शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुलांना होणारा क्षय कसा ओळखाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 13:18 IST

क्षयरोगाचे खोकल्यापेक्षा दुसरे कोणतेही लक्षण आपल्याला माहिती नसते त्यामुळे क्षयाचे निदान लवकर होत नाही. त्यामुळे काही लक्षणे दिसून आल्यास मुलांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे असते.

मुंबई- जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 10 लाख मुलांना दरवर्षी क्षयरोग होतो. उपचार वेळीच न मिळाल्यामुळे त्यातील 2 लाख मुलांना आपले प्राण गमवावे लागतात. क्षयरोगाचे खोकल्यापेक्षा दुसरे कोणतेही लक्षण आपल्याला माहिती नसते त्यामुळे क्षयाचे निदान लवकर होत नाही. त्यामुळे काही लक्षणे दिसून आल्यास मुलांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे असते. पुढील काही लक्षणांकडे लक्ष ठेवल्यास मुलांना टीबीपासून वाचवता येणे शक्य आहे.वयानुसार मुलांची वाढ होणे गरजेचे आहे. मात्र काही मुलांची प्रकृती नाजूक असते. त्यांच्या शरीराची वाढ होत नाही. योग्य आहार आणि काळजी घेऊनही त्यांची वाढ होत नसेल तर मुलांची डॉक्टरकडून तपासणी करुन घेणे गरजेचे आहे.

 अनेकदा लहान मुलांच्या गळ्याच्या शिरा सुजलेल्या दिसतात. कधीकधी मुलांना यामुळे वेदना होत असतात. अशा स्थितीतही डॉक्टरचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

मुलांना वारंवार थंडी लागत असेल तरीही त्यांची क्षयाची तपासणी करून घेतली पाहिजे. डॉक्टरांना दाखवून वारंवार थंडी लागणे, ताप येणे, घाम य़ेणे अशा तक्रारींचे निदान करुन घ्यावे.

15 वर्षांपेक्षा लहान असणाऱ्या काही मुलांच्या छातीमध्ये सतत दुखत असते. जर बाहेरून कोणतीही जखम झालेलली नसता त्यांना वेदना जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

जर 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला, अचानक वजन घटणे अशी लक्षणे दिसली तरीही त्यांना तात्काळ डॉक्टरला दाखवणे आवश्यक आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स