शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

विश्वास बसणार नाही! जिभेचे चोचले नव्हे तर आरोग्यासाठी उत्तम आहे पाणीपुरी, जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 17:50 IST

घरी केलेली असेल किंवा भय्याकडची. पाणीपुरीचा आस्वाद घेणं हा एक वेगळाच आनंद असतो. पण, जिभेचे चोचले पुरवण्यासोबत पाणीपुरी खाणं हे तब्येतीसाठी देखील फायदेशीर ठरतं.

पाणीपुरी हा तमाम खवय्यांचा अत्यंत लाडका पदार्थ. वाटाण्याचा रगडा, त्यावर चिंच-गूळ घालून केलेली खजूर चटणी आणि तिखट चवीच्या पाण्याने टम्म भरलेली पाणीपुरी पाहून भलेभले पाघळतात. घरी केलेली असेल किंवा भय्याकडची. पाणीपुरीचा आस्वाद घेणं हा एक वेगळाच आनंद असतो. पण, जिभेचे चोचले पुरवण्यासोबत पाणीपुरी खाणं हे तब्येतीसाठी देखील फायदेशीर ठरतं.

पाणीपुरीच्या सेवनाने वजन कमी करण्यासाठी पाणीपुरी फायदेशीर ठरू शकते. पाणीपुरी खाल्ल्याने तुमचं पोट भरलेलं राहतं. तुमची कॅलरीजची गरज भागते आणि बऱ्याच काळासाठी तुम्हाला पुन्हा भूक लागत नाही. पण, फक्त पाणीपुरी न खाता त्यासोबत थोडा व्यायाम आणि चालणं हे गरजेचं आहे.

पाणीपुरी खाल्ल्याने तोंड येण्याची समस्याही दूर होते. पाणीपुरीच्या पाण्यात असलेला जलजीरा आणि पुदीना यांमुळे तोंड येण्याची समस्या दूर होते. तसंच, पाणीपुरी खाल्ल्याने अ‍ॅसिडीटीचा त्रासही नियंत्रणात येतो. त्यासाठी पाणीपुरीच्या पाण्यात पुदीना, कैरी, सैंधव, मिरी, जिरेपूड आणि मीठ असं मिश्रण असणं गरजेचं आहे.

पाणीपुरीत नेहमीच्या मिठाऐवजी सैंधवाचा वापर केल्यास गॅसच्या समस्येपासूनही सुटका होते. तसंच पाणीपुरी खाल्ल्याने मूडही रिफ्रेश होतो. पचनक्रियेसाठीही मदत मिळते. पण, पाणीपुरी खाण्याने काही नुकसानही होऊ शकतं.

अस्वच्छ जागी किंवा अतिसेवनामुळे डायरिया, उल्टी, हगवण, अल्सर किंवा कावीळ होऊ शकते. पोटदुखीची समस्याही होऊ शकते. ज्यांना मीठ उपयुक्त नाही अशांना रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे पाणीपुरी शक्यतो घरी बनवावी. रव्याऐवजी पिठाच्या पुऱ्या खाव्यात. आतल्या सारणासाठी रगडा किंवा मूगच वापरावेत. तसंच ज्यांना लाल चटणी चालत नाही त्यांनी दह्याचा वापर करावा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स