शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

जमिनीवर पडलेले अन्नपदार्थ खायचे की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 18:53 IST

भारतीय संस्कृतीनुसार जेवताना खाली, जमिनीवर मांडी घालून जेवलं जातं. आधी एखाद्या समारंभामध्ये जेवणासाठी पंगती मांडल्या जायच्या. पुढे बदललेल्या पद्धतीनुसार आणि पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे डायनिंग टेबलवर बसून जेवण्याची पद्धत भारतातही रूढ झाली.

भारतीय संस्कृतीनुसार जेवताना खाली, जमिनीवर मांडी घालून जेवलं जातं. आधी एखाद्या समारंभामध्ये जेवणासाठी पंगती मांडल्या जायच्या. पुढे बदललेल्या पद्धतीनुसार आणि पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे डायनिंग टेबलवर बसून जेवण्याची पद्धत भारतातही रूढ झाली. पण तुम्हाला माहीत आहे का? जमिनीवर बसून जेवणं आणि जमिनीवर जेवणं यामध्ये फार फरक आहे. आयुर्वेदानुसार, जमिनीवर मांडी घालून जेवल्यामुळे अनेक आजार दूर होतात. पण आपण जर जमिनीवरच जेवू लागलो तर मात्र आपलं शरीर अनेक आजारांना बळी पडतं.

 जमिनीवर पडलेलं अन्न खाणं 

अनेकदा लहान मुलं खेळता खळेता जमिनीवर पडलेला पदार्थ सहज तोंडात टाकतं. पालकांचं लक्ष गेलं की, ते मुलांना थांबवतात. परंतु पालकांचं दुर्लक्ष झाल्यानंतर मुलं पुन्हा जमिनीवर पडलेलं अन्न म्हणजेच, चॉकलेट, आइस्क्रीम, चिप्स यांसारखे पदार्थ पटकन तोंडात टाकतात. यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, जमिनीवर पडलेलं अन्न किती वेळात बॅक्टेरियायुक्त होतं?

'5 सेकांदांची टेस्ट'

जमिन कितीही स्वच्छ असली तरिही त्यावर बॅक्टेरिया असतातच. अशातच जेव्हा अन्न जमिनीवर पडतं त्यावेळी त्यावर अनेक बॅक्टेरिया पाच सेकंदांनी चिकटतात. ही पाच सेकंदांची थिअरी असून जर एखादा पदार्थ जमिनीवर पडल्यानंतर जर तो पाच सेकंदांच्या आतमध्ये उचलला तर त्यावर कोणत्याही बॅक्टेरियांचा परिणाम होत नाही. परंतु ही थिअरी अनेक लोकांना मान्यही आहे आणि याबाबत कॉन्ट्रोवर्सिही आहे. 

किती बॅक्टेरिया स्थानांतरित होतात?

2007मध्ये क्लेम्सन यूनिवर्सिटीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनात, जमिनीवर पडलेल्या अन्नामध्ये स्थलांतरित होणाऱ्या बॅक्टेरियाचे प्रमाण जमिनीवरील एकूण बॅक्टेरियावर अवलंबून असते. त्याचा पदार्थाशी आणि पदार्थ जमिनीवर किती वेळ आहे याच्याशी काहीही संबंध नसतो. 

पृष्ठभागावर अवलंबून असतं

संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, एखाद्या पदार्थावर तो कोणत्या पृष्ठभागावर पडतो यावर परिणाम ठरतात. उदाहरणार्थ, जर एखादा पदार्थ लाकडावर किंवा टाइल्सऐवजी कारपेटवर पडला तर त्यावर कमी बॅक्टेरिया इफेक्ट करतात. बॅक्टेरियांचे संगोपन करण्यासाठी टाइल्स किंवा लाकडासारखे चिकट पृष्ठभाग परिणामकारक ठरतात. 

पदार्थांवरही अवलंबून असतात परिणाम

काही अभ्यासंकांच्या मते, पदार्थांवर बॅक्टेरिया किती प्रमाणात परिणाम करतात हे पदार्थ कोणता आहे यावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, जॅम, जेली किंवा आईस्क्रिमसारखा चिकट पदार्थांवर सॅन्डविच, बिस्किट आणि फळांसारख्या शुष्क खाद्य पदार्थांच्या तुलनेत वेगाने बॅक्टेरिया चिकटतात. 

जमिनीवर पडलेलं अन्न खावं का?

हा प्रश्न अनुत्तरितच आहे, कारण जमिनीवर पडलेले अन्न पदार्थ खावे की नाही? हे त्या व्यक्तीच्या विचारांवर ठरतं. तसेच पदार्थ ज्या पृष्ठभागावर पडतो, त्या भागातील स्वच्छतेवरही अवलंबून असते. हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायकही ठरू शकते. त्यामुळे असं करणं शक्यतो टाळणचं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य