शहरं
Join us  
Trending Stories
1
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
2
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
3
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
4
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
5
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्य तयार
6
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
7
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
8
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
9
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
10
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
11
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
12
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
13
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
14
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
15
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
16
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
17
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
18
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
19
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
20
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी

श्रावणात कसे ठेवाल डाएटवर नियंत्रण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2016 18:47 IST

वेळी-अवेळी उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी आणि अपचन यासारखे आजार जडतात आणि मग कसला उपवास आणि कसलं काय?

‘हसरा नाचरा, जरासा लाजरा                   सुंदर साजरा, श्रावण आला ’ असे म्हणत प्रत्येक गृहिणी श्रावण महिन्याचे स्वागत करते. श्रावण महिन्यात असलेल्या सणावारांमुळे या महिन्याला एक आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मंगळागौरी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, श्रावणी सोमवार, नागपंचमी, तीज हे सण श्रावणात असतात. या दिवसांत महिलांमध्ये खमंग चर्चा सुरू होते ती या महिन्यात कराव्या लागणाºया उपवासांची. खरं पाहिलं तर उपवासाच्या दिवशी एवढे पदार्थ खाल्ले जातात की, जेवढे  पदार्थ आपण उपवास नसताना कधीच खात नाही. वेळी-अवेळी उपवासाचे पदार्थ खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी आणि अपचन यासारखे आजार जडतात आणि मग कसला उपवास आणि कसलं काय? संपूर्ण दिवस गोळ्या औषधी घेण्यातच जातो. आपल्याला उपवासाच्या दिवसांत कु ठलाच त्रास होऊ नये आणि निरोगी स्वास्थ्यासह देवाची आराधना करावी असे वाटत असेल तर मग डाएटवर नियंत्रण कसे ठेवता येईल यासाठीच्या काही टिप्सचा आढावा आज घेऊयात...* उपवासाचा ‘फील’ नको :‘मला आज उपवास आहे, उपवास आहे’ असे म्हणत आपण साबुदाणा खिचडी, वडे, भगर, चीप्स, रताळ्याची खीर, साबुदाणा खीर असे एक ना अनेक पदार्थ दिवसभर खात असतो. अतिप्रमाणात पदार्थ खाल्ल्याने पचनशक्ती मंदावते आणि मग सुरू होतो अपचन आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास. उपवास म्हणजे हसत-खेळत करायला हवा. सकाळी एकदा उपवासाचा पदार्थ खाल्ल्यानंतर दुपारी वाटले तर खावे अन्यथा एखादे फळ खावे. त्यानंतर संध्याकाळीही फळ किंवा ज्यूस सेवन करावा. कारण, रात्रीच्या वेळी थोडंसं ‘लाईट’ खाद्यपदार्थाचे सेवन केले पाहिजे. उपवासाच्या दिवशी असे समजावे की, आपण आज डाएटवर आहोत.  * पुरेशी झोप असते आवश्यक : केवळ उपवासाचे पदार्थ कमी खाल्ले म्हणजे आपली तब्येत चांगली राहील असे मुळीच नाही. जसे पोटासाठी काहीतरी खाणं आवश्यक असतं तसंच निरोगी स्वास्थ्यासाठी पुरेशी झोप घेणेही तेवढेच आवश्यक असते. त्याशिवाय दिवसभर फ्रेश वाटत नाही आणि उगीचच असे वाटत राहते की, आपल्याला उपवास आहे, अशक्तपणा जाणवतोय. पुरेशी झोप घेतली म्हणजे मनही शांत राहते आणि जास्त खाण्याकडे लक्ष जात नाही. कमीत कमी दोन-तीन तास तरी झोप उपवास असलेल्या दिवसांमध्ये घ्यायला हवी. त्यामुळे खूप अ‍ॅक्टिव्ह राहण्यास मदत होते आणि शरीर हलके झाल्याचा ‘फील’ येतो.* फळे, ज्यूस, सुका मेवा यावर असावा भर : उपवास म्हटला की, साबुदाण्याचे विविध पदार्थ करून आपण खातो. पण साबुदाणा हा पचायला फारच जड असतो. या दिवसात जेवढे पचायला हलके पदार्थ खाता येईल तेवढे खायला हवेत. उदा. फळे, ज्यूस, सुकामेवा या पदार्थांमुळे शरीराला शक्तीही मिळते आणि सुस्त, आळशी फिलिंग जाऊन शरीर हलके झाल्यासारखे वाटते. श्रावण महिना म्हणजे पावसाळा ऋतू. या दिवसातील थंड वातावरणामुळे सुका मेवा, फळे पचण्यास लवकर मदत होते. असे पदार्थ थोडे जरी खाल्ले तरी पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे साबुदाणा खाण्यापेक्षा सुका मेव्याचे सेवन वाढवावे.* नियमित व्यायाम : श्रावणात उपवास म्हणत म्हणत आपण एवढे खातो की, वजन वाढते. मग वजन वाढले की, स्वत:ला आरशात पाहण्याचीही आपली इच्छा होत नाही. उपवासाच्या दिवशी तुम्ही कुठलाही आहार घ्या; पण नियमित व्यायाम करा. म्हणजे तुम्ही जेवढे खाल तेवढे तुम्ही जिरवता. त्यामुळे  तुम्हाला रात्रीच्या वेळीही साबुदाण्याचे पदार्थ खाता येऊ शकतील. व्यायाम प्रकारात मयुरासन, भुजंगासन, प्राणायाम, योगा, हाता-पायाचे व्यायाम करावेत. त्यामुळे तुमचा घाम गेल्यानंतर काहीतरी खाण्याची इच्छा नक्कीच होईल, यात काही शंका नाही.