शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जेवणानंतर गोड खायची सवय आहे का? पण गोड जेवणाच्या आधी खावं की नंतर? जाणून घ्या उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 21:59 IST

गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खावा की सुरवातीला? याबाबतच आपण या बातमीत आपण जाणून घेणार आहोत.

सणवार असतील किंवा पार्टीमध्ये जेवण झालं, की काहीतरी डेझर्ट म्हणून गोड (Sweet) हवंच. सामान्यतः गोडाचा कोणताही पदार्थ सगळ्यात शेवटी खाल्ला जातो. आईस्क्रीम, मस्तानी, पुडिंग किंवा कोणत्याही प्रकारचं डेझर्ट हे शेवटी खाण्यालाच सर्वांची पसंती असते. आपली आवड आणि त्याची शरीराला असणारी गरज तसंच त्याचा शरीरावर होणारा परिणाम सारखेच असतील असं नाही. मग गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खावा की सुरवातीला? याबाबतच आपण या बातमीत आपण जाणून घेणार आहोत.

सण-समारंभांचं कोणतंही जेवण गोडाशिवाय पूर्ण होत नाही. बरेचदा रात्री जागरण करतानाही गोड खाण्याची तीव्र इच्छा (Sweet Cravings) होते. अशावेळी एखादं फळ खाण्यापेक्षा कायमच चॉकलेट, आईस्क्रीम, केक किंवा तत्सम गोड पदार्थांना प्राधान्य दिलं जातं. त्याचं कारण म्हणजे गोड अर्थात साखर (Sugar) खाल्याने मेंदू उत्तेजित होतो आणि त्यात डोपामाईन नावाचं रसायन स्रवतं. त्यामुळे रात्री-अपरात्री उठून चॉकलेटसारखे गोड पदार्थ खाण्याची इच्छा अनेकांना होते, पण जेवणानंतर किंवा रात्री उठून गोड खाण्याची ही सवय तब्येतीसाठी फारशी चांगली नसल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. याचे शरीरावर दूरगामी परिणाम दिसू शकतात. गोड पदार्थांमधून शरीरात जाणारी जास्तीची साखर हृदयासाठी घातक ठरू शकते. लठ्ठपणा, रक्तवाहिन्यांमधील जळजळ असे हृदयावर (Heart Disease) ताण येईल असे आजार यामुळे निर्माण होऊ शकतात. जेवणातील जास्तीच्या साखरेमुळे हृदयाच्या धमन्यांचे आजार होऊन मृत्युही ओढावण्याची शक्यता असते.

आयुर्वेदामध्ये अनेक रोग व आजारांवर औषधं सांगण्यात आली आहे. तसंच आजार होऊ नयेत म्हणून अनेक प्रतिबंधात्मक उपाय व दिनचर्येबाबतही अनेक चांगल्या सूचना आयुर्वेदामध्ये सांगितल्या आहेत. आधुनिक वैद्यक शास्रातील सध्याचं संशोधन आणि आयुर्वेदानुसार कोणताही गोड पदार्थ जेवणाच्या आधी खावा. आयुर्वेदामध्ये त्यामागची काही कारणंही सांगितली आहेत.

रात्रीच्या जेवणानंतर गोड खाल्ल्यास अन्नाचं विघटन होण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्यामुळे अर्थातच अन्नपचन (Digestion) लवकर होत नाही. त्यामुळे जेवणानंतर गोड खाण्यापेक्षा जेवणाआधी खाल्लं पाहिजे. तसं केल्याने जेवण पचण्यासाठी आवश्यक अशा लाळग्रंथींच्या स्त्रवण्यासाठी मदत होते व पुढील अन्न पचनाची प्रक्रिया सोपी होते. हेच जेवणानंतर गोड खाल्ल्याने पचनप्रक्रिया खूप वेळ चालू राहते. त्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. जेवणाआधी गोड खाल्ल्यामुळे चवीचं ज्ञान देणाऱ्या ग्रंथी उत्तेजित होऊन त्यामुळे पुढच्या जेवणाचा चांगल्याप्रकारे आस्वाद घेता येऊ शकतो. शेवटी गोड खाल्ल्यामुळे पोटातील जठराग्नी थंडावतो व पचनासंबंधीच्या सर्व क्रिया मंदावतात. यामुळे शरीरातील आम्ल वाढून जेवण आंबण्याची प्रक्रिया सुरू होते. यातूनच मग गॅसेस, गुठळ्या होणं असेही प्रकार सुरू होतात.

खरं तर कृत्रिम साखर शरीरासाठी फार चांगली नसते. त्यात ती पदार्थात वरून मिसळून खाल्ली तर अधिक समस्या निर्माण करते. कर्बोदके असलेल्या सर्व पदार्थांमध्ये साखर असते. धान्य, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये साखर असतेच. त्यामुळे ज्यात नैसर्गिकरित्या साखर असेल, अशी फळं, धान्य खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. फळ, भाज्यांमधील फायबर, काही महत्त्वाची जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स तसंच दुग्धजन्य पदार्थांमधील कॅल्शिअम व प्रोटीन्स शरीराला साखरेसोबतच इतरही महत्त्वाची पोषणमूल्यं देतात. त्यामुळे शरीराला सतत उर्जेचा (Power) पुरवठा सुरू राहतो. त्यामुळे अशाप्रकारे वनस्पतीजन्य पदार्थांतील म्हणजेच नैसर्गिक साखर शरीरासाठी घातक ठरत नाही.

एकूणच जेवणानंतर गोड खाण्यापेक्षा जेवणाआधी गोड पदार्थ खाणं केव्हाही उत्तम ठरू शकतं असं आयुर्वेदतज्ज्ञ आणि आधुनिक आरोग्यतज्ज्ञांचंही मत आहे. त्यामुळे गोड खाण्याची इच्छाही पूर्ण होईल व आरोग्यही उत्तम राहील.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स