शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

जेवण झाल्यावर लगेच 'या' गोष्टी करणं पडू शकतं महागात, तुम्हीही हे करता का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 9:51 AM

आजच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमुळे आपल्या जेवण्या, झोपण्याचा आणि आंघोळीचा कोणताही ठरलेला वेळ नसतो. जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा या गोष्टी केल्या जातात.

(Image Credit : bestofme.in)

आजच्या धावपळीच्या लाइफस्टाईलमुळे आपल्या जेवण्या, झोपण्याचा आणि आंघोळीचा कोणताही ठरलेला वेळ नसतो. जेव्हाही वेळ मिळतो तेव्हा या गोष्टी केल्या जातात. पण या महत्वाच्या गोष्टींची वेळ चुकली तर या उलट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. वेगवेगळे आजार लगेच आपल्याला त्यांच्या जाळ्यात घेऊ लागतात. मग हजारो आणि लाखो रूपये हॉस्पिटलमध्ये खर्च करत बसावे लागतात. आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर खाण्या-पिण्यापासून दिवसातील सर्वच महत्वाच्या गोष्टी वेळेवर केल्या गेल्या पाहिजे. खासकरून जेवणानंतर लगेच काय करू नये याच्या काही गोष्टी खालीलप्रमाणे सांगता येतील. 

लगेच झोपू नका

अनेक लोक असे असतात ज्यांना जेवण केल्या-केल्या आळस येऊ लागतो आणि ते लगेच झोपतात. पण असं करणं फार नुकसानकारक ठरू शकतं. असं केल्याने तुमच्यात लठ्ठपणा वाढू शकतो आणि तुम्हाला पचनासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो.

लगेच फळं खाऊ नका

(Image Credit : dayafterindia.com)

असे मानले जाते की, जेवण केल्यावर फळं खावीत. पण जेवण केल्यावर लगेच फळं खाणं योग्य ठरत नाही. आयुर्वेदानुसार असं मानलं जातं की, जेवण केल्यावर लगेच फळं खाल्ल्याने पोटासंबंधी समस्या होऊ शकते. त्यामुळे जेवण झाल्यावर थोडा वेळ गेल्यानंतर फळं खावीत, लगेच खाऊ नयेत.

आंघोळ करू नका

(Image Credit : greenenergyofsanantonio.com)

तुम्हाला हे माहीत आहेच की, निरोगी शरीरासाठी वेळेवर आंघोळ करणे आणि जेवण करणे फार गरजेचं असतं. अनेक असेही लोक असतात जे जेवण केल्यानंतरच आंघोळ करतात. पण याने त्यांच्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. कारण जेवण केल्यानंतर आपल्या पोटात रक्ताचा प्रवाह वाढतो. ज्यामुळे आपली पचनक्रिया हळू होते. अर्थात याने वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात.

चहा घेऊ नका

काही लोक चहाचे फारच शौकीन असतात. त्यांना चहाची सवय लागलेली असते. मग हे लोक जेवण झाल्यावर लगेच चह घेतात. पण जेवण झाल्यावर लगेच चहा घेतल्याने पचनक्रियेसंबंधी समस्या होऊ शकते. इतकेच नाही तर तुम्हाला अॅसिडीटीची समस्याही होऊ शकते.

स्मोकिंग करू नका

(Image Credit : medicalnewstoday.com)

आपल्याजवळ असे अनेक लोक असतात जे जेवण केल्यानंतर लगेच स्मोकिंग करतात. असं करणं आरोग्यासाठी फारच नुकसानकारक ठरू शकतं.

लगेच फिरू नका

(Image Credit : lifealth.com)

असे मानले जाते की, जेवण केल्यावर थोडी शतपावली केल्याने अन्न चांगलं पचतं. आयुर्वेदानुसार, असं मानलं जातं की, जेवण केल्यावर लगेच चालू नये. थोडावेळ थांबून चालायला हवं. जर लगेच चालायला लागाल तर शरीराला योग्य पोषण मिळत नाही. आणि आपली पचनक्रियाही कमजोर होते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य