शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

राज्यात स्वाइन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ, सर्वाधिक रुग्ण मुंबईत

By स्नेहा मोरे | Updated: September 14, 2022 19:57 IST

राज्यातील ६० टक्के रूग्ण केवळ ५ जिल्ह्यांमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत असून यातील सर्वाधिक रुग्ण मुंबईत नोंदविले  जात आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये २,२७८ अशी नोंदविण्यात आलेल्या रुग्णात आता या वर्षी आतापर्यंत ३,३२२ एवढे रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. आता गणपती उत्सवानंतर स्वाईन फ्लूच्या रुग्णात वाढ होण्याची शक्यता आरोग्य अधिकाऱ्याने वर्तविली आहे.

यंदा १२ सप्टेंबरपर्यंत राज्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या साथीच्या आजारापूर्वी २०१९ मध्ये नोंदवलेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत ४४ टक्यांनी वाढली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २०१९ मध्ये २,२७८ एच१एन१ रुग्ण होते. यंदा मात्र १२ सप्टेंबरपर्यंत ३,३२२ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत तर २०१९ यावर्षात याच कालावधीत २४६ मृत्यूंच्या तुलनेत मात्र यंदा १४७ मृत्यू अशी कमी नोंद झाली असल्याची दिलासादायी बाब आहे. दरम्यान यातील ६० टक्क्यांहून अधिक रुग्ण पाच जिल्ह्यांतील असून यात ८७० रुग्ण नोंदवून पुणे प्रथम क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या  क्रमांकावर मुंबई (३४५), ठाणे (३२७), नागपूर (१९८), नाशिक (१९७) आणि कोल्हापूर (१५५) असे रुग्ण नोंदविण्यात आले आहेत.

राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये  सर्वाधिक स्वाइन फ्लू नोंदवला जात असून स्वाइन फ्लूच्या अधिक चाचण्या करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान आधीच्या  संसर्गापासून अस्तित्वात असलेली प्रतिकारशक्ती पूर्वीच्या स्ट्रेनच्या संपर्कात आल्याने तयार झालेल्या प्रतिपिंडांना जुमानत नसल्याचा अंदाज त्या अधिकाऱ्याने व्यक्त केला.

दरम्यान, यावर बोलताना राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांच्या मते सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर उच्च जोखमीच्या रुग्णांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणे टाळावीत. उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहताना कोविडचे योग्य वर्तन पाळावे. इन्फ्लूएंझा सारख्या आजारांनी वेळीच वैद्यकीय सल्ला घेण्याचे सुचविले आहे.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रHealthआरोग्य