शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीही पाणी पिताना या चुका करता का? लगेच सुधारा नाही तर होऊ शकतो कॅन्सर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 11:04 IST

Mistakes While Drinking Water : हेल्थ एक्सपर्टही नेहमी हेच सांगतात की, आपण जेवढं जास्त पाणी पिऊ तेवढं चांगलं असतं. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरापासून अनेक आजार दूर राहतात.

Mistakes While Drinking Water : पाण्याचं आपल्या जीवनात किती महत्व आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पाणी नाही मिळालं तर काय होतं यावरूनच हे कळतं. इतकंच नाही तर आपल्या शरीरातही 75 टक्के पाणी असतं. पाण्याशिवाय आपलं जीवन जगणं अशक्य आहे. हेल्थ एक्सपर्टही नेहमी हेच सांगतात की, आपण जेवढं जास्त पाणी पिऊ तेवढं चांगलं असतं. भरपूर पाणी प्यायल्याने शरीरापासून अनेक आजार दूर राहतात.

पाणी प्यायल्याने तुम्ही दिवसभर फ्रेश राहता. डॉक्टरांचा सल्ला असतो की, तुम्ही दिवसातून कमीत कमी 2 ते 3 लीटर पाणी प्यायला हवं. कारण शरीरात पाण्याची कमी झाली तर सेल्सना योग्यपणे ऑक्सिजन मिळत नाही. पण पाणी पिताना तुम्हाला हेही माहीत असायला हवं की, पाणी पिताना तुम्ही कही चुका तर करत नाही ना? कारण पाणी पिताना काही चुका केल्या तर तुम्हाला समस्याही होऊ शकतात. असाच एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यात सांगण्यात आलं आहे की, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी पित असाल तर तुम्हाला कॅन्सरही होऊ शकतो.पाणी पिताना केल्या जाणाऱ्या चुका

1) प्लास्टिक बॉटलमधून पिऊ नका पाणी

आजकाल प्लास्टिकचा वापर खूप वाढला आहे. लोक पाणी पिण्यासाठी जास्तीत जास्त प्लास्टिकच्या बॉटलचा वापर करतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, प्लास्टिकची बॉटल आरोग्यासाठी किती नुकसानकारक आहे. एका रिसर्चनुसार, प्लास्टिकच्या बॉटलमध्ये मायक्रोप्लास्टिक असतात. याने प्लास्टिकचा कचरा पाण्याती मिक्स होतो आणि हेच मायक्रोप्लास्टिक रक्तात पोल्यूशन पसरवतं. यानेच पाणी पिण्याचा मार्ग म्हणजे गळ्याचे अवयव खराब होतात. ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

2) किती पाणी प्यावं?

जर तुम्ही भरपूर पाणी पित असाल तर याने तुम्ही डिहायड्रेशनपासून वाचता. जास्त गरमी असेल तेव्हा भरपूर पाणी प्यायला हवं. शरीरात पाणी कमी झालं तर चक्कर येतात. एक्सपर्ट्स सांगतात की, वयस्क व्यक्तीने शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी दिवसातून 7 ते 8 ग्लास पाणी प्यावं.

3) पाणी कसं प्यावं?

जास्तीत जास्त लोक पाणी पिताना काही चुका करतात. जसे की, फ्रीजमध्ये ठेवली बॉटल काढून लगेच पाणी पिणे. सोबतच काही लोक एकाचवेळी भरपूर पाणी पितात. इतकंच नाही तर जेवणादरम्यान आणि जेवण केल्यावर लगेच पाणी पितात. जे चुकीचं आहे. हाय मिनरल्स असलेलं पाणी पिणं टाळलं पाहिजे. या सगळ्या सवयींमुळे तुम्ही आजारी पडू शकता. उभं राहून पाणी पिऊ नका. थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावं. 

4) कधी पाणी पिणे फायदेशीर

आंघोळ करण्याच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने ब्लड प्रेशरची समस्या राहत नाही आणि झोपण्याआधी पाणी प्यायल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. एक्सरसाइज केल्यावर पाणी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या होणार नाही.

5) असं अजिबात करू नका

आयुर्वेदानुसार, पाणी शांतपणे खाली बसून आरामात प्यावे. उभं राहून गटागट पाणी प्यायल्याने पाणी वेगाने पोटाच्या खालच्या भागात जातं. त्यामुळे पाण्यातील पोषक तत्व शरीराला मिळत नाहीत आणि वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. तसेच पाणी एकदाच गटागट करून पिऊ नये. एक एक घोट घेत हळू पाणी प्यावे. याचं कारण आपण जेव्हा पाणी पितो तेव्हा पाण्यासोबत आपली लाळही पोटात जाते. याने पचनक्रिया मजबूत होण्यास मदत मिळते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य