शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
2
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
3
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
4
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
5
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
6
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
7
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
8
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
9
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
10
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
11
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
12
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
13
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
14
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
15
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
16
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
17
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
18
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
19
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
20
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस

फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या चपातीचे हे आहेत दुष्परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 11:49 IST

भलेही तुम्ही कणिच चांगली राहण्यासाठी ठेवता पण फ्रिजचं तापमान खूप कमी असल्याने या कणकेमध्ये अनेकप्रकारचे बॅक्टेरिया आणि धोकादायक केमिकल्स तयार होतात. 

(Image Credit: www.doctorshealthpress.com)

आजच्या धावपळीच्या जीवनात सकाळी लवकर ऑफिसला जाता यावं किंवा सकाळी उशीर होऊ नये म्हणून रात्रीच सकाळची बरीच तयारी करून ठेवली जाते. त्यात कणिकही रात्री मळून फ्रिजमध्ये ठेवली जाते. जेणेकरून वेळ वाचावा. पण मळून फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेमुळे तुम्हाला अनेक आरोग्यासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. भलेही तुम्ही कणिच चांगली राहण्यासाठी ठेवता पण फ्रिजचं तापमान खूप कमी असल्याने या कणकेमध्ये अनेकप्रकारचे बॅक्टेरिया आणि धोकादायक केमिकल्स तयार होतात. 

काय होऊ शकते समस्या?

१) फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या चपात्या भलेही तुम्हाला चवीला चांगल्या लागत असतील, पण यामुळे तुम्हाला पोटासंबंधी अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो.  

२) फ्रिजमधील कणकेच्या चपात्या खाल्याने पोटदुखीची समस्या होऊ शकते. त्यामुळे असे करणे शक्यतो टाळा.

३) पचनक्रिया बिघडणे आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यामागेही फ्रिजमध्ये ठेवलेली कणिक वापरणे हे कारण असू शकतं. 

फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भातही हानिकारक

भात हा रूम टेम्प्रेचरमध्ये किंवा तो पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्यात असणारे बॅक्टेरिया अधिक वाढतात. यामुळे भात खराब होता. त्यामुळे जास्त शिळा भात खाल्याने डायरिया, उल्टी, पोटदुखी, फूड पॉयझनिंग इत्यादी समस्या होऊ शकतात. 

थकवा आणि आळस

शिळं अन्न खाल्याने तुम्हाला थकवा आणि आळस येऊ शकतो. अन्न खराब होऊ नये म्हणून तुम्ही ते फ्रिजमध्ये ठेवता पण तापमान कमी असल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात. जेवण करण्याचा मुख्य उद्देशच हे पोषक तत्व मिळवणे आहे. जे तुम्हाला दिवसभर काम करण्याची ऊर्जा देतात. पण शिळं फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न खाल्यास ते  शरीराला मिळत नाहीत.  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य