शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वयानुसार मुलांना नेमकी किती तास झोप हवी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 10:18 IST

मुलांच्या शाळेच्या वेळेबद्दल सध्या बरीच चर्चा चालू आहे.

मुलांच्या शाळेच्या वेळेबद्दल सध्या बरीच चर्चा चालू आहे. मुलांची झोप अपूर्ण होतेय. शाळा उशिरा म्हणजे नऊनंतर भरवावी, वगैरे वगैरे. त्यानुसार मुलांचे पोषण करावे. मुलांच्या विकासासाठी योग्य आहार आणि शरीराला आरामाची नितांत गरज असते. आरामातून शरीर वाढ होते, मेंदू वाढीसाठी झोपेची गरज असते. झोपेची गरज वयोमानानुसार बदलत असते. 

१. जन्म ते ४ महिने: १८ ते २२ तास २. ४ महिने ते १२ महिने: १२ ते १६ तास ३. एक ते २ वर्षे : ११ ते १४ तास ४. ३ ते ५ वर्षे :  १० ते १३ तास ५. ६ ते १२ वर्षे : ९ ते १२ तास ६. १३ ते १८ वर्षे : ८ ते १० तास 

वरील वेळ वयोमानानुसार झोपेची गरज असते. सहसा शालेय जीवनात ९ ते १३ तास झोपेची आवश्यकता असते. झोप पूर्ण झाल्याने मुलांची आकलनविषयक शक्ती वाढते आणि भाषाविषयक ज्ञान वाढते. आकलनविषयक म्हणजे वैचारिक आणि काल्पनिक शक्ती, आठवण शक्ती, तर्क-वितर्क हे बुद्धीचे कार्यप्रणाली. बऱ्याच शास्त्रीय संशोधनात असे आढळून आले, की जी मुले कमी झोपतात, ते शाळेत मध्येच डुलकी घेतात. त्यामुळे त्यांची बुद्धी कौशल्य विकसित झालेले नव्हते. 

अपुरी झोप झाल्याने मुले शाळेत झोपी जातात, चिडचिडे होतात. त्यांचं अभ्यासात लक्ष नसते. ते मंद होतात. त्यांची निर्णय क्षमता कमी होते, मनातील द्वंद्व सोडविता येत नाही. झोपेची कमतरता बराच काळ चालू राहिला तर मुलांत विशेषतः कुमार वयात डिप्रेशन, चिंतेचा आजार होऊ शकतो. एका संशोधनात आढळले की ९ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या मुलांत ‘ग्रे मॅटर’ कमतरता असते. हा ‘ग्रे मॅटर’ एकाग्रता, आठवणशक्ती, प्रसन्नता यासाठी आवश्यक असतो. सर्व प्रथम, रात्री उशिरापर्यंत जागरण करणे हे समाजात प्रचलित होत चाललेले आहे. काही घरगुती समारंभ, वाढदिवसाची पार्टी हे रात्री उशिरा चालतात.  

दुसरे, दुसऱ्या दिवशी सुटी आहे म्हणून रात्री उशिरापर्यंत काहीतरी प्लॅन बनविणे, दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत झोपणे किंवा प्रत्येक शनिवारी असा रात्री उशिरापर्यंतचा काहीतरी कार्यक्रम करणे, अशी दिनचर्या होत चालली आहे. पालकांचे बघून मुलेही अशी जीवन पद्धती अवलंब करतात. 

एकंदरीत, या लहान मुलांचे मेंदू दिवसभर स्पर्धेसाठी, काहीतरी साध्य करण्यासाठी सक्रिय असतात. ते केल्यावर बदललेल्या जीवनमानामुळे त्या मेंदूला विश्रांती घेता येत नाही. मग मेंदने सक्रिय होऊन साध्य केलेले मजबूत आणि घट्ट कौशल्य कसे होणार?-डॉ. शैलेश उमाटे, मानसोपचारतज्ज्ञ 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स