शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीवर पडलेले अन्नपदार्थ खायचे की नाही?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 18:53 IST

भारतीय संस्कृतीनुसार जेवताना खाली, जमिनीवर मांडी घालून जेवलं जातं. आधी एखाद्या समारंभामध्ये जेवणासाठी पंगती मांडल्या जायच्या. पुढे बदललेल्या पद्धतीनुसार आणि पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे डायनिंग टेबलवर बसून जेवण्याची पद्धत भारतातही रूढ झाली.

भारतीय संस्कृतीनुसार जेवताना खाली, जमिनीवर मांडी घालून जेवलं जातं. आधी एखाद्या समारंभामध्ये जेवणासाठी पंगती मांडल्या जायच्या. पुढे बदललेल्या पद्धतीनुसार आणि पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे डायनिंग टेबलवर बसून जेवण्याची पद्धत भारतातही रूढ झाली. पण तुम्हाला माहीत आहे का? जमिनीवर बसून जेवणं आणि जमिनीवर जेवणं यामध्ये फार फरक आहे. आयुर्वेदानुसार, जमिनीवर मांडी घालून जेवल्यामुळे अनेक आजार दूर होतात. पण आपण जर जमिनीवरच जेवू लागलो तर मात्र आपलं शरीर अनेक आजारांना बळी पडतं.

 जमिनीवर पडलेलं अन्न खाणं 

अनेकदा लहान मुलं खेळता खळेता जमिनीवर पडलेला पदार्थ सहज तोंडात टाकतं. पालकांचं लक्ष गेलं की, ते मुलांना थांबवतात. परंतु पालकांचं दुर्लक्ष झाल्यानंतर मुलं पुन्हा जमिनीवर पडलेलं अन्न म्हणजेच, चॉकलेट, आइस्क्रीम, चिप्स यांसारखे पदार्थ पटकन तोंडात टाकतात. यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, जमिनीवर पडलेलं अन्न किती वेळात बॅक्टेरियायुक्त होतं?

'5 सेकांदांची टेस्ट'

जमिन कितीही स्वच्छ असली तरिही त्यावर बॅक्टेरिया असतातच. अशातच जेव्हा अन्न जमिनीवर पडतं त्यावेळी त्यावर अनेक बॅक्टेरिया पाच सेकंदांनी चिकटतात. ही पाच सेकंदांची थिअरी असून जर एखादा पदार्थ जमिनीवर पडल्यानंतर जर तो पाच सेकंदांच्या आतमध्ये उचलला तर त्यावर कोणत्याही बॅक्टेरियांचा परिणाम होत नाही. परंतु ही थिअरी अनेक लोकांना मान्यही आहे आणि याबाबत कॉन्ट्रोवर्सिही आहे. 

किती बॅक्टेरिया स्थानांतरित होतात?

2007मध्ये क्लेम्सन यूनिवर्सिटीमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका संशोधनात, जमिनीवर पडलेल्या अन्नामध्ये स्थलांतरित होणाऱ्या बॅक्टेरियाचे प्रमाण जमिनीवरील एकूण बॅक्टेरियावर अवलंबून असते. त्याचा पदार्थाशी आणि पदार्थ जमिनीवर किती वेळ आहे याच्याशी काहीही संबंध नसतो. 

पृष्ठभागावर अवलंबून असतं

संशोधनातून सिद्ध झाल्यानुसार, एखाद्या पदार्थावर तो कोणत्या पृष्ठभागावर पडतो यावर परिणाम ठरतात. उदाहरणार्थ, जर एखादा पदार्थ लाकडावर किंवा टाइल्सऐवजी कारपेटवर पडला तर त्यावर कमी बॅक्टेरिया इफेक्ट करतात. बॅक्टेरियांचे संगोपन करण्यासाठी टाइल्स किंवा लाकडासारखे चिकट पृष्ठभाग परिणामकारक ठरतात. 

पदार्थांवरही अवलंबून असतात परिणाम

काही अभ्यासंकांच्या मते, पदार्थांवर बॅक्टेरिया किती प्रमाणात परिणाम करतात हे पदार्थ कोणता आहे यावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ, जॅम, जेली किंवा आईस्क्रिमसारखा चिकट पदार्थांवर सॅन्डविच, बिस्किट आणि फळांसारख्या शुष्क खाद्य पदार्थांच्या तुलनेत वेगाने बॅक्टेरिया चिकटतात. 

जमिनीवर पडलेलं अन्न खावं का?

हा प्रश्न अनुत्तरितच आहे, कारण जमिनीवर पडलेले अन्न पदार्थ खावे की नाही? हे त्या व्यक्तीच्या विचारांवर ठरतं. तसेच पदार्थ ज्या पृष्ठभागावर पडतो, त्या भागातील स्वच्छतेवरही अवलंबून असते. हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायकही ठरू शकते. त्यामुळे असं करणं शक्यतो टाळणचं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य