शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

जीवघेणं ठरू शकतं डिहायड्रेशनच्या समस्येकडे दुर्लक्ष करणं; आजंच जाणून घ्या सोपे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 11:09 IST

शरीरातील तापमान सामान्य ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर डिडायड्रेशनचा धोका वाढू शकतो. 

सध्या पावसाला सुरूवात झाली  आहे. तरी ऊन तर कधी पाऊन असे बदल वातावरणात दिसून येत आहेत. दमट हवामामुळे लोकांमध्ये डिहायड्रेशनची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहे.  यात घाबरण्यासारखं काही नाही पण दुर्लक्ष केल्यास शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला डिहायड्रेशनचे दुष्परिणाम तसंच शरीराला डिहायड्रेट होण्यापासून कसं वाचवता येईल याबाबत सांगणार आहोत. 

डिहायड्रेशन म्हणजेच पाण्याची कमतरता : 

शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळे ही स्थिती उद्भवते. घामाद्वारे, मुत्राद्वारे, मलाद्वारे  शरीरातून पाणी बाहेर येत असते. शरीरातील तापमान सामान्य ठेवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर डिडायड्रेशनचा धोका वाढू शकतो. 

डिहायड्रशेन झाल्यास वेळेवर वेळेवर औषधं न घेतल्यास हीट स्ट्रोकचा धोका असतो. गंभीर स्थितीत मृत्यूचा सामनाही करावा लाागू शकतो. शरीरातील काही लक्षणांकडे लक्ष देणं गरजेंच आहे. डोळ्यांसमोर अंधार येणं, सतत चक्कर येणं ही डी हायड्रेशनची लक्षणं आहेत. 

शरीरात योग्य प्रमाणात पाणी नसेल तर त्वचा कोरडी पडते. ओठ फाटायला सुरूवात होते. कमीत कमी ४ तासांच्या आत तुम्ही लघवी करण्यास जायला हवं.  लघवीला न गेल्यास ही डिहाड्रेशनची समस्या असू शकते.  महिलांनी कमीत कमी २.५ लीटर आणि पुरूषांनी ३ लीटर पाणी कमीतकमी प्यायला हवं. ३ ते ४ बाटल्या पाणी प्यायल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं. 

जर तुम्हाला सतत तहान लागल्यासारखे वाटत नसेल तर तुम्ही पाण्याचे योग्य प्रमाणात सेवन करत असाल. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी द्रवपदार्थांचे सेवन करायला हवं. डिहायड्रेशन असलेल्या व्यक्तींनी लिंबू पाणी, नारळपाणी, ताक या पदार्थांचे सेवन करायला हवे. जर तुम्ही रोज व्यायाम करत असाल तर  १५ ते २० मिनिटांनंतर सेवन करणं गरजेचं आहे.  डिहाड्रेशनची समस्या उद्भवल्यास सगळ्यात आधी दिर्घ श्वास घ्या. शरीराला आराम द्या.

माऊथवॉशचा वापर करा; कोरोनाचा संसर्ग टाळा

भारताने शोधले कोरोनाचे उपचार; 'या' औषधांनी बरे होत आहेत रुग्ण, आईसीएमआरची परवानगी 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य