शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीही उभं राहून पाणी पिता का? एक चूक ठरू शकते अत्यंत घातक; जाणून घ्या, य़ोग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 15:10 IST

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?, उभे राहून किंवा बसून पाणी पिणे फायदेशीर आहे का? असे प्रश्न अनेकांना पडले असतील.

पाणी आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. शरीरात सुमारे 60 ते 70 टक्के पाणी असते. आपले शरीर जगण्यासाठी पाण्यावर अवलंबून असतं. शरीरातील सर्व सेल्स, टिश्यू आणि अवयवांना योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. प्रत्येकाने दररोज 2 ते 3 लिटर पाणी प्यावे. पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?, उभे राहून किंवा बसून पाणी पिणे फायदेशीर आहे का? असे प्रश्न अनेकांना पडले असतील. असे मानले जाते की उभे राहून पाणी पिऊ नये, अन्यथा शरीराला इजा होते. शेवटी ही गोष्ट किती खरी आहे हे जाणून घेऊया.

नवी दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलच्या प्रिवेंटिव्ह हेल्थ डिपार्टमेंटच्या डायरेक्टर डॉ. सोनिया रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, उभे राहून किंवा झोपून राहून पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे अगदी खरे आहे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी सर्व लोकांनी बसून पाणी प्यावे. उभे राहून पाणी प्यायल्याने पाण्यातील मिनरल्स डाइजेस्टिव सिस्टमपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत. यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि ऍसिड रिफ्लक्सची समस्या उद्भवू शकते. ज्यांना अपचन, बद्धकोष्ठता किंवा एसिडिटीचा त्रास होतो.  लोकांनी बसून पाणी प्यावे.

डॉ.सोनिया रावत सांगतात की, उभे राहून पाणी प्यायल्याने किडनी आणि लिव्हरचे नुकसान होऊ शकते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडू शकते. किडनी शरीरात फिल्टरसारखे काम करते आणि त्याच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे शरीराची संपूर्ण यंत्रणा बिघडू शकते. उभे राहून पाणी प्यायल्याने फुफ्फुस आणि हृदयाचेही नुकसान होते. यामुळे सांधेदुखी आणि हाडांच्या इतर समस्या उद्भवू शकतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चुकीच्या पद्धतीने पाणी पिल्याने मज्जासंस्थेवर परिणाम होतो आणि तुम्हाला गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

पाणी नेहमी बसून आणि आरामात प्यावे. जर तुम्ही खूप वेगाने पाणी प्याल तर त्याचा कमी फायदा होईल. पाणी हळू हळू पिऊन पिणे खूप फायदेशीर ठरू शकते. असे केल्याने इलेक्ट्रोलाइटचे संतुलन चांगले राहते आणि शरीराला आवश्यक मिनरल्स मिळतात. आपण बाटली किंवा ग्लासमधून पाणी पिऊ शकता. एका दिवसात पाण्याचे प्रमाण 2-3 लिटर असावे. पाणी शरीरातील हायड्रेशन राखते आणि सर्व अवयव निरोगी ठेवते असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :WaterपाणीHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स