शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

वजन घटवायचंय?; मग 'हे' 5 शाकाहारी पदार्थ खा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2019 18:58 IST

सध्या लोक संतुलित आणि पौष्टिक आहारापासून दूर जात असून जंक फूडकडे अधिक आकर्षित होताना दिसत आहेत. यामुळेच अनेकांना वाढणाऱ्या वजनाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

(Image Credit : Diet Detective)

सध्या लोक संतुलित आणि पौष्टिक आहारापासून दूर जात असून जंक फूडकडे अधिक आकर्षित होताना दिसत आहेत. यामुळेच अनेकांना वाढणाऱ्या वजनाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. वजन वाढण्यामागे खराब जीवनशैली आणि असंतुलित आहार हिच प्रमुख कारणं आहेत. त्याचबरोबर दिवसभराच्या थकवा दूर करण्यासोबतच तुम्ही आरोग्याच्या इतर समस्यांपासूनही दूर राहू शकता. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करणाऱ्या 5 शाकाहारी पदार्थांबाबत सांगणार आहोत.

हिरव्या पालेभाज्या 

हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. यामध्ये असलेली खनिज तत्व, व्हिटॅमिन्स, प्रोटीन, फायबर आणि अॅन्टी-ऑक्सिडंट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर वजन कमी करून शरीराची ऊर्जा आणि शक्तीही टिकवून ठेवण्याचं काम करतात. एवढचं नाही तर फॅट्सचे प्रमाण कमी करून वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही मदत लाभदायक ठरतात. 

सोयाबीन

मांसाहारी पदार्थ जसं मासे आणि चिकन शरीरामध्ये फॅट्सचे प्रमाण वाढवून लठ्ठपणासोबतच अनेक आजार वाढविण्याचं काम करतात. ही कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही सोयाबिनपासन तयार करण्यात आलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता. यामुळे शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते. सोयाबीनमध्ये प्रोटीन, फायबर यांसारखे अनेक गुणधर्म आढळून येतात. जे शरीरामधील फॅट्सचे प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतात. 

धान्य 

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी धान्य अत्यंत फायदेशीर ठरतात. यामध्ये भरपूर प्रमाणात पो,क तत्व असतात. हे आपल्या शरीराच्या मजबुतीसाठी आणि शरीराचं आरोग्यापासून रक्षण करण्यासाठी मदत करतात. धान्यांमध्ये तुम्ही गव्हाच्या चपात्या, जवस, ब्राउन राइस, रवा आणि दलिया यांसारख्या पदार्थांचे सेवन करू शकता. या पदार्थांमधून लोह तत्व आणि झिंक मुबलक प्रमाणात शरीराला मिळतं. त्याचबरोबर आपल्या शरीराचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

फळं 

वजन नियंत्रित करण्यासाठी फळांचं सेवन करणं लाभदायक ठरतं. यामध्ये खनिज तत्व, व्हिटॅमिन, अॅन्टीऑक्सिडंट, लो-कॅलरी आणि फायबरचे अधिक प्रमाण असते. यामुळे शरीरामध्ये ऊर्जेचा स्त्रोत वाढतो. याच्या सेवनाने पोट बराच वेळ भरल्याप्रमाणे वाटते. त्यामुळे आपण ओवरइटिंग करत नाही आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. फळांमध्ये टरबूज, सफरचंद, खरबूज, जांभूळ, संत्री,पपई या पदार्थांचे सेवन करा. यामुळे शरीराची पचनक्रिया सुरळीत होते. तसेच शरीरातील फॅट्स कमी करून वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

ड्रायफ्रुट्स 

ड्रायफ्रुट्सचं सेवन शरीराचं वजन कमी करण्यासाठी मदत करतं. यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतं. बदाम, ड्रायफ्रुट्स, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, अक्रोड इत्यादी शरीराच्या कोलेस्ट्रॉलचा स्तर आणि वजन कमी करण्यासाठी मदत करतं. यांचे सेवन केल्याने शरीराची भूक कमी होते. परिणामी शरीचं वजन नियंत्रणात राहतं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपाय म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं ठरतं. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सWeight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealthy Diet Planपौष्टिक आहार