शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जर तुम्ही 'या' वेळेला कॉफी पित असाल तर ठरू शकतं जीवघेणं, काेणती आहे योग्यवेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 10:30 IST

हिवाळा सुरू झाल्यानंतर शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी चहा कॉफी अनेकदा प्यायली जाते.

हिवाळा सुरू झाल्यानंतर शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी चहा कॉफी अनेकदा प्यायली जाते. तसंच कॉफी प्यायल्याने शरीराला उर्जा मिळते. काम करण्यासाठी उत्साह असतो. पण चहा किंवा कॉफी कोणत्यावेळी प्यायला हवा, हे माहीत असणं महत्वाचं असतं. कारण कोणत्याही वेळेत कॉफी घेतल्यास जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागू शकतो.

अनेक जणांची  सकाळ ही कॉफी प्यायल्यानंतर सुरू होते. जर चहा किंवा कॉफी घेतला नाही तर अनेकांना डोकं जड झाल्यासारख वाटतं. पण कॅफिनचं सर्वाधिक सेवन केल्याने आरोग्यासाठी घातक ठरू शकतं  तसंच कॉफी योग्यवेळी घेतली नाही तर शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कॅफेनचं अतिसेवन केल्याने निद्रानाश, नैराश्य, अस्वस्थता.या समस्या उद्भवण्याचा धोका जास्त असतो. त्याचप्रमाणे कॉफीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास हृदयाचे ठोके वाढणे, रक्तदाब वाढणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या तीव्रतेने जाणवतात. 

जर तुम्ही सकाळी उठल्याउठल्या कॉफी पित असाल तर ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. असे केल्यास शरीरातील कॉर्टीसोल हार्मोनचे प्रमाण वाढते. तसंच ताण-तणावाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. उपाशी पोटी कॉफी प्यायल्यास शरीरासाठी नुकसानकारक ठरतं. यामुळे अ‍ॅसिडीटी, अपचन आणि गॅस यांसारखे पोटाचे विकार होण्याची दाट शक्यता असते. 

 कॅफिन हे ऊर्जा देणार असतं. त्यामुळे जर तुम्ही व्यायाम करत असाल किंवा जीमला जात असाल तर त्याआधी कॉफी प्या. त्यामुळे मेटाबॉलिज्म बूस्टअप होईल. पण  एका कपापेक्षा अधिक चहा पिणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. सकाळचा नाष्ता आणि दुपारचं जेवण यांच्यामधील वेळेत तुम्ही कॉफी पिऊ शकतां कारण त्या कालावधीत थोडीफार भूक लागत असते. त्यामुळे एनर्जी येण्यासाठी तुम्ही कॉफी प्यायली तर फायदेशीर ठरेल. तसंच रात्री  उशीरा कॉफी पिणं टाळा. कारण असं केल्यास अनिद्रेचा त्रास उद्भवू शकतो.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स