शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीही उभं राहून पाणी पिता का? एक चूक ठरू शकते अत्यंत घातक; जाणून घ्या, य़ोग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 15:10 IST

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?, उभे राहून किंवा बसून पाणी पिणे फायदेशीर आहे का? असे प्रश्न अनेकांना पडले असतील.

पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. शरीरात सुमारे 60 ते 70 टक्के पाणी असते. आपले शरीर जगण्यासाठी पाण्यावर अवलंबून असतं. शरीरातील सर्व सेल्स, टिश्यू आणि अवयवांना योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. प्रत्येकाने दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?, उभे राहून किंवा बसून पाणी पिणे फायदेशीर आहे का? असे प्रश्न अनेकांना पडले असतील. असे मानले जाते की उभे राहून पाणी पिऊ नये, अन्यथा शरीराला इजा होते. शेवटी ही गोष्ट किती खरी आहे हे जाणून घेऊया.

नवी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलच्या प्रिवेंटिव्ह हेल्थ डिपार्टमेंटच्या डायरेक्टर डॉ. सोनिया रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, उभे राहून किंवा झोपून राहून पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे अगदी खरे आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्व लोकांनी बसून पाणी प्यावे. उभे राहून पाणी प्यायल्याने पाण्यातील मिनरल्स डाइजेस्टिव सिस्टमपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि ऍसिड रिफ्लक्सची समस्या उद्भवू शकते. ज्यांना अपचन, बद्धकोष्ठता किंवा एसिडिटीचा त्रास होतो.  लोकांनी बसून पाणी प्यावे.

डॉ.सोनिया रावत सांगतात की, उभे राहून पाणी प्यायल्याने किडनी आणि लिव्हरचे नुकसान होऊ शकते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडू शकते. किडनी शरीरात फिल्टरसारखे काम करते आणि त्याच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे शरीराची संपूर्ण यंत्रणा बिघडू शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने फुफ्फुस आणि हृदयाचेही नुकसान होते. यामुळे सांधेदुखी आणि हाडांच्या इतर समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्याने मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि तुम्हाला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

पाणी नेहमी बसून आणि आरामात प्यावे. जर तुम्ही खूप वेगाने पाणी प्याल तर त्याचा कमी फायदा होईल. पाणी हळू हळू पिऊन पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. असे केल्याने इलेक्ट्रोलाइटचे संतुलन चांगले राहते आणि शरीराला आवश्यक मिनरल्स मिळतात. आपण बाटली किंवा ग्लासमधून पाणी पिऊ शकता. एका दिवसात पाण्याचे प्रमाण 2-3 लिटर असावे. पाणी शरीरातील हायड्रेशन राखते आणि सर्व अवयव निरोगी ठेवते असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स