होतील.

उच्च रक्तदाब एक सामान्य समस्या आहे. या समस्येसाठी काळजी करण्याचं काही कारणं नसतं.

असं नसून उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे  हृद्य आणि शरीरातील अनेक अवयवांना नुकसान पोहोचत असतं. या आजाराला सायलेंट किलर सुद्धा म्हटलं जातं. कारण कधीही मृत्यू होण्याची शक्यता असते. 

उच्च रक्तदाबाची समस्या लवकर बरी होत नाही

उच्च रक्तदाबाच्या समस्येवर कोणताही उपाय केल्यास ही समस्या लगेच बरी होत नाही.  हे खरं असलं तरी.  उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होण्याआधी थांबवता येऊ शकते. त्यासाठी स्वतःच आरोग्य नीट राहील अशी लाईफस्टाईल ठेवण्याचा प्रयत्न करा. रोज व्यायाम करा. ताण-तणावमुक्त रहा. मादक पदार्थांचे सेवन करू नका. या पध्दतींचा वापर करून तुम्ही उच्च रक्तदाबाच्या समस्येला नियंत्रणात ठेवू शकता.

३. उच्च रक्तदाबाचा त्रास  महिलांच्या तुलनेत पुरूषांना अधिक उद्भवतो.

सध्याच्या काळात अनेकांना आपल्या कामामुळे आणि व्यस्त जीवनशैलीमुळे ताण तणावाचं जीवन जगावं लागतं. त्यामुळे रक्तदाबाची समस्या महिलांना तसंच पुरूषांना दोघांना समान प्रमाणात होत असते. वयाच्या चाळीशीनंतर मासिकपाळी ज्यावेळी बंद होण्याच्या मार्गावर असते. त्यावेळी महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवतो. ( हे पण वाचा-पाळी थांबणार असेल तर शरीरात होतात 'हे' बदल, वाचा कोणते?)

 ४. उच्च रक्तदाबाची समस्या अधिक वय असलेल्या  लोकांनाच उद्भवते. 

उच्च रक्तदाब एक अशी समस्या आहे जी ४० वयानंतर चिंतेचे कारण ठरत असते. पण अनेक रिसर्चनुसार रक्तदाबाची समस्या  ही तरूण मुलांना सुद्धा तितक्याच प्रमाणात उद्भवते हे सिद्ध झाले आहे. कारण तरूण मुलंमुली खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात. आहारात फास्ट फुडचा समावेश जास्त असतो. फोनचा वापर जास्त करत असल्यामुळे रात्री लवकर झोपत नाहीत. त्यामुळे  चुकीच्या सवयींमुळे रक्तदाबाची समस्या उद्भवत असते. ( हे पण वाचा-डाळी नेहमीच खात असाल पण त्यांचे आरोग्यदायी फायदे माहीत नसतील, वाचून व्हाल अवाक्)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स