शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोणत्या वेळी आंघोळ केल्याने होतात जास्त फायदे आणि कोणत्या वेळी आंघोळ करू नये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 17:03 IST

दिवसा कधीही आंघोळ करू शकता. पण असं करणं आरोग्यासाठी चांगलं नसतं. जर तुम्ही योग्य वेळी आंघोळ केली तर आरोग्याला जास्त फायदा होईल.

आंघोळ करणं हे आपल्या दिनचर्येतील महत्वाचं काम आहे. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठीही ही महत्वाची बाब आहे. हे तर तुम्हाला माहीत आहेच की, आंघोळ केल्याचे अनेक असतात. पण यासोबतच हेही महत्वाचं आहे की, कोणत्या वेळेला आंघोळ करणं योग्य असतं.  दिवसा कधीही आंघोळ करू शकता. पण असं करणं आरोग्यासाठी चांगलं नसतं. जर तुम्ही योग्य वेळी आंघोळ केली तर आरोग्याला जास्त फायदा होईल. सोबतच काही वेळा अशाही असतात जेव्हा तुम्ही आंघोळ करणं योग्य नसतं.

कोणत्या वेळी आंघोळ करावी?

तुम्हाला हे वाचून जरा विचित्र वाटेल, पण हे सत्य आहे की, सकाळऐवजी सायंकाळी आंघोळ करणं जास्त फायदेशीर असतं. अनेक रिपोर्ट्सनुसार, जर तुम्ही रात्री आंघोळ करत असाल तर तुम्ही योग्य तेच करत आहात. रात्री आंघोळ करणं तुमच्या त्वचेसाठी बरंच फायदेशीर असतं. खासकरून उन्हाळ्यात आणि पावसाच्या दिवसात असं करणं जास्त फायदेशीर ठरतं. (हे पण वाचा : काय आहे Havana Syndrome, ज्यामुळे भारताची चर्चा जगभरात होत आहे?)

दिवसभर बाहेर राहिल्याने संपूर्ण दिवसभर तुमच्या स्कीनवर धूळ-माती, घाम चिकटतो. आणि यामुळे होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी सायंकाळी आंघोळ करणं चांगली सवय असते. त्यामुळे झोपण्यापूर्वी शरीर चांगल्या प्रकारे स्वच्छ करणं आवश्यक आहे. पण याचा अर्थ असा नाही की, सकाळी आंघोळ करणं चुकीचं आहे. 

सायंकाळी आंघोळ करण्याचे फायदे?

सायंकाळी आंघोळ केल्याने तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. गरमीमुळे शरीराचं तापमान वाढल्याने रात्री आंघोळ करणं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतं. सोबतच याने गाढ झोप येण्यासही मदत मिळते. तुमचा स्ट्रेसही याने कमी होतो. तसेच मेंदू, त्वचा, शरीराला बरेच फायदे मिळतात. अशात रात्री आंघोळ करणं अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतं.

कधी आंघोळ करू नये?

आयुर्वेदानुसार आंघोळ करण्याबाबत अनेक नियम आहेत. असं म्हटलं जातं की, जर तुम्ही जेवण केल्यावर लगेच आंघोळ करत असाल तर ही एक चुकीची सवय आहे. आयुर्वेदानुसार, जेवण केल्यावर काही वेळाने म्हणजे १ ते २ तासांनी आंघोळ करावी. त्यासोबतच दिवसातीलही काही वेळा अशा असतात जेव्हा आंघोळ करू नये. झोपण्याच्या काही वेळेआधी आंघोळ करू नये आणि जर तुम्हाला जास्त वेळ शॉवर घेण्याची सवय असेल तर असं अजिबात करू नये. झोप आणि आंघोळीत अंतर असलं पाहिजे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य