शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

सावधान! उभे राहून पाणी पिताय? होतील हे दुष्परिणाम; वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 15:37 IST

दैनंदिन जीवनात अगदी छोट्या छोट्या सवयीही आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात.

Health Tips : दैनंदिन जीवनात अगदी छोट्या छोट्या सवयीही आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. आरोग्य नीट राखायचे असेल तर काही पथ्ये पाळावीच लागतात.

आजकाल लोक बाटलीतील पाणी पिण्यास प्राधान्य देत आहेत. तसेच ते उभे असताना पाणी पितात. असे करणे आरोग्यासाठी अजिबात चांगले मानले जात नाही. बऱ्याचदा आपण पाहिले असेल काही जण नेहमीच पाणी पिताना बसून पाणी पितात. तर काहींना उभे राहून पाणी पिण्याची सवय असते. पण या सवयीमुळे आपलेच नुकसान होते.  आयुर्वेदात असे म्हटले आहे की, उभे राहून किंवा झोपून कधीही पाणी पिऊ नये, त्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे पोटाच्या समस्याही वाढू शकतात. 

जर तुम्ही चालताना उभे राहून पाणी पीत असाल तर काळजी घ्या, कारण या स्थितीत पाणी पिल्याने तुम्ही तुमच्या आरोग्याशी खेळत आहात. यामुळे तुम्हाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. उभे राहून किंवा झोपून पाणी पिणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. बसून  आरामात पिणे पाणी उत्तम आहे. यामुळे शरीरातील सर्व महत्त्वाच्या अवयवांपर्यंत पाणी पोहोचते आणि आपले काम योग्य प्रकारे करू शकते. 

उभे राहून पाणी पिण्याचे तोटे पुढीलप्रमाणे:  

मूत्रपिंडांवर होतो परिणाम-

मूत्रपिंडाच्या रुग्णांनी उभे राहून पाणी पिऊ नये. हे देखील उभे राहून पाणी पिण्याचे दुष्परिणाम आहेत. उभे राहून पाणी प्यायल्याने सांध्यांचा त्रास होऊ शकतो. जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पितात तेव्हा पाणी शरीराच्या खालच्या भागात लवकर पोहोचते आणि पचनक्रिया बिघडू लागते म्हणून उभे राहून कधीही पाणी पिऊ नये आणि बसून पाणी पिणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

तज्ज्ञांच्या दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना किडणीच्या संबंधित काही असेल त्यांनी उभे राहून पाणी पिणे टाळावे. कारण उभे राहून पाणी प्यायल्याने मुत्रपिंडाला हानी पोहचू शकते. त्यामुळे आरामात एका जागेवर बसून पाणी प्यावे.

पचनसंस्थेवर होतो परिणाम -

उभे राहून पाणी प्यायल्याने पोटात गॅस तयार होतो, पचनसंस्थेवर दबाव येतो आणि शरीरात पाण्याचे असंतुलन होते. त्यामुळे बसून हळू हळू पाणी प्यावे. पण जर आपण उभं राहून पाणी पीत असाल तर, पाणी पोटाच्या खालच्या भागात पोहोचते, ज्यामुळे पचनसंस्थेला हानी पोहोचते. त्यामुळे नेहमी बसून पाणी प्यावे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWaterपाणीHealthआरोग्य