शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

डायबिटीसशी निगडीत गैरसमज कसे कराल दूर?; जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेला महत्वाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 15:09 IST

Health Tips In marathi : डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकाची आहार घेण्याची पद्धत वेगवेगळी असते. खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, शारीरिक स्थिती, अनुवांशिकता यामुळेही हा आजार होऊ शकतो. 

डायबिटीसचा आजार उद्भवल्यास रुग्णांला वेगवेगळ्या प्रकरची पथ्य पाळावी लागतात. सामान्य लोकांपेक्षा वेगळी जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल करावा लागतो. कारण अनेकांना डायबिटीस  झाल्यानंतर या आजाराबाबत पूर्ण आणि योग्य माहिती नसते.  त्यामुळेच या आजाराबाबत असलेले गैरसमज दूर करणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला स्वतःच्या आणि कुटूंबातील लोकांच्या  तब्येतीची काळजी घेता येईल. नोव्हेंबर महिन्यात वर्ल्ड डायबिटीस डे सिरीज असते. या दरम्यान डायबिटीसशी निगडीत माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाते. ऑस्ट्रेलियन डायबिटीज एज्युकेटर असोसिएशन मान्यता प्राप्त डायबिटीज विशेषज्ञ स्वाती बाथवाल यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत अधिक माहिती दिली आहे

डायबिटीसबाबत कोणते गैरसमज आहेत?

हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की, डायबिटीसबाबत लोकांच्या मनात कोणत्या प्रकारचे चुकीचे समज आहेत.  डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार डायबिटीस असलेल्या लोकांना कोणताही एक आहार नसतो. आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असून डॉक्टरांच्या सल्ल्याने डाएट प्लॅन घ्यायला हवा. साखरेचं सेवन कमी प्रमाणात केल्यास डायबिटीसचा धोका नसतो किंवा साखरेचं सेवन कमी केल्यास  डायबिटीस होणार नाही असाही गैरसमज अनेकांच्या मनात असतो. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येकाची आहार घेण्याची पद्धत वेगवेगळी असते. खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, शारीरिक स्थिती, अनुवांशिकता यामुळेही हा आजार होऊ शकतो. 

डायबिटीस असलेले लोक आपल्या आहारात वेगवेगळ्या  फळांचा समावेश करू शकतात. पण त्याचे प्रमाण ठरलेले असते. फळांमध्ये नैसर्गिक  शुगर असते. लीची आणि टरबूज या फळांचे सेवन जास्त केल्याने शरीरातील साखरेचं प्रमाण वाढू शकतो. म्हणून या फळांचे कमीत कमी प्रमाणात सेवन करायला हवे. डायबिटीस पूर्णपणे बरा होऊ शकतो की नाही. असाही प्रश्न लोकांना पडतो.

तज्ज्ञ स्वाती बथवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार टाइप-2 डायबिटीसने शरीरात प्रवेश केल्यानंतर पॅनक्रियाजमधून इन्सुलिन निघून जाते. डायबिटीस नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. त्यासाठी  दररोज व्यायाम करायला हवा.   जीवनशैली चांगली असावी, जेवणाच्या तसंच खाण्यापिण्याच्या वेळा चुकवू नये.

फराळाचा आनंद घेताना डायबिटीस आणि वाढत्या वजनावर असं ठेवा नियंत्रण

जास्त न खाता प्रमाणात खा

जर तुम्हाला डायबिटीसची समस्या असेल तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी एकाचवेळी खूप जास्त खाणं टाळा.  दिवसातून ३- ४ वेळा ठराविक वेळेचे अंतर ठेवून काहीतरी खात राहा. त्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होईल. याशिवाय शरीराला पोषक तत्व मिळतील. 

हेल्दी स्नॅक्स घ्या 

दिवाळीच्या वेळी मिठाई, पेठे खाण्यापासून रोखणं खूप कठीण असतं.  जर तुम्हाला डायबिटीसचा त्रास असेल तर कमीत कमी गोड पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा.  गोड खावंस वाटल्यास तुम्ही ताजी फळं खाऊ शकतं  तसंच जास्तीत जास्त पाणी प्या त्यामुळे त्वचा आणि शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल.

गोड कमी खा

डायबिटीस असलेल्या लोकांनी असलेल्या  दुधाच्या चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेट खावे. वास्तविक, डार्क चॉकलेटमध्ये साखर कमी प्रमाणात असते, ज्याचा आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही. गोड पेयांचे  सेवन करण्यापेक्षा शुगर फ्री पेय किंवा नारळाचे पाणी हा उत्तम पर्याय ठरेल. 

मास्क धुवून उन्हात सुकवल्याने ९९.९९ % व्हायरस नष्ट होतो? जाणून घ्या दाव्यामागचं सत्य

ब्राऊस राईस खा

अनेकांना पांढरा भात अधिक खायला आवडतं. कारण  रोजच्या जेवणाचा तो भाग असतो.  पण डायबिटीसच्या रुग्णांनी पांढरे तांदूळ खाणे टाळावे. कारण त्या तांदळामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीची वाढ होते. म्हणून पांढर्‍या तांदळाऐवजी ब्राऊस राईस खायला सुरूवात करा. दिवाळीच्या निमित्ताने या भाताचा आहारात समावेश केल्यास  रक्तातील साखर नियंत्रण राहील.

मोठा दिलासा! भारतातील बहुतेक लोकांना कोरोना लसीची गरज भासणार नाही?; एम्सच्या डॉक्टरांचा दावा

तळलेल्या पदार्थांचे अतिसेवन करू नका

दिवाळीनिमित्त विविध प्रकारचे तळलेले आणि मसालेदार पदार्थ तयार केले जातात. डायबिटीसच्या रुग्णांनी उत्सवाच्या वेळी , भजी, चकली यासारखे तळलेले पदार्थ खाऊ नयेत. याशिवाय, बिस्किट्स, केक यासारखे बेकरी पदार्थ पूर्णपणे टाळायला हवेत. जेणेकरून वजन वाढण्यापासून तसंच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासून बचाव करता येऊ शकतो. याशिवाय मादत पदार्थाचे सेवन शारीरिक संतुलन बिघण्यासाठी  कारणीभूत ठरू शकतं. म्हणून  दारू, सिगारेट  अशा पदार्थाचे जास्त सेवन करू नका.  

टॅग्स :diabetesमधुमेहHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स