शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही पुन्हा पुन्हा आजारी पडण्याचं कारण तुमच्या बेडमध्येच तर दडलेलं नाही ना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 09:55 IST

दररोज दिवसभराच्या थकव्यानंतर प्रत्येकालाच आरामाची गरज असते. प्रत्येकाला कधी घरी जाऊन एकदाचं बेडवर पडतो असं होतं.

(Image Credit : Video Blocks)

दररोज दिवसभराच्या थकव्यानंतर प्रत्येकालाच आरामाची गरज असते. प्रत्येकाला कधी घरी जाऊन एकदाचं बेडवर पडतो असं होतं. खास बाब ही असते की, घरात प्रत्येकाचे बेड, उश्या आणि चादरी वेगवेगळ्या असतात. या वस्तू जर इतर कुणी वापरलेल्या काही लोकांना चालत नाही. किंवा चुकून दुसऱ्यांची उशी वापरावी लागली तर चांगली झोपही येत नाही. हेच चादर आणि उशी किंवा बेडबाबत होतं. पण तुम्हाला जर सतत सर्दी, ताप, कफ किंवा खोकला होत असेल तर याचं कारण तुमच्या बेडमध्येच लपलं आहे. 

दोन वर्ष आहे यांचं जीवन

जर तुम्हाला कोणत्या प्रकारची अ‍ॅलर्जी, इन्फेक्शन, खोकला किंवा सर्दी पुन्हा पुन्हा होत असेल तर तुम्ही वेळीच तुमची उशी बदलायला हवी. अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, कोणत्याही उशीचा दोन वर्षांपेक्षा अधिक वापर करू नये. दोन वर्षांपेक्षा जास्त जर उशीचा वापर केला गेला तर याने आरोग्याशी संबंधित समस्या होऊ शकतात. यात सर्वात जास्त धोका असतो तो अ‍ॅलर्जी आणि इन्फेक्शनचा.

असं का?

उशी आणि बेडबाबत वेळोवेळी वेगवेगळे रिसर्च होत असतात. एक्सपर्ट्स सांगतात की, २ वर्षांपेक्षा अधिक उशीचा वापर करू नये कारण त्यावर डेड स्कीन सेल्समुळे अनेकप्रकारचे बॅक्टेरिया आणि विषाणू वाढत असतात. हे श्वासासोबत आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आपल्याला आजारी करतात. अनेकदा या बॅक्टेरियामुळे स्कीन इन्फेक्शनचं कारणही ठरतात.

नेमकं चुकतं कुठे?

अनेकदा आपण केसांना ऑयलिंग केलेलं असतं आणि आपण उशीवर डोकं ठेवून झोपतो. यादरम्यान उशीच्या आतील फायबर आपल्या डोक्याचं तेल शोषून घेतं. सोबतच आपल्या डोक्याची डेड स्कीन सेल्सही उशीवर लागतात. तसेच धुळीचे कण, मातीही त्यात असते. अनेकजण आजारी असतात तेव्हाही याच उशींचा वापर करतात.  त्यामुळे समस्या कमी होण्याऐवजी अधिक वाढते. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, सामान्य स्थितीमध्ये आपण दर सहा महिन्यांनी उशी बदलायला हवी. 

गादीचं पण असतं लाइफ

तुमची गादी कॉटनची असो वा फोमची पण हे ध्यानात ठेवायला हवं की, गादीचं सुद्धा लाइफ असतं. अनेकदा डॉक्टरही गादी बदलण्याचा सल्ला देतात. केवळ गादीवरील चादर बदलून चालत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या गाद्यांची लाइफ वेगवेगळी असते. सामान्यपणे ५ ते १० वर्षात गादी बदलायला हवी असं सांगितलं जातं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स