शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जर दुष्परिणाम टाळायचे असतील तर, कधीही पुन्हा गरम करू नका 'हे' पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 21:45 IST

आपण बरेचदा राहिलेले पदार्थ फ्रीजमध्ये साठवून ठेवतो आणि परत गरम करतो. पण तुम्हाला माहितीही नसेल की, काही पदार्थ असे आहेत, जे पुन्हा गरम करून खाल्ल्याने आपल्या आरोग्यास त्याचे धोके संभवतात.

आपण बरेचदा राहिलेले पदार्थ फ्रीजमध्ये साठवून ठेवतो आणि परत गरम करतो. पण तुम्हाला माहितीही नसेल की, काही पदार्थ असे आहेत, जे पुन्हा गरम करून खाल्ल्याने आपल्या आरोग्यास त्याचे धोके संभवतात. तसेच हे पदार्थ खाल्ल्याने अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही पुन्हा गरम करून खाणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.

भात:बरेच लोक रात्रीचा उरलेला भात पुन्हा गरम करून खातात. मात्रस फूड्स स्टँडर्ड एजन्सी(एफएसए)नुसार शिळा भात पुन्हा गरम केल्याने त्या व्यक्तीला फूड पॉईझनिंगची होऊ शकते. भात शिजवताना बॅसिलस सेरेस हे बॅक्टेरिया नष्ट होतात मात्र भात थंड होतात पुन्हा जिवंत होतात. त्यामुळे भात पुन्हा गरम केल्यास त्या व्यक्तीला फूड पॉईजनिंग होऊ शकते.

बीट:बीटही एकदा शिजवल्यानंतर पुन्हा गरम करू नये. असे केल्याने त्यातील नायट्रेट संपून जातात.

मशरूम:मशरूमची भाजी बनवल्यानंतर ती लगेचच खावी. दुसऱ्या दिवसासाठी ठेवू नये. मशरूम प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानला जातो. तसेच त्यात खनिजेही असतात. मात्र जेव्हा ही भाजी तुम्ही पुन्हा गरम करता तेव्हा यातील प्रोटीन्स नष्ट होतात. तसेच त्यात विषारी पदार्थ तयार होतात.

बटाट्याची भाजी:बटाट्याची भाजी प्रत्येकाला आवडत असते. मात्र ही भाजी पुन्हा गरम करून कधीच खाऊ नका. बटाट्यामध्ये व्हिटामिन बी६, पोटॅशियम आणि व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. ही भाजी जेव्हा पुन्हा गरम केली जाते तेव्हा त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. तसेच बटाट्याची भाजी वारंवार गरम केल्यास यात क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम नावाचे बॅक्टेरिया तयार होतात.  

पालक:पालक अथवा हिरव्या भाज्या , गाजर, ओवा यामध्ये नायट्रेट मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे मायक्रोव्हेवमध्ये ते गरम केल्यास त्यातील नायट्रोजन नायट्राईट आणि त्यानंतर नायट्रोजमीन्समध्ये बदलतात. ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

टॅग्स :Healthआरोग्यfoodअन्न