शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

रात्री जेवणानंतर लगेच ढाराढूर झोपता? जेवण आणि झोप यामध्ये किती अंतर असावे; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 13:39 IST

जेवल्यानंतर तुम्ही लगेचच झोपी जात असाल तर आजच ही सवय बदला नाहीतर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Health Tips : रोजची धावपळ आणि कामाचा थकवा त्यामुळे बऱ्याचदा काही लोकांना रात्री जेवण केल्यानंतर लगेचच झोपी जाण्याची सवय असते. झोप पूर्ण करण्याच्या प्रयत्नात ते जेवण केल्यानंतर लगेच ढाराढूर झोपतात. मस्त जेवणावर ताव मारून खुशाल झोपायचं म्हणजे स्वर्गसुख असा त्यांचा समज आहे. रिपोर्टनुसार, असं करणं चुकीच आहेच शिवाय आपल्या आरोग्यावर त्याचे नळतपणे दुष्परिणाम होतात. 

तज्ज्ञांच्या मते, जेवल्यानंतर लगेच झोप येणे किंवा झोपी जाणे हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय वाईट आहे. त्यामुळे पचनक्रियेचा वेग मंदावतो तसेच लठ्ठपणा वाढतो. 

या गंभीर समस्या उद्भवू शकतात-

१) पचनक्रिया कमजोर होते-

जेवल्यानंतर लगेचच झोपल्याने त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. शिवाय त्यामुळे अन्नाचे पचन मंद होते आणि पोटभर जेवून लगेच झोपल्यास अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. एवढेच नाही तर त्यामुळे गॅस आणि अ‍ॅसिडिटी होऊ शकते. 

२) अनिद्रा-

रात्री झोपल्यानंतर आपल्या शरीरात आम्लपित्त तयार होतं. त्यामुळे आंबट ढेकर, छातीत जळजळ होते. त्यामुळे आपली झोपमोड होऊ शकते. 

३) वजन वाढते-

शरीरातील कॅलरीज बर्न होत नसल्याने वजन वाढण्याची समस्या भेडसावते.आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानूसार, रात्रीचे जेवण केल्यानंतर जवळपास अर्धा तास मोकळ्या हवेत फेरफटका मारावा. त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. 

जेवणे आणि झोपणे यात नेमके किती तासांचे अंतर असावे ? 

न्यूट्रिशननिस्टच्या मते, रात्री जेवण केल्यानंतर ३ तासानंतरच झोपावे. तसेच विशेष म्हणज जर आपण हेव्ही म्हणजेच जास्तच तिखट, तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ले असतील तर ३ तासांपूर्वी अजिबात झोपू नये.  तसेच जेवल्यानंतर काही वेळ वज्रासनात बसावे, त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते आणि आम्लपित्ताचा त्रास होत नाही. याचबरोबर रात्रीचे जेवण जरा हलके असावे. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सLifestyleलाइफस्टाइल