शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

मासिक पाळी आजार नाही तिचा आनंदाने स्वीकार करा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 7:56 PM

मासिक पाळीविषयी आजही तितक्या खुलेआमपणे  समाजात बोलले जात नाही. त्यामुळे असलेल्या अज्ञानाचा परिणाम स्त्री'च्या आरोग्यावर तर होतोच पण सर्वांनाच त्या नैसर्गिक बदलाचा तिरस्कार वाटायला लागतो.

पुणे : मासिक पाळीविषयी आजही तितक्या खुलेआमपणे  समाजात बोलले जात नाही. त्यामुळे असलेल्या अज्ञानाचा परिणाम स्त्री'च्या आरोग्यावर तर होतोच पण सर्वांनाच त्या नैसर्गिक बदलाचा तिरस्कार वाटायला लागतो.मासिक पाळी विषयीच्या समज-गैरसमाजांविषयी स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ शुभदा देऊस्कर यांच्याशी केलेली ही बातचीत.

मासिक पाळी म्हणजे नेमके काय होते ?

मुळात मासिक पाळी हा काही आजार नाही. ती शरीरात होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. या काळात अंडाशय आणि गर्भाशय यात मोठ्या घटना घडत असतात. दर महिन्यात बीज स्वीकारून गर्भ राहण्यासाठी गर्भाशय तयार होत असते. अशावेळी ते बीज गेले नाही तर त्यासाठी तयार केलेला पडदा नैसर्गिकरीत्या तुटतो आणि मासिक स्त्रावाच्या मार्गाने बाहेर पडतो. तीच प्रक्रिया मासिक पाळी म्हणून ओळखली जाते.

सॅनिटरी नॅपकिन (पॅड), कापड की मेन्स्ट्रल कप यापैकी योग्य काय आहे?

रक्तस्त्राव होत असताना सॅनिटरी नॅपकिन वापरणेच योग्य आहे. पूर्वी काही ठिकाणी कापड वापरले जायचे. मात्र ते कापड स्वच्छ करणे, उन्हात वाळवणे शक्य असेल तरच ते घेणे योग्य आहे. अन्यथा मासिक पाळीच्या काळात झालेला संसर्ग वाढून तो गर्भाशयापर्यंत जाऊन प्रसंगी गर्भ राहण्यातही अडचण येऊ शकते. आजकाल बाजारात मेन्स्ट्रल कप  आले आहेत. मात्र ते कुमारिकांना वापरता येत नाहीत.कप थेट योनीमार्गात घालायचे असल्याने योग्य व्यक्तीकडून ते कसे वापरायचे याचे ज्ञान तज्ज्ञ व्यक्तीकडून घ्यायला हवे. 

त्या काळात पोट दुखते म्हणून पूर्ण आराम करावा का ?

मासिक रक्तस्त्राव अधिक होत असेल किंवा प्रमाणापेक्षा अधिक पोट दुखत असेल तर वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणेच योग्य आहे. घरी बसून किंवा काम थांबवून, एकाच जागी स्थिर राहून वेदना कमी होत नाहीत. अशावेळी दिनक्रमावर परिणाम न करून घेता आपली कामे सुरु ठेवावीत. विशेषतः सतत वेदनाशामक गोळ्यांचे सेवन टाळावे.याकाळात काही महिलांची चिडचिड होते. त्याला हॉर्मोनल डिस्टर्बन्स म्हणतात.  मात्र हे बदल तात्पुरत्या स्वरूपाचे असतात आणि प्रत्येक व्यक्तिगणिक वेगवेगळे असू शकतात.  

या काळात आहार काय असावा ? काही विशिष्ट्य पदार्थांचे सेवन करावे का ?

 या काळात एकाच प्रकारचे अन्न खायचे किंवा विशिष्ट जेवायचं असं काहीही नाही. उलट भरपूर हिरव्या भाज्या, सॅलड, कोशिंबीर, वरण-भात  असा चौरस आहार घ्यावा. हलका व्यायाम करावा. मासिक पाळी आजार न मानता तिचा आनंदाने आणि वैज्ञानिकदृष्ट्या स्वीकार करायला हवा. त्या  दिवसात एका जागी बसून चिडचिड करत बसण्यापेक्षा तिचा स्वीकार करून ते चार दिवस अधिक सुसह्य बनवता येऊ शकतात. 

मासिक पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेणे कितपत योग्य आहे ?

काही ठिकाणी पूजा किंवा व्रत-वैकल्यांसाठी पाळी लांबवली जाते.कारण तितके महत्वाचे असेल तर काहीवेळा हरकत नाही. मात्र यात वारंवारता नसावी.शिवाय मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या घेणे चुकीचे आहे. त्यासाठी तज्ज्ञांचाच सल्ला घ्यायला हवा. तसे न केल्यास भविष्यात मासिक पाळीचे चक्र बिघडण्याचा धोका असतो.

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यWomenमहिलाMenstrual Hygiene Dayमासिक पाळीचा दिवस