शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

का होते डोकेदुखी आणि किती प्रकारची असते डोकेदुखी? करा हे उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 11:50 IST

सुरुवातीला हळूहळू होणारी डोकेदुखी नंतर वाढत जाते. काहींना तर असह्य वेदना होतात. कधी कधी तर वेदना इतक्या होतात की, औषध घेतल्यावरही डोकेदुखी कमी होत नाही.

(Image Credit : parade.com)

डोकेदुखी ही अलिकडे सामान्य समस्या झाली आहे. सुरुवातीला हळूहळू होणारी डोकेदुखी नंतर वाढत जाते. काहींना तर असह्य वेदना होतात. कधी कधी तर वेदना इतक्या होतात की, औषध घेतल्यावरही डोकेदुखी कमी होत नाही.

का होते डोकेदुखी?

डोकेदुखी प्रामुख्याने तणाव, जास्त शारीरिक आणि मानसिक परिश्रम, कमी झोप, भूक, जास्त आवाजामुळे, इलेक्ट्रिक उपकरणांच्या अधिक प्रयोगामुळे होते. कधी कधी जास्त विचार करणे, कमी पाणी पिणे यानेही डोकेदुखी होते. 

डोकेदुखीची प्रमुख कारणे -

तणाव

जेव्हा शरीर आणि मनाला तणाव सांभाळणे कठिण होऊन बसते तेव्हा डोकेदुखी होऊ लागते. विपश्यना किंना ध्यान डोकेदुखी कमी करण्यास मदत करतं. जितकं जास्तवेळ तुम्ही ध्यान लावून बसाल तितका तुमचा तणाव दूर होतो. 

मन आणि शरीराचा थकवा

दिवसभर घर आणि ऑफिसच्या कामासाठी धावपळ करावी लागते. जेव्हा थकवा शरीरासोबत मनावर वाढतो तेव्हा दोन्हीमुळे डोकेदुखी होते. 

असंतुलित शारीरिक तंत्र

तुमच्या कधी लक्षात आलं असेल की, जेव्हा तुमचं पोट खराब असतं तेव्हा तुम्हाला डोकेदुखी होत असेल. आपल्या शरीराचे वेगवेगळे अंग एकमेकांशी चांगल्याप्रकारे जुळलेले आहेत. त्यामुळे एका भागात कोणत्याही प्रकारचं असंतुलन दुसऱ्या भागाला प्रभावित करतं. 

लो ब्लड सर्कुलेशन

डोक्यामध्ये कमी रक्त पुरवठा झाल्यावरही डोकेदुखी होऊ लागते. त्यामुळे दिवसातून केवळ १० ते १५ मिनिटे ध्यान लावून बसाल तर याने शरीराला शांतता मिळेल आणि रक्तप्रवाह सुद्धा नीट होईल. 

कमी झोप घेणे

खूप जास्त वेळ काम करणे, जास्त काम करण्याची सवय किंवा टीव्ही आणि इंटरनेटची सवय यामुळे रात्री उशीरा झोपणे होते. पण या सवयी आरोग्यासाठी चांगल्या नाहीयेत. याने तुमची झोप पूर्ण होत नाही आणि हेच डोकेदुखीचं कारण ठरु शकतं. 

अत्याधिक गोंधळ

आपण अनेकदा अत्याधिक आवाज, कर्णकर्कश आवाज अनुभवला असेल. काहींना अजिबातच हा आवाज सहन होत नाही. अशांना लवकरच डोकेदुखी होऊ लागते. 

फोनवर जास्तवेळ बोलणे

फोनवर जास्तवेळ बोलणे टाळायला हवे. याने तुमचा त्रास वाढू शकतो. दिवसभर क्लाईंटसोबत बोलणे, नंतर मित्रांशी बोलणे हे अनेकदा होतं. पम फोनवर जास्तवेळ बोलल्याने डोकेदुखी होऊ शकते.                                                                                                                                                                                                                     प्रमाणापेक्षा जास्त विचार करणे

जास्त विचार करणेही तुमची डोकेदुखी वाढवू शकतं. रोजची धावपळ, तणाव, कामाचा ताण, परिवाराचं टेन्शन, संबंधातील तणाव हे सगळं असतंच. पण दिवसातून थोडा वेळ शांत डोळे लावून ध्यान केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.  

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स