शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

श्रावणात कसे ठेवाल डाएटवर नियंत्रण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 18:47 IST

वेळी-अवेळी उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी आणि अपचन यासारखे आजार जडतात आणि मग कसला उपवास आणि कसलं काय?

‘हसरा नाचरा, जरासा लाजरा                   सुंदर साजरा, श्रावण आला ’ असे म्हणत प्रत्येक गृहिणी श्रावण महिन्याचे स्वागत करते. श्रावण महिन्यात असलेल्या सणावारांमुळे या महिन्याला एक आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मंगळागौरी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, श्रावणी सोमवार, नागपंचमी, तीज हे सण श्रावणात असतात. या दिवसांत महिलांमध्ये खमंग चर्चा सुरू होते ती या महिन्यात कराव्या लागणाºया उपवासांची. खरं पाहिलं तर उपवासाच्या दिवशी एवढे पदार्थ खाल्ले जातात की, जेवढे  पदार्थ आपण उपवास नसताना कधीच खात नाही. वेळी-अवेळी उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी आणि अपचन यासारखे आजार जडतात आणि मग कसला उपवास आणि कसलं काय? संपूर्ण दिवस गोळ्या औषधी घेण्यातच जातो. आपल्याला उपवासाच्या दिवसांत कु ठलाच त्रास होऊ नये आणि निरोगी स्वास्थ्यासह देवाची आराधना करावी असे वाटत असेल तर मग डाएटवर नियंत्रण कसे ठेवता येईल यासाठीच्या काही टिप्सचा आढावा आज घेऊयात...* उपवासाचा ‘फील’ नको :‘मला आज उपवास आहे, उपवास आहे’ असे म्हणत आपण साबुदाणा खिचडी, वडे, भगर, चीप्स, रताळ्याची खीर, साबुदाणा खीर असे एक ना अनेक पदार्थ दिवसभर खात असतो. अतिप्रमाणात पदार्थ खाल्ल्याने पचनशक्ती मंदावते आणि मग सुरू होतो अपचन आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास. उपवास म्हणजे हसत-खेळत करायला हवा. सकाळी एकदा उपवासाचा पदार्थ खाल्ल्यानंतर दुपारी वाटले तर खावे अन्यथा एखादे फळ खावे. त्यानंतर संध्याकाळीही फळ किंवा ज्यूस सेवन करावा. कारण, रात्रीच्या वेळी थोडंसं ‘लाईट’ खाद्यपदार्थाचे सेवन केले पाहिजे. उपवासाच्या दिवशी असे समजावे की, आपण आज डाएटवर आहोत.  * पुरेशी झोप असते आवश्यक : केवळ उपवासाचे पदार्थ कमी खाल्ले म्हणजे आपली तब्येत चांगली राहील असे मुळीच नाही. जसे पोटासाठी काहीतरी खाणं आवश्यक असतं तसंच निरोगी स्वास्थ्यासाठी पुरेशी झोप घेणेही तेवढेच आवश्यक असते. त्याशिवाय दिवसभर फ्रेश वाटत नाही आणि उगीचच असे वाटत राहते की, आपल्याला उपवास आहे, अशक्तपणा जाणवतोय. पुरेशी झोप घेतली म्हणजे मनही शांत राहते आणि जास्त खाण्याकडे लक्ष जात नाही. कमीत कमी दोन-तीन तास तरी झोप उपवास असलेल्या दिवसांमध्ये घ्यायला हवी. त्यामुळे खूप अ‍ॅक्टिव्ह राहण्यास मदत होते आणि शरीर हलके झाल्याचा ‘फील’ येतो.* फळे, ज्यूस, सुका मेवा यावर असावा भर : उपवास म्हटला की, साबुदाण्याचे विविध पदार्थ करून आपण खातो. पण साबुदाणा हा पचायला फारच जड असतो. या दिवसात जेवढे पचायला हलके पदार्थ खाता येईल तेवढे खायला हवेत. उदा. फळे, ज्यूस, सुकामेवा या पदार्थांमुळे शरीराला शक्तीही मिळते आणि सुस्त, आळशी फिलिंग जाऊन शरीर हलके झाल्यासारखे वाटते. श्रावण महिना म्हणजे पावसाळा ऋतू. या दिवसातील थंड वातावरणामुळे सुका मेवा, फळे पचण्यास लवकर मदत होते. असे पदार्थ थोडे जरी खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे साबुदाणा खाण्यापेक्षा सुका मेव्याचे सेवन वाढवावे.* नियमित व्यायाम : श्रावणात उपवास म्हणत म्हणत आपण एवढे खातो की, वजन वाढते. मग वजन वाढले की, स्वत:ला आरशात पाहण्याचीही आपली इच्छा होत नाही. उपवासाच्या दिवशी तुम्ही कुठलाही आहार घ्या; पण नियमित व्यायाम करा. म्हणजे तुम्ही जेवढे खाल तेवढे तुम्ही जिरवता. त्यामुळे  तुम्हाला रात्रीच्या वेळीही साबुदाण्याचे पदार्थ खाता येऊ शकतील. व्यायाम प्रकारात मयुरासन, भुजंगासन, प्राणायाम, योगा, हाता-पायाचे व्यायाम करावेत. त्यामुळे तुमचा घाम गेल्यानंतर काहीतरी खाण्याची इच्छा नक्कीच होईल, यात काही शंका नाही.