शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

Hello Doctor: पुनर्वसन स्त्री आरोग्याचे; कोविडग्रस्त महिलांना तपासल्यावर 'या' गोष्टी लक्षात आल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 1:42 AM

Women Health News: स्त्रियांबाबतीत या आजाराचे बरे होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक जास्त आहे, असा एक संशोधनात्मक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. तरीही रुग्णालयात कोविडग्रस्त महिलांना तपासल्यावर पुढील गोष्टी लक्षात आल्या.

डॉ. मधुरा उदय कुलकर्णीकोविड-१९ नावाच्या आजाराने जगभर दहशत पसरवली आहे. विशेषत: स्त्रियांना हा आजार झाल्यावर मन-शरीर, भावना साऱ्याच आरोग्याची, सहनशक्तीची परीक्षाच बघितली जाते आणि मग एकदाचे सारे सोपस्कार पार पडल्यावर पुढे काय, हा मोठाच यक्षप्रश्न उभा राहतो. स्त्रियांबाबतीत या आजाराचे बरे होण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक जास्त आहे, असा एक संशोधनात्मक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. तरीही रुग्णालयात कोविडग्रस्त महिलांना तपासल्यावर पुढील गोष्टी लक्षात आल्या.आजारानंतरचे काही दिवस जाणवणारी लक्षणेअशक्तपणा / थकवा/ कामकरण्याचा उत्साह कमी होणेपोटऱ्यांमध्ये गोळे येणेकंबरदुखी / हात - पाय दुखणेचक्कर येणे, थोडे काम केल्यावर धापएकाग्रतेचा अभाव / विसरायला होणेबोलताना उसका लागणे / कोरडा खोकलापचनशक्ती कमी होणेवजन कमी होणे / क्वचित वाढणेहॉर्माेन्सचे असंतुलनअकारण धडधड, चीडचीड इत्यादीभावनिक असमतोलाची लक्षणे

(या प्रकारची लक्षणे निर्माण होण्याची कारणे) - वैद्यकीयदृष्ट्या महिलांना या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर अल्प, मध्यम, गंभीर स्वरूपाची व्याधी निर्माण होते. सर्वसाधारणपणे १०-१२ दिवसांत आजाराची बाधा होऊन त्रास हळूहळू कमी होतो. सर्वसाधारणपणे १८ दिवसांनंतर आजाराचे प्रमाण कमी झाल्यावर पुनर्वसनाचा टप्पा पुढे येतो. शारीरिक त्रासांच्या कारणांना पाहता औषधाचे दुष्परिणाम, विषाणूचे संक्रमण इत्यादीमुळे मांसपेशीतील सूज, दुखणे उद्भवते. विविध पोषकांशांच्या, जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे काही लक्षणे निर्माण होतात.आथिक समस्या, एकटेपणा, सामाजिक संपर्काचा अभाव, मनाचा कमकुवतपणा यामुळे अनेक मानसिक लक्षणे उद्भवतात.लोह, कॅल्शियम इत्यादीच्या कमतरतेमुळे, कदाचित रुग्णालयातील क्वारंटाइन सेंटरमधील वातावरणामुळे, आजाराच्या दहशतीमुळे भावनिक अस्थिरता व त्यातून भावनात्मक बदल व त्रास दिसून येतात. आर्थिक असाहाय्यता - नोकरी - धंद्यावर अनुपस्थिती व दुर्लक्ष, वैद्यकीय खर्च यामुळे अर्थिक संकट उभे ठाकण्याची शक्यता तयार होते.पुनर्वसन सर्वांगीण आरोग्याचेवैद्यकीय सल्ला व तपासण्यांचे महत्त्व निर्विवाद आहे; म्हणूनच आजारानंतरही डॉक्टरांना नियमित भेटणे गरजेचे आहे.समुपदेशन व मानसिक आरोग्यासाठी योग्य ती मदत गरजेची असेल तर त्याचाही अवलंब करावा.स्वमदत तंत्र व नियोजनाची क्रमवार यादी- बºयाच स्त्रियांना स्वयंपाक करू की नको, माझ्या कुटुंबीयांना माझ्यामुळे संसर्ग तर होणार नाही ना?मला पुन्हा आजार होऊ शकतो का? अशा अनेक शंकांनी ग्रासलेले असते. त्यांच्यासाठी तर हे पुनर्वसन टप्पे खूप महत्त्वाचे आहेत -स्वीकार - पुन्हा काम करण्याचा आत्मविश्वास पावला-पावलांनी येईल. पुन्हा नव्याने सुरुवात करताना काही दिवस जातील, त्यासाठी मनाची तयारी करावी.गैरसमज योग्य शास्त्रीय ज्ञानाने दूर करावेत. सर्वसाधारपणे संसर्ग झाल्यावर १० दिवसांनंतर आपल्यापासून दुसºयांना त्रास होण्याची शक्यता कमी होते.हात स्वच्छ धुण्याची सवय ठेवा. मास्कचा वापर घरात वावरतानाही करावा. योग्य तेव्हा ग्लोव्हज् वापरा.योगसाधना, प्राणायाम, ध्यानाचा सराव, दीर्घ श्वसन, माफक व्यायाम याचा दैनंदिन जीवनशैलीत समावेश करावा.धूपन-घरामध्ये वेगवेगळ्या औषधींनी धूप करावा. (गुगुळ, अगरू, धूप इ. साहाय्याने.)खाण्या-पिण्याच्या सवयीतील बदल.सामाजिक जीवन हळूहळू सुरळीत करण्याचा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यानुसार काम सुरू करावे, आर्थिक पुनर्वसन होईलच.प्रत्येक अडचण ही काहीतरी नवीन बदलांची सुसंधी असते. आलेल्या या व्यतयांना, थांबलेल्या क्षणांना मनातील सकारात्मक विचारांच्या परीसस्पर्शाने सोन्याची झळाळी नक्कीच आणता येईल.हे टाळाब्रेड / बेकरीचे पदार्थलोणचे, पापड, तळलेलेमसालेदार पदार्थशिळे, फ्रिझमधले आंबवलेले पदार्थबाजारातून आणलेले कृृत्रिमरंगद्रव्ययुक्त पदार्थ.याचा वापर करा

मूठभर काळ्या मनुका पाण्यात भिजवून चावून खाणे. डाळिंब, खजूर, कोकम, खडीसाखर, साळीच्या लाह्या, लाल भोपळा, भाजलेले साठे, साळीचे तांदूळ, गहू-नाचणीचे सत्त्व, मूग-मटकी उसळी, सालीसकट डाळी, पोहे, राजगिरा, गूळ, शिंगाडे, जरदाळू, सुके अंजीर, ज्येष्ठमध + दूध, बेदाणे, साजूक तूप, भाज्यांचे सूप, तांदळाची पेज, सातू इ. पदार्थ जेवणात असावेत. विशेषत: स्त्रियांबाबतीत मानसिक, भावनिक तणावाचा परिणाम शरीरस्थ हार्मोन्सवर होऊन मासिक पाळीसंबंधी तक्रारी निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचा विशेष विचार व्हावा, तसेच घरातील स्त्रीचा कुटुंब, समाज आरोग्यावरही प्रभाव असतो. त्यामुळे स्त्री अरोग्याला महत्त्व देणे व कोरोनाबाधेनंतर पुनर्वसनाचे नियोजन करणे अपरिहार्य आहे.

(लेखिका एम.डी.स्त्रीरोग-प्रसूती तज्ज्ञ आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर