शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

कच्च्या कांद्यामुळे फैलावणाऱ्या 'साल्मोनेला' आजाराची वाढतेय दहशत, जाणून घ्या लक्षणं अन् उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 17:37 IST

पांढऱ्या आणि पिवळ्या कांद्यामध्ये साल्मोनेला आढळून आला आहे. तेथे ज्या लोकांच्या घरात लाल, पिवळा आणि पांढरा कांदा आहे, त्यांनी ते फेकून द्यावेत, असा सल्ला सीडीएसने दिला आहे. सीडीएसला असे आढळून आले आहे की, सॅल्मोनेलाच्या (what is salmonella) संपर्कात आलेल्या ७५ टक्के लोकांनी कच्चा कांदा खाल्ला होता.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत साल्मोनेलाचा (salmonella) प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. अमेरिकेच्या ३७ राज्यांमध्ये साल्मोनेलामुळे ६५० लोक आजारी पडले आहेत. अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDS) ने यासाठी कांदा हा मुख्य स्त्रोत मानला आहे. वेबएमडीच्या बातमीनुसार, सीडीएसने म्हटले आहे की, मेक्सिकोमधून आयात केलेल्या कांद्यामध्ये साल्मोनेलाचा स्रोत सापडला आहे. लाल, पांढऱ्या आणि पिवळ्या कांद्यामध्ये साल्मोनेला आढळून आला आहे. तेथे ज्या लोकांच्या घरात लाल, पिवळा आणि पांढरा कांदा आहे, त्यांनी ते फेकून द्यावेत, असा सल्ला सीडीएसने दिला आहे. सीडीएसला असे आढळून आले आहे की, सॅल्मोनेलाच्या संपर्कात आलेल्या ७५ टक्के लोकांनी कच्चा कांदा खाल्ला होता.

साल्मोनेला दूषित पाणी किंवा अन्नामुळे होतोसाल्मोनेला संसर्ग किंवा साल्मोनेलोसिस हा एक सामान्य जीवाणूजन्य रोग आहे. ज्यामुळे अन्न विषबाधा होते. हा आजार पचनसंस्थेवर हल्ला करतो, ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. साल्मोनेला जीवाणू सामान्यतः प्राण्यांच्या आतड्यांमध्ये आढळतात आणि मानवाच्या शरीरातून पचनमार्गातून बाहेर जाते. साल्मोनेला दूषित पाणी किंवा अन्नाचे सेवन करून मानवांना या रोगाची लागण होऊ शकते.

साल्मोनेला रोगाचे कारणकच्चे मांस, चिकन इत्यादी खाल्ल्याने साल्मोनेला होऊ शकतो.  कच्च्या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये साल्मोनेला बॅक्टेरिया देखील असू शकतात, म्हणून कच्ची फळे आणि भाज्या खाताना काळजी घेणं आवश्यक आहे. अनपेस्चराइज्ड दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देखील साल्मोनेलाचे कारण असू शकतात. मऊ चीज, आइस्क्रीम आणि ताकात साल्मोनेला असू शकतो. कच्चे अंडे देखील साल्मोनेलाचे कारण असू शकते. आपण आपले हात नीट स्वच्छ केले नाही तरी साल्मोनेला संसर्ग होऊ शकतो. साल्मोनेला सामान्यतः प्राण्यांमध्ये आढळतो, म्हणून पाळीव प्राणी देखील साल्मोनेला वाहक असू शकतात.

या आजारात काय होतेसाल्मोनेला संसर्गामुळे, बहुतेक लोक अतिसार, ताप किंवा ओटीपोटात क्रॅम्पची तक्रार करतात. त्याची लक्षणे शरीरात सहा तास ते सहा दिवसांदरम्यान दिसतात. या बॅक्टेरियाचे काही प्रकार अतिशय धोकादायक असतात आणि ते मूत्र, रक्त, हाडे आणि मज्जासंस्थेवरही हल्ला करतात. या परिस्थितीत हे प्रकरण खूप धोकादायक असू शकते. सीडीएसने असा सल्ला दिला आहे की, जर डायरिया तीन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

उपचार काय आहेसहसा हा संसर्ग काही दिवसांनी बरा होतो. काही प्रकरणांमध्ये, डॉक्टरांना भेटणे आवश्यक असेल. डॉक्टर प्रतिजैविक घेण्याची शिफारस करतात. या संसर्गामध्ये अतिसार होतो, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता असते. म्हणूनच तुम्ही भरपूर पाणी प्यावे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स