शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

...म्हणून ४३ टक्के भारतीयांना करावा लागतोय डिप्रेशनचा सामना, नव्या संशोधनातून समोर आलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 15:08 IST

Mental Health Tips in Marathi : भारतीय नवीन संकटांचा सामना कोणत्या पद्धतीने करत आहेत. त्याचा मानसिक स्थितीवर काय परिणाम होत आहे. हे समजून घेण्यासाठी संशोधन करण्यात आलं होतं.

गेल्या  ८ ते ९ महिन्यांपासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात कहर केल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाऊन दरम्यान जास्तीत जास्तवेळ घरात बंद असल्याने अनेकांना नैराश्याचा सामना करावा लागला होता. ताण तणावामुळे मानसिक आजार उद्भवल्याचे अनेक रिसर्चमधून दिसून आले. भारतातील तब्बल  ४३ टक्के लोक नैराश्याचा सामना करत असल्याचा खुलासा झाला आहे. GOQii द्वारे स्मार्ट-टेक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एक रिसर्च करण्यात आला होता. यात जवळपास १०  हजारांपेक्षा जास्त भारतीयांचा सहभाग होता.

भारतीय नवीन संकटांचा सामना कोणत्या पद्धतीने करत आहेत. त्याचा मानसिक स्थितीवर काय परिणाम होत आहे. हे समजून घेण्यासाठी संशोधन करण्यात आलं होतं. या अभ्यासात दिसून आलं की,  २६ टक्के लोकांना हळूहळू नैराश्य येत होते तर ११ टक्के लोक नैराश्याच्या मधल्या टप्प्यात होते. ६ टक्के लोकांमध्ये नैराश्याची तीव्र लक्षणं दिसून आली होती.  गेल्या पाच महिन्यांपासून अनपेक्षित परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर या परिस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे.

लॉकडाऊन, अती काळजी, पगार कपात, बेरोजगारी आरोग्य धोक्यात असणं आणि एकूणच अस्थिर वातावरणामुळे ताणतणाव वाढला आहे. जास्त प्रमाणात तणाव असल्यामुळे नैराश्य येतं. लॉकडाऊन आणि जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल होत असल्यामळे जवळपास ४३ टक्के लोक नैराश्याचा सामना करत आहेत. असं या अभ्यासात म्हटलं आहे. पीएचक्यू -9 (मानसिक विकारांबाबत मूल्यांकन करण्याचा एक प्रकार) यावर हा अभ्यास आधारीत होता. एखाद्या व्यक्तीचा दैनंदिन कामातील रस, भूक, झोपेचे चक्र, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि उर्जा पातळी यासह नऊ पैलू विचारात घेतले  होते.

तज्ज्ञांनी सांगितले की, ''आमचा अभ्यास असे दर्शवितो की देशभरातील वाढती रुग्णसंख्या, कोरोना व्हायरसचा परिणाम आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. (mounting uncertainty) अनिश्चितता  उच्च ताणतणावाला कारणीभूत ठरत असून संतुलित आहार, जीवनशैलीत बदल आणि झोपेच्या योग्य पद्धतींनी नियंत्रित केले जाऊ शकते," असे GOQii चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गोंडल म्हणाले. 'मेड इन इंडिया' लस कधी लॉन्च होणार? भारत बायोटेक सांगितला कोरोना लसीचा 'हा' प्लॅन

एका अभ्यासाने असे सुचवले आहे की एखाद्या व्यक्तीच्या रोजच्या कामात व्यायाम जोडल्यास त्यांचे मानसिक आरोग्य सुधारू शकते. व्यायामामुळे एंडोर्फिन (आनंदी संप्रेरक) तयार होऊ शकतो ज्यामुळे नैराश्य कमी होण्यास मदत होते.व्यायाम न केल्यास मानसिक ताण किंवा नैराश्य वाढण्याची शक्यता नसते. म्हणून जास्तीत जास्त गोष्टी या स्वतःला खूश ठेवण्यासाठी करायला हव्यात. चिंताजनक! कोरोना संक्रमणामुळे हृदयाचं होतंय मोठं नुकसान; 'असा' होतोय परिणाम, तज्ज्ञांचा दावा

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यResearchसंशोधन