शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शरीरावरची सूज आणि अंगदुखी आहेत गर्भाशयाच्या कॅन्सरचा संकेत, जाणून घ्या लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 10:27 IST

महिलांना स्वतःकडे पुरेसं लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या आजारांना बळी पडाव लागत.

(image credit-www. express.co.uk)

महिलांना स्वतःकडे पूरेसं लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे  त्यांना वेगवेगळ्या आजारांना बळी पडाव लागतं. दैनंदीन आयुष्य  जगत असताना अनेक तक्रारी उद्भवत असतात. कामाचा ताण आणि धावपळ  असल्यामुळे महिला नेहमीच त्यांना सतत होत असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष  करत असतात. आज आम्ही तुम्हाला अशा आजाराबद्दल सांगणार आहोत जो आजार महिलांना मोठ्या प्रमाणात उद्भवत असतो.  लहानमोेठ्या आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा आजार वाढत जातो.  चला जाणून घेऊया या आजाराची कारणं आणि लक्षणं.

महिलांना  आपल्या अवयवांशी संबंधीत आजार होतात पण त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात. गर्भाशयाचा कॅन्सर हा आजार सध्याच्या काळात सामान्य झाला आहे.  याचं मुख्य कारणं तुमचं राहणीमानं आणि खाण्यापिण्याच्या सवयी हे असू शकतं. गर्भधारणेच्या वेळी सुद्धा महिलांच्या गर्भाशयाला सुज येत असते. महिलांना ५० ते ५५ वर्ष या वयोगटात  सुज येते . त्यावेळी मेनोपॉज हा जवळ आलेला असतो.  पिरियड्स बंद होण्याची समस्या जेव्हा उद्भवते तेव्हा पीसीओएस (PCOS) ची समस्या जाणवते. त्यामुळे गर्भाशयाला सुज येऊ शकते. 

गर्भाशयाचा कॅन्सर

गर्भाशयाच्या आतल्या भागातुन तो  एक थर जमा झालेला असतो. त्याला  एंडोमेट्रियम असं म्हणतात. या आजारात एंडोमेट्रियमचा थर  वेगाने वाढत जातो. एंडोमेट्रियल कॅन्सर हा जीवघेणा आहे. कारण त्यामुळे महिलांची आई होण्याची क्षमता कमी होत असते. एंडोमेट्रियल कॅन्सरमुळे जन्माला येत असलेल्या बाळाला सुद्धा कॅन्सर होण्याचा धोका असतो. जर तुम्हाला मासिक पाळीच्या व्यतिरिक्त रक्तस्त्राव होत असेल. तसंच योनीतुन  कोणत्याही प्रकारचा स्त्राव होत असेल तर तुम्ही या लक्षणांकडे तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. 

लाईफस्टाईलमध्ये झालेल्या बदलांचा परिणाम हे आजार होण्यामागे कारणीभूत आहे.  अन्हेल्दी पदार्थ खाणे, शारीरिक हालचाल न करणे, ताण-तणाव  यामुळे गर्भाशयाच्या भागात सुज येण्याची शक्यता असते.  ज्यामुळे मासिक पाळीच्या वेळी सुद्धा समस्या जाणवतात.  यामुळे गर्भाशयाचे वेगवेगळे आजार  होतात. त्याला गर्भाशय फाइब्रॉइड असं म्हणतत. 

(Image credit- express.co.uk)

लक्षणं

गर्भाशयाच्या आकारात झालेल्या बदलामुळे सुज  येत असते.  

मासिकपाळी अनियमीत होणे,

पोटात जास्त दुखणे तसंच ओटी पोटात वेदना होणे.

जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होणे.

शरीर जड वाटणे.  

शरीराच्या विविध भागात सुज येणे,

अंग पिवळे पडणे.

कमरेच्या आसपासच्या भागात जास्त चरबी जमा होणे.गर्भाशयाच्या  कॅन्सरपासून वाचण्यासाठी उपाय

तुम्हाला अंग सुजल्यासारखं वाटत असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.  काहीवेळा घरगुती उपायांचा वापर करून सुद्धा तुम्ही या आजारांपासून दूर राहू शकता.  तसंच दररोज जर तुम्ही व्यायाम केलात तर तुम्हाला आजारांपासून वाचता येईल.

आळशीच्या बीया

जर तुम्ही आळशीच्या बीयांचा वापर करून आरोग्य चांगलं ठेवू शकता.  त्यासाठी तुम्ही  दळलेल्या आळशीच्या बीया  दुधात उकळून रात्री झोपायच्या आधी पिऊन झोपा. ( हे पण वाचा-बटाट्याच्या सालीचे आरोग्यदायी फायदे वाचाल तर साल फेकण्याआधी नक्की विचार कराल!)

हळदीचे दुध

हळदीचं दूध रात्री  झोपण्याआधी प्यायल्याने तुम्हाला गर्भाशयाच्या आजारांपासून दूर राहता येईल.( हे पण वाचा-Lung Cancer Symptoms : दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला येत असेल तर हा असू शकतो Lung Cancer चा संकेत!)

लिंबाची पानं

तुम्ही तुमच्या गर्भाशयाचा व्यवस्थित  ठेवायचं असेेल तर  लिंबाच्या पानांचा वापर करू शकता. यासाठी  लिंबाची पानं आणि सुंठ पाण्यात उकळून त्याचा काढा तयार करा. दिवसातून  एकदा  काढ्याचे सेवन करा. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सcancerकर्करोग