शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

हाय बीपीला घाबरताय? मग 'हे' वाचाच, गैरसमज होतील दूर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 12:35 IST

रक्तदाबाची समस्या सध्याच्या काळात तरूणांपासून  सगळ्यांनाच जाणवत असतात.

रक्तदाबाची समस्या सध्याच्या काळात तरूणांपासून  सगळ्यांनाच जाणवत असतात. अनियमित जीवनशैली, बाहेरचे अन्नपदार्थ जास्त खाणे, कमी झोप, मोबाईलचा जास्त वापर त्यामुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवू शकतात. अतिराग केल्यामुळे, मद्याचे सेवन जास्त प्रमाणात केल्यामुळे, ताण-तणावामुळे बीपीचा त्रास वाढतो हे खरं असलं तरी बीपी लो होणे किंवा बीपी हाय होणे याबाबत अनेक गैरसमज लोकांच्या मनात आहेत.  

उच्च रक्तदाबाच्या समस्येला हायपरटेंशन सुद्धा म्हटलं जातं.  जर वेळेवर उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णाने उपचार घेतले नाहीत तर  हृदयरोग, स्ट्रोक, हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. ही एक गंभीर समस्या आहे. पण आज आम्ही तुम्हाला काही गैरसमज उलगडून सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या मनातील बीपी संबंधी गैरसमज दूर होतील.

उच्च रक्तदाब एक सामान्य समस्या आहे. या समस्येसाठी काळजी करण्याचं काही कारणं नसतं.

असं नसून उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे  हृद्य आणि शरीरातील अनेक अवयवांना नुकसान पोहोचत असतं. या आजाराला सायलेंट किलर सुद्धा म्हटलं जातं. कारण कधीही मृत्यू होण्याची शक्यता असते. 

उच्च रक्तदाबाची समस्या लवकर बरी होत नाही

उच्च रक्तदाबाच्या समस्येवर कोणताही उपाय केल्यास ही समस्या लगेच बरी होत नाही.  हे खरं असलं तरी.  उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होण्याआधी थांबवता येऊ शकते. त्यासाठी स्वतःच आरोग्य नीट राहील अशी लाईफस्टाईल ठेवण्याचा प्रयत्न करा. रोज व्यायाम करा. ताण-तणावमुक्त रहा. मादक पदार्थांचे सेवन करू नका. या पध्दतींचा वापर करून तुम्ही उच्च रक्तदाबाच्या समस्येला नियंत्रणात ठेवू शकता.

३. उच्च रक्तदाबाचा त्रास  महिलांच्या तुलनेत पुरूषांना अधिक उद्भवतो.

सध्याच्या काळात अनेकांना आपल्या कामामुळे आणि व्यस्त जीवनशैलीमुळे ताण तणावाचं जीवन जगावं लागतं. त्यामुळे रक्तदाबाची समस्या महिलांना तसंच पुरूषांना दोघांना समान प्रमाणात होत असते. वयाच्या चाळीशीनंतर मासिकपाळी ज्यावेळी बंद होण्याच्या मार्गावर असते. त्यावेळी महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास उद्भवतो. ( हे पण वाचा-पाळी थांबणार असेल तर शरीरात होतात 'हे' बदल, वाचा कोणते?)

 ४. उच्च रक्तदाबाची समस्या अधिक वय असलेल्या  लोकांनाच उद्भवते. 

उच्च रक्तदाब एक अशी समस्या आहे जी ४० वयानंतर चिंतेचे कारण ठरत असते. पण अनेक रिसर्चनुसार रक्तदाबाची समस्या  ही तरूण मुलांना सुद्धा तितक्याच प्रमाणात उद्भवते हे सिद्ध झाले आहे. कारण तरूण मुलंमुली खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात. आहारात फास्ट फुडचा समावेश जास्त असतो. फोनचा वापर जास्त करत असल्यामुळे रात्री लवकर झोपत नाहीत. त्यामुळे  चुकीच्या सवयींमुळे रक्तदाबाची समस्या उद्भवत असते. ( हे पण वाचा-डाळी नेहमीच खात असाल पण त्यांचे आरोग्यदायी फायदे माहीत नसतील, वाचून व्हाल अवाक्)

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स