शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Health Care: ऋतुमानानुसार आपल्या आहारात बदल कराल, तर आजारी कमी पडाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 13:31 IST

Health Care Tips: नुकताच ज्येष्ठ मास सुरु झाला आणि पावसाचीही सुरुवात झाली, सृष्टीत होणाऱ्या या बदलांसाठी शरीराची साथ मिळावी म्हणून दिलेले नियम पाळा!

पावसाळा सुरु होतो ना होतो, लगेच सर्दी खोकल्याचे आवाज, बामाचे वास आणि दवाखान्याबाहेर रांगा सुरू होतात. याचं कारण म्हणजे आपली इम्युनिटी अर्थात रोग प्रतिकार शक्ती कमकुवत झाली आहे. ती सुदृढ करण्यासाठी ऋतुमानानुसार आहारात आवश्यक बदल केले पाहिजेत. म्हणून पुढे दिलेले आहार नियम पाळा आणि आजार टाळा. 

चैत्र (मार्च-एप्रिल) – या महिन्यात गुळाचे सेवन करा. कारण गुळामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि तुमचे रक्त शुद्ध होते. अनेक रोगांपासून रक्षण होते. चैत्र महिन्यात कडुलिंबाची ४-५ मऊ पानेही रोज वापरावीत. कडुलिंबाची पाने चघळल्याने शरीरातील दोष दूर होतात.

वैशाख (एप्रिल-मे)- वैशाख महिन्यात उन्हाळा सुरू होतो. या महिन्यात बेल पत्राचा अवश्य वापर करावा, ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहील. वैशाख महिन्यात तेलकट पदार्थ कमी खा, कारण त्यामुळे तुमचे शरीर ते पचवू शकत नाही. 

ज्येष्ठ (मे-जून) – हा महिना भारतातील सर्वात उष्ण आहे. ज्येष्ठ महिन्यात दुपारी झोपणे आरोग्यासाठी फायदेशीर असते, थंड ताक, लस्सी, ज्यूस आणि शक्य तेवढे पाणी सेवन करावे. शिळे अन्न, जड अन्न आणि गरम पदार्थ खाऊ नका. कारण ते आजाराला आमंत्रण ठरते. 

आषाढ (जून-जुलै) – आषाढ महिन्यात आंबा, जुना गहू, सत्तू, जव, तांदूळ, खीर, थंड पदार्थ, काकडी इत्यादींचा वापर करा आणि पावसाळा सुरु झाल्यामुळे तेलकट पदार्थ चालू शकतील पण त्याचा अतिरेक झाला तर पोटबिघाड होईल. 

श्रावण (जुलै-ऑगस्ट) – श्रावण महिन्यात फळभाज्यांवर भर द्या. पालेभाज्या आणि दुधाचा वापर कमी करा. अन्न सेवनाचे प्रमाण कमी करा - जुना तांदूळ, जुना गहू, खिचडी, दही आणि पचायला हलके अन्न घ्या.

भाद्रपद (ऑगस्ट-सप्टेंबर) – या महिन्यात हलके आणि सहज पचणारे अन्न खावे, पावसाळ्यामुळे पचनशक्तीही मंदावते, त्यामुळे सहज पचणारे अन्न खा.  या काळात उत्सव असल्याने गोड धोड खाताना पथ्य सांभाळा आणि प्रमाणात खा. 

आश्विन (सप्टेंबर-ऑक्टोबर) – या महिन्यात  दूध, तूप, गूळ, नारळ, सुकी द्राक्षे, कोबी इत्यादींचे सेवन करू शकता. हे जड अन्न आहे पण तरीही या महिन्यात पचते कारण या महिन्यात आपली पचनशक्ती मजबूत असते. 

कार्तिक (ऑक्टोबर-नोव्हेंबर) – कार्तिक महिन्यात गरम दूध, गूळ, तूप, साखर, मुळा इत्यादींचा वापर करा.  थंड पेये वापरणे थांबवा. ताक, लस्सी, थंड दही, थंड फळांचा रस इत्यादी सेवन करू नका, यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते.

पौष (डिसेंबर-जानेवारी) – या ऋतूत दूध, पनीर, खवा, गोंद लाडू, गूळ, तीळ, तूप, बटाटा, आवळा इत्यादीपासून बनवलेले पदार्थ खावेत, या गोष्टी तुमच्या शरीराला स्निग्धता देतील. थंड अन्न, शिळे अन्न पचण्यास जड जाईल. 

माघ (जानेवारी-फेब्रुवारी) – या महिन्यात तुम्ही गरम आणि जड अन्नही घेऊ शकता. तूप, नवीन धान्य, गोंड लाडू इत्यादींचा वापर करता येतो.

फाल्गुन (फेब्रुवारी-मार्च) – या महिन्यात गुळाचा वापर करा. सकाळी योगासने आणि आंघोळीचा नित्यक्रम करा. हरभरा वापरू नका.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthy Diet Planआहार योजना