शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

अंगदुखी लगेच दूर करण्यासाठी आंघोळीची ही पद्धत वापरा, थकवाही लगेच होईल दूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 16:42 IST

Health Tips : हा थकवा घालवण्यासाठी किंवा अंगदुखी दूर करण्यासाठी अनेक उपाय आहेत. पण आज आम्ही तुम्हाला सर्वात सोपा आणि तुम्हाला आवडेल असा उपाय सांगणार आहोत.

Health Tips : अलिकडे वाढलेला कामाचा ताण, प्रवासाचा वेळ, घरातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमुळे वाढलेलं प्रेशर याने व्यक्तीला अधिक मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवतो. याचा परिणाम म्हणजे कमी वयातच वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. सतत अंगदुखी, थकवा, मूड नसणे अशाही समस्या होतात. आता हा थकवा घालवण्यासाठी किंवा अंगदुखी दूर करण्यासाठी अनेक उपाय आहेत. पण आज आम्ही तुम्हाला सर्वात सोपा आणि तुम्हाला आवडेल असा उपाय सांगणार आहोत.

वेगळ्या पद्धतीने आंघोळ करा

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, थकवा आणि बॉडी पेन दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला आंघोळ करण्याचा सल्ला देत आहोत. पण ही आंघोळ तुम्ही रोज करता तशी अजिबात नाही. अंगदुखी, कणकण, आणि थकवा दूर करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात काही हर्बल टाकावे लागतील. याने तुमच्या तणाव, जळजळ आणि थकवा लगेच दूर होईल. 

कशी करावी आंघोळ?

- हर्ब बाथ करण्यासाठी तुम्ही कोणतेही हर्बल निवडू शकता. जसे की, लॅवेंडर, पेपरमिंट, रोजमेरी आणि ओवा. जर तुमच्याकडे हा गोष्टी लिक्विड स्वरूपात असतील तर हे २५ ३० मिली लिटर घ्या. पण जर हे हर्ब तुमच्याकडे ड्राय स्वरूपात असतील तर तुम्ही बकेटीत ३ ते ४ चमचे टाकू शकता. 

- जर तुमच्याकडे ड्राय हर्ब असतील तर तुम्ही एक लिटर पाण्यात ते टाका. हे पाणी उलडू द्या आणि नंतर २० मिनिटे तसंच राहू द्या. 

- आता हे पाणी गाळून आंघोळीच्या पाण्यात मिश्रित करा. हे लक्षात ठेवा की, जेव्हाही तुम्ही थकलेले असाल तेव्हा पाणी फार जास्त गरम घेऊ नका. आंघोळीचं पाणी कोमटच असावं. कारण याने शरीरात ब्लड सर्कुलेशन वाढवण्यास आणि नर्ब्सना रिलॅक्स करण्याचं काम करतं.

दुसरा उपाय

एक लिटर पाणी घ्या आणि त्याला उकडी येऊ द्या. या पाण्यात लॅवेंडर किंवा लेमन असेंशिअल ऑइल मिश्रित करा. सोबतच ५ चमचे गुलाबजल मिश्रित करा. आता हे पाणी आंघोळीच्या पाण्यात मिश्रित करा. याने आंघोळ केल्यावर तुमचे मसल्स रिलॅक्स होतील आणि अंगदुखीही दूर होईल. हे उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करू शकता.

तिसरा उपाय

आंघोळीच्या पाण्यात थोडं सेंधं मीठ घातल्यास याने त्वचेचं ब्लड सर्कुलेशन सुधारतं आणि त्वचा आतून ग्लो व्हायला लागते. एक बकेट पाण्यात एक चमचा सेंधं मीठ टाकून त्या पाण्याने आंघोळ करा. तसेच जास्तीत जास्त लोक हे मीठ केवळ खाण्यातच वापरतात, पण मीठ जर पाण्यात टाकून त्या पाण्याने आंघोळ केली तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला बघायला मिळतील.

यात आढळणाऱ्या मॅग्नेशिअम, सोडियम आणि कॅल्शिअमसारख्या मिनरल्सने शरीराला होणाऱ्या इन्फेक्शनपासून बचाव केला जाऊ शकतो. मिठाच्या पाण्यात असलेल्या तत्वांमुळे फंगल इन्फेक्शन वाढणं बंद होतं. तसेच रोज या आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यास याने केसांमध्ये डॅड्रफही होणार नाही.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य