शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत तेलकट अन् गोड खाल्यानं वजन वाढलंय?; बॉडी डिटॉक्स करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

By manali.bagul | Updated: November 20, 2020 13:32 IST

Health Tips of weight loss in marathi : वजन वाढणं, जास्त तेलयुक्त पदार्थांमुळे छातीत कफ जमा होणं,  खोकला, चरबी वाढणं अशा समस्या उद्भवतात.

दिवाळीचा सण हा वर्षातून एकदाच येतो. त्यामुळे तुम्ही कितीही डाएट करायचं म्हटलं तरी जीभेवर आणि मनावर नियंत्रण ठेवता येतं नाही. काहीजणांनी नुकतंच डाएट सुरू केलेलं असतं, काहीजणांचे अनेक महिन्यापासून सुरू असते,  तर काहीजण वजन कमी करण्यासाठी कमी खाण्याच्या किंवा डाएट करण्याच्या विचारात असतात.  पण दिवाळीचा फराळ संपेपर्यंत काही डाएट फॉलो केलं जात नाही.  त्यामुळे वजन वाढणं, जास्त तेलयुक्त पदार्थांमुळे छातीत कफ जमा होणं,  खोकला, चरबी वाढणं अशा समस्या उद्भवतात. आज आम्ही तुम्हाला दिवाळीचा फराळ खाऊन वजन वाढलं असेल तर कोणत्या उपायांनी वजन नियंत्रणात ठेवायचं याबाबत सांगणार आहोत. 

वजन कमी करायचं असेल तर शरीरातलं प्रोटिन वाढवण्याची गरज असते. तुमच्या जेवणामध्ये अंडी, चिकन, डाळी, फळांचा समावेश करा. हे पदार्थ खाल्ल्यामुळे भूक नियंत्रणामध्ये येते आणि कॅलरीज् कमी होण्यासही मदत होते. या पदार्थांचा आहारात समावेश केल्यामुळे वजम कमी होण्यास मदत होते. याशिवाय अनेक रसांचा आहारात समावेश करून तुम्ही शरीर डिटॉक्स करू शकता. 

आवळ्याचा रस

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींना बूस्ट करण्याचे कार्य करते. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पांढऱ्या रक्त पेशींवरच अवलंबून असते. यामुळे शरीरामध्ये या पेशी पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. छोट्या असलेल्या या फळामुळे शरीर शुद्ध (Detox) होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. आवळ्यातील पोषकतत्त्वांमुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात. 

आयुर्वेदात आवळ्याचे अनेक उपयोग सांगितले आहेत. पित्तशामक, केशवर्धक, शक्तीवर्धक, निरोगी त्वचेसाठी आणि आता डायबेटिस, कॅन्सरसाठीही आवळ्याचे सेवन केले जाते. आवळ्यामध्ये असणारी औषधी गुणधर्म बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात. यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते. तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे कामही आवळा करतो.

काकडीचा रस

काकडीचा रस, लिंबाचा रस, साखर यांचं मिश्रण घेऊन थंड करून ते प्यावं. उन्हात येणाऱ्या घामामुळे शरीरातील क्षारांची संख्या कमी होते. म्हणून काकडीचा ज्यूस हा नेहमीच उपयोगाचा असतो. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. जर तुम्हाला  रस बनवण्याचे कष्ट नको असतील तर तुम्ही काकडी धुऊन त्याचे काप करून खाऊ शकता. या फोडींना मीठ व मिरी पावडर लावल्यास त्या चवदार-चविष्ट होतील. शरीरातील विषारी घटक निघून जाण्यासाठी तसंच अन्न पचन होण्यासाठी काकडीचा रस फायदेशीर ठरतो.

इम्यूनिटी वाढवण्यासाठी रोज 'या' ३ गोष्टी वापरत असाल; तर वेळीच सावध व्हा

दालचीनी आणि मध

शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी एक कप उकळलेल्या पाण्यात दालचीनी आणि मध घाला. २० मिनिटं असंच राहू द्या. त्यानंतर  गॅस बंद करा. सकाळच्या नाष्त्याच्या अर्धा तास आधी या चहाचे सेवन करा. या डिटॉक्स ड्रिंकमुळे तुम्हाला ताजतवान झाल्याप्रमाणे वाटेल.

व्यायाम करतेवेळी मास्क वापरल्याने फुफ्फुसांवर 'असा' होतो परिणाम; तज्ज्ञांचा खुलासा

बीटाचा रस

बीट हा लोह आणि व्हिटामीन्सचा खनिजा आहे. बीटरूट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात. त्यासाठी  १०० मिली बीटाचा रस घ्या. त्यात २५ मिली गाजराचा रस आणि २५ मिली टोमॅटोचा रस मिसळा. त्यात १/2 चमचे लिंबाचा रस घाला व चवीनुसार काळे मिठ देखील व्यवस्थित घालावे. दररोज हे एकदा पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. 

(टिप : वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सDiwaliदिवाळीHealthआरोग्य