शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

वयानुसार मुलांना नेमकी किती तास झोप हवी? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 10:18 IST

मुलांच्या शाळेच्या वेळेबद्दल सध्या बरीच चर्चा चालू आहे.

मुलांच्या शाळेच्या वेळेबद्दल सध्या बरीच चर्चा चालू आहे. मुलांची झोप अपूर्ण होतेय. शाळा उशिरा म्हणजे नऊनंतर भरवावी, वगैरे वगैरे. त्यानुसार मुलांचे पोषण करावे. मुलांच्या विकासासाठी योग्य आहार आणि शरीराला आरामाची नितांत गरज असते. आरामातून शरीर वाढ होते, मेंदू वाढीसाठी झोपेची गरज असते. झोपेची गरज वयोमानानुसार बदलत असते. 

१. जन्म ते ४ महिने: १८ ते २२ तास २. ४ महिने ते १२ महिने: १२ ते १६ तास ३. एक ते २ वर्षे : ११ ते १४ तास ४. ३ ते ५ वर्षे :  १० ते १३ तास ५. ६ ते १२ वर्षे : ९ ते १२ तास ६. १३ ते १८ वर्षे : ८ ते १० तास 

वरील वेळ वयोमानानुसार झोपेची गरज असते. सहसा शालेय जीवनात ९ ते १३ तास झोपेची आवश्यकता असते. झोप पूर्ण झाल्याने मुलांची आकलनविषयक शक्ती वाढते आणि भाषाविषयक ज्ञान वाढते. आकलनविषयक म्हणजे वैचारिक आणि काल्पनिक शक्ती, आठवण शक्ती, तर्क-वितर्क हे बुद्धीचे कार्यप्रणाली. बऱ्याच शास्त्रीय संशोधनात असे आढळून आले, की जी मुले कमी झोपतात, ते शाळेत मध्येच डुलकी घेतात. त्यामुळे त्यांची बुद्धी कौशल्य विकसित झालेले नव्हते. 

अपुरी झोप झाल्याने मुले शाळेत झोपी जातात, चिडचिडे होतात. त्यांचं अभ्यासात लक्ष नसते. ते मंद होतात. त्यांची निर्णय क्षमता कमी होते, मनातील द्वंद्व सोडविता येत नाही. झोपेची कमतरता बराच काळ चालू राहिला तर मुलांत विशेषतः कुमार वयात डिप्रेशन, चिंतेचा आजार होऊ शकतो. एका संशोधनात आढळले की ९ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या मुलांत ‘ग्रे मॅटर’ कमतरता असते. हा ‘ग्रे मॅटर’ एकाग्रता, आठवणशक्ती, प्रसन्नता यासाठी आवश्यक असतो. सर्व प्रथम, रात्री उशिरापर्यंत जागरण करणे हे समाजात प्रचलित होत चाललेले आहे. काही घरगुती समारंभ, वाढदिवसाची पार्टी हे रात्री उशिरा चालतात.  

दुसरे, दुसऱ्या दिवशी सुटी आहे म्हणून रात्री उशिरापर्यंत काहीतरी प्लॅन बनविणे, दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत झोपणे किंवा प्रत्येक शनिवारी असा रात्री उशिरापर्यंतचा काहीतरी कार्यक्रम करणे, अशी दिनचर्या होत चालली आहे. पालकांचे बघून मुलेही अशी जीवन पद्धती अवलंब करतात. 

एकंदरीत, या लहान मुलांचे मेंदू दिवसभर स्पर्धेसाठी, काहीतरी साध्य करण्यासाठी सक्रिय असतात. ते केल्यावर बदललेल्या जीवनमानामुळे त्या मेंदूला विश्रांती घेता येत नाही. मग मेंदने सक्रिय होऊन साध्य केलेले मजबूत आणि घट्ट कौशल्य कसे होणार?-डॉ. शैलेश उमाटे, मानसोपचारतज्ज्ञ 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स