शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

तुमच्या आळशीपणामुळे तुमचे आरोग्य धोक्यात, गंभीर परिणाम समजले तर खाड्कन जागे व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 17:31 IST

WHO ने एक नवीन अहवाल सादर केला आहे. यामध्ये असे म्हणलेले आहे की, हल्ली लोकांच्या आळशीपणामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आहे.

आपल्याला कायम फिट आणि तंदुरुस्त राहायचे असेल तर आपण योग्य आहार घेणं, पुरेशी झोप घेणं आणि नियमित व्यायाम करणं खूप महत्वाचं असतं. हल्ली बरेच लोक घरी काम करतात म्हणजेच वर्क फ्रॉम होम करतात. काहीवेळा अशा लोकांची जीवनशैली खूपच निवांत आणि आळशीदेखील होते. तर काही लोक बाहेर जाऊन काम करतात. मात्र ते कोणत्याही प्रकारचे शारीरिक कष्ट करत नाहीत. अशाप्रकारे व्यायाम किंवा शारिक कष्ट न करणारे लोक आळशी होतात.

झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, WHO ने एक नवीन अहवाल सादर केला आहे. यामध्ये असे म्हणलेले आहे की, हल्ली लोकांच्या आळशीपणामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आहे. दरवर्षी जगातील 8 लाख 30 हजार लोकांचा मृत्यू त्यांच्या आळशीपणामुळे होतो. WHO च्या मते, लोकांनी आठवड्यातून किमान 150 मिनिटे व्यायाम किंवा 75 मिनिटे हेवी वर्कआउट करायला हवे. असे न केल्यास ते लोक आळशी मानले जातातआणि शारीरिक हालचालींचा अभाव त्यांच्या मृत्यूचे कारण बनू शकते.

हल्ली लोकांची जीवनशैली खूप बदलली आहे. चुकीच्यावेळी खाणे-झोपणे, चुकीचा आहार घेणं, व्यायाम न करणे अशा जीवनशैलीमुळे भारतातील 66% लोकांचा मृत्यू होतो. यामुळे दरवर्षी 60 लाख 46 हजार 960 लोकांना गंभीर आजार होतात आणि यामुळेच त्यांचा मृत्यू होतो. मुख्य म्हणजे अशा पद्धतीने जीव गमावलेल्या एकूण लोकांपैकी 54% लोकांचे वय 70 वर्षांपेक्षा कमी आहे.

तसेच दरवर्षी भारतात 28% लोकांचा मृत्यू हृदयविकाराने, 12% श्वासोच्छवासाच्या आजारांमुळे, 10% कर्करोगाने, 4% मधुमेहामुळे आणि उर्वरित 12% लोकांना वाईट जीवनशैलीमुळे जीव गमवावा लागतो. भारतात दारू पिणाऱ्या लोकांची संख्यादेखील दिवसागणिक वाढते. तसेच अनेक लोक तंबाखूचे सेवन जास्त प्रमाणात करतात आणि यामुळे कर्करोगासारखे आजार होतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स