शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

Health Tips : गरम की थंड पाणी, आंघोळीसाठी काय फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 14:25 IST

Fitness Tips : सामान्यपणेलोक थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करतात. तर उन्हाळ्यात थंड पाण्याचा वापर केला जातो. थंड आणि गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे आणि नुकसान याबाबत तज्ज्ञांनी रिसर्च केले आहेत.

अनेकजण थंड पाण्याने तर काही जण गरम पाण्याने आंघोळ करतात. पण यावर एक चर्चा नेहमीच होते की, थंड पाण्याने आंघोळ (Bathing Tips) करणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं की, गरम पाण्याने आंघोळ करणं. तज्ज्ञ सांगतात की, आंघोळीच्या पाण्याचा तापमान कमी असावं किंवा कमी. याबाबत प्रत्येकाला व्यक्तिगत आवड वेगवेगळी असू शकते. सामान्यपणे लोक थंडीच्या दिवसात गरम पाण्याने आंघोळ करतात. तर उन्हाळ्यात थंड पाण्याचा वापर केला जातो. थंड आणि गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे आणि नुकसान याबाबत तज्ज्ञांनी रिसर्च केले आहेत.

असं मानलं जातं की, मेंदू शांत करणे आणि शरीर अॅक्टिव ठेवण्यासाठी थंड पाणी तर दिवसभराचा थकवा आणि अंगदुखी दूर करण्यासाठी गरम पाण्याने फायदा होतो. पण खरंच असं आहे का? किंवा वेगवेगळ्या आरोग्य स्थितीच्या आधारावर आंघोळीच्या पाण्याचं तापमान ठरवलं पाहिजे. क्वीवलॅंड क्लीनिकच्या रिपोर्टमध्ये एक्सरसाइज फिजिओलॉजिस्ट जॅच कार्टर यांनी थंड आणि गरम पाण्याने आंघोळ करण्याच्या फायद्यांबाबत सांगितलं आहे. 

थंड पाण्याने आंघोळ किती योग्य?

जगातल्या जास्तीत जास्त भागांमध्ये आंघोळीसाठी थंड पाण्याचा वापर करण्याचं चलन आहे. याचे अनेक प्रकारचे फायदे असल्याचं सांगितलं जातं. क्लीवलॅंड क्लीनिकच्या रिपोर्टमध्ये जॅच कार्टर याला इतकेही फायदेशीर मानत नाहीत. कार्टर सांगतात की,  थंड पाण्याने आंघोळ करणं काही स्थितींमध्ये आरोग्यासाठी गंभीर समस्येचं कारण ठरू शकतं. जर तुम्हाला हृदयरोगाची समस्या असेल तर थंड पाण्याने आंघोळ करणं नुकसानकारक ठरू शकतं. थंड पाण्याप्रति शरीराची प्रतिक्रिया तुमच्या हृदयावर अतिरिक्त दबाव टाकते. ज्याने हृदयाची धडधड अनियमित होऊ शकते. पण निरोगी लोकांनी शरीर अॅक्टिव ठेवण्यासाठी आणि ऊर्जा देण्यासाठी थंड पाण्याने नक्की आंघोळ करावी.

थंड पाण्याने आंघोळ करताना घ्या काळजी

जर तुम्हाला थंड पाण्याने आंघोळ करायची असेल तर तज्ज्ञ सांगतात की, यासाठी सर्वातआधी आपल्या शरीराला वेळ देणं आवश्यक आहे. अशावेळी खूप जास्त थंड पाणी न घेता आधी सुरूवात कमी थंड पाण्याने करा नंतर थंड पाणी घ्या. याची एक चांगली पद्धतही आहे. सर्वातआधी तुम्ही थंड पाणी पायांवर टाका जेणेकरून मेंदूपर्यंत हा संकेत पोहोचेल की, शरीराचं तापमान नियंत्रित झालं आहे. त्यानंतर थंड पाणी शरीरावर टाका. 

गरम पाण्याने आंघोळ करणं किती योग्य?

शरीराचा थकवा दूर करण्यासाठी भलेही लोक गरम पाण्याने आंघोळ करण्याची वकालत करत असतील. पण आरोग्य तज्ज्ञ याने संतुष्ट नाहीत. स्टॅनफोर्ट यूनिव्हर्सिटीमध्ये त्वचा विज्ञान विभागातील सहायक प्रोफेसर डॉ. गॉर्डन बे म्हणाले की, गरम पाण्याने आंघोळ करणं तुमच्या त्वचेसाठी चांगलं नाही. गरम पाण्याने त्वचेचा चिकटपणा दूर होतो. ज्यामुळे त्वचा कोरडी होते आणि इतरही अनेक समस्या होतात.

आंघोळीला कशा पाण्याचा करावा वापर?

डॉक्टर म्हणाले की, ज्या लोकांना एक्जिमा किंवा सोरायसिससारखी त्वचा संबंधी समस्या आहे. त्या लोकांसाठी गरम पाण्याने आंघोळ करणं अधिक नुकसानकारक ठरेल. याने खास वाढण्याचा धोकाही असतो. डॉ. गॉर्डन बे म्हणाले की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतील ताण कमी होतो आणि लालीही कमी होते. जर तुम्ही निरोगी आहात तर दररोज थंड पाण्याने आंघोळ करणं तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरेल.  अर्थातच थंड पाण्याने आंघोळ करणं गरम पाण्याने आंघोळ करण्यापेक्षा चांगला पर्याय आहे.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यFitness Tipsफिटनेस टिप्स