शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

का होते डोकेदुखी आणि किती प्रकारची असते डोकेदुखी? करा हे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 11:50 IST

सुरुवातीला हळूहळू होणारी डोकेदुखी नंतर वाढत जाते. काहींना तर असह्य वेदना होतात. कधी कधी तर वेदना इतक्या होतात की, औषध घेतल्यावरही डोकेदुखी कमी होत नाही.

(Image Credit : parade.com)

डोकेदुखी ही अलिकडे सामान्य समस्या झाली आहे. सुरुवातीला हळूहळू होणारी डोकेदुखी नंतर वाढत जाते. काहींना तर असह्य वेदना होतात. कधी कधी तर वेदना इतक्या होतात की, औषध घेतल्यावरही डोकेदुखी कमी होत नाही.

का होते डोकेदुखी?

डोकेदुखी प्रामुख्याने तणाव, जास्त शारीरिक आणि मानसिक परिश्रम, कमी झोप, भूक, जास्त आवाजामुळे, इलेक्ट्रिक उपकरणांच्या अधिक प्रयोगामुळे होते. कधी कधी जास्त विचार करणे, कमी पाणी पिणे यानेही डोकेदुखी होते. 

डोकेदुखीची प्रमुख कारणे -

तणाव

जेव्हा शरीर आणि मनाला तणाव सांभाळणे कठिण होऊन बसते तेव्हा डोकेदुखी होऊ लागते. विपश्यना किंना ध्यान डोकेदुखी कमी करण्यास मदत करतं. जितकं जास्तवेळ तुम्ही ध्यान लावून बसाल तितका तुमचा तणाव दूर होतो. 

मन आणि शरीराचा थकवा

दिवसभर घर आणि ऑफिसच्या कामासाठी धावपळ करावी लागते. जेव्हा थकवा शरीरासोबत मनावर वाढतो तेव्हा दोन्हीमुळे डोकेदुखी होते. 

असंतुलित शारीरिक तंत्र

तुमच्या कधी लक्षात आलं असेल की, जेव्हा तुमचं पोट खराब असतं तेव्हा तुम्हाला डोकेदुखी होत असेल. आपल्या शरीराचे वेगवेगळे अंग एकमेकांशी चांगल्याप्रकारे जुळलेले आहेत. त्यामुळे एका भागात कोणत्याही प्रकारचं असंतुलन दुसऱ्या भागाला प्रभावित करतं. 

लो ब्लड सर्कुलेशन

डोक्यामध्ये कमी रक्त पुरवठा झाल्यावरही डोकेदुखी होऊ लागते. त्यामुळे दिवसातून केवळ १० ते १५ मिनिटे ध्यान लावून बसाल तर याने शरीराला शांतता मिळेल आणि रक्तप्रवाह सुद्धा नीट होईल. 

कमी झोप घेणे

खूप जास्त वेळ काम करणे, जास्त काम करण्याची सवय किंवा टीव्ही आणि इंटरनेटची सवय यामुळे रात्री उशीरा झोपणे होते. पण या सवयी आरोग्यासाठी चांगल्या नाहीयेत. याने तुमची झोप पूर्ण होत नाही आणि हेच डोकेदुखीचं कारण ठरु शकतं. 

अत्याधिक गोंधळ

आपण अनेकदा अत्याधिक आवाज, कर्णकर्कश आवाज अनुभवला असेल. काहींना अजिबातच हा आवाज सहन होत नाही. अशांना लवकरच डोकेदुखी होऊ लागते. 

फोनवर जास्तवेळ बोलणे

फोनवर जास्तवेळ बोलणे टाळायला हवे. याने तुमचा त्रास वाढू शकतो. दिवसभर क्लाईंटसोबत बोलणे, नंतर मित्रांशी बोलणे हे अनेकदा होतं. पम फोनवर जास्तवेळ बोलल्याने डोकेदुखी होऊ शकते.                                                                                                                                                                                                                     प्रमाणापेक्षा जास्त विचार करणे

जास्त विचार करणेही तुमची डोकेदुखी वाढवू शकतं. रोजची धावपळ, तणाव, कामाचा ताण, परिवाराचं टेन्शन, संबंधातील तणाव हे सगळं असतंच. पण दिवसातून थोडा वेळ शांत डोळे लावून ध्यान केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स