शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

...म्हणून ४३ टक्के भारतीयांना करावा लागतोय डिप्रेशनचा सामना, नव्या संशोधनातून समोर आलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 15:08 IST

Mental Health Tips in Marathi : भारतीय नवीन संकटांचा सामना कोणत्या पद्धतीने करत आहेत. त्याचा मानसिक स्थितीवर काय परिणाम होत आहे. हे समजून घेण्यासाठी संशोधन करण्यात आलं होतं.

गेल्या  ८ ते ९ महिन्यांपासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात कहर केल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाऊन दरम्यान जास्तीत जास्तवेळ घरात बंद असल्याने अनेकांना नैराश्याचा सामना करावा लागला होता. ताण तणावामुळे मानसिक आजार उद्भवल्याचे अनेक रिसर्चमधून दिसून आले. भारतातील तब्बल  ४३ टक्के लोक नैराश्याचा सामना करत असल्याचा खुलासा झाला आहे. GOQii द्वारे स्मार्ट-टेक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक रिसर्च करण्यात आला होता. यात जवळपास १०  हजारांपेक्षा जास्त भारतीयांचा सहभाग होता.

भारतीय नवीन संकटांचा सामना कोणत्या पद्धतीने करत आहेत. त्याचा मानसिक स्थितीवर काय परिणाम होत आहे. हे समजून घेण्यासाठी संशोधन करण्यात आलं होतं. या अभ्यासात दिसून आलं की,  २६ टक्के लोकांना हळूहळू नैराश्य येत होते तर ११ टक्के लोक नैराश्याच्या मधल्या टप्प्यात होते. ६ टक्के लोकांमध्ये नैराश्याची तीव्र लक्षणं दिसून आली होती.  गेल्या पाच महिन्यांपासून अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर या परिस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे.

लॉकडाऊन, अती काळजी, पगार कपात, बेरोजगारी आरोग्य धोक्यात असणं आणि एकूणच अस्थिर वातावरणामुळे ताणतणाव वाढला आहे. जास्त प्रमाणात तणाव असल्यामुळे नैराश्य येतं. लॉकडाऊन आणि जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल होत असल्यामळे जवळपास ४३ टक्के लोक नैराश्याचा सामना करत आहेत. असं या अभ्यासात म्हटलं आहे. पीएचक्यू -9 (मानसिक विकारांबाबत मूल्यांकन करण्याचा एक प्रकार) यावर हा अभ्यास आधारीत होता. एखाद्या व्यक्तीचा दैनंदिन कामातील रस, भूक, झोपेचे चक्र, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि उर्जा पातळी यासह नऊ पैलू विचारात घेतले  होते.

तज्ज्ञांनी सांगितले की, ''आमचा अभ्यास असे दर्शवितो की देशभरातील वाढती रुग्णसंख्या, कोरोना व्हायरसचा परिणाम आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. (mounting uncertainty) अनिश्चितता  उच्च ताणतणावाला कारणीभूत ठरत असून संतुलित आहार, जीवनशैलीत बदल आणि झोपेच्या योग्य पद्धतींनी नियंत्रित केले जाऊ शकते," असे GOQii चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गोंडल म्हणाले. 'मेड इन इंडिया' लस कधी लॉन्च होणार? भारत बायोटेक सांगितला कोरोना लसीचा 'हा' प्लॅन

एका अभ्यासाने असे सुचवले आहे की एखाद्या व्यक्तीच्या रोजच्या कामात व्यायाम जोडल्यास त्यांचे मानसिक आरोग्य सुधारू शकते. व्यायामामुळे एंडोर्फिन (आनंदी संप्रेरक) तयार होऊ शकतो ज्यामुळे नैराश्य कमी होण्यास मदत होते.व्यायाम न केल्यास मानसिक ताण किंवा नैराश्य वाढण्याची शक्यता नसते. म्हणून जास्तीत जास्त गोष्टी या स्वतःला खूश ठेवण्यासाठी करायला हव्यात. चिंताजनक! कोरोना संक्रमणामुळे हृदयाचं होतंय मोठं नुकसान; 'असा' होतोय परिणाम, तज्ज्ञांचा दावा

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यResearchसंशोधन