शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास बसणार नाही! जिभेचे चोचले नव्हे तर आरोग्यासाठी उत्तम आहे पाणीपुरी, जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 17:50 IST

घरी केलेली असेल किंवा भय्याकडची. पाणीपुरीचा आस्वाद घेणं हा एक वेगळाच आनंद असतो. पण, जिभेचे चोचले पुरवण्यासोबत पाणीपुरी खाणं हे तब्येतीसाठी देखील फायदेशीर ठरतं.

पाणीपुरी हा तमाम खवय्यांचा अत्यंत लाडका पदार्थ. वाटाण्याचा रगडा, त्यावर चिंच-गूळ घालून केलेली खजूर चटणी आणि तिखट चवीच्या पाण्याने टम्म भरलेली पाणीपुरी पाहून भलेभले पाघळतात. घरी केलेली असेल किंवा भय्याकडची. पाणीपुरीचा आस्वाद घेणं हा एक वेगळाच आनंद असतो. पण, जिभेचे चोचले पुरवण्यासोबत पाणीपुरी खाणं हे तब्येतीसाठी देखील फायदेशीर ठरतं.

पाणीपुरीच्या सेवनाने वजन कमी करण्यासाठी पाणीपुरी फायदेशीर ठरू शकते. पाणीपुरी खाल्ल्याने तुमचं पोट भरलेलं राहतं. तुमची कॅलरीजची गरज भागते आणि बऱ्याच काळासाठी तुम्हाला पुन्हा भूक लागत नाही. पण, फक्त पाणीपुरी न खाता त्यासोबत थोडा व्यायाम आणि चालणं हे गरजेचं आहे.

पाणीपुरी खाल्ल्याने तोंड येण्याची समस्याही दूर होते. पाणीपुरीच्या पाण्यात असलेला जलजीरा आणि पुदीना यांमुळे तोंड येण्याची समस्या दूर होते. तसंच, पाणीपुरी खाल्ल्याने अ‍ॅसिडीटीचा त्रासही नियंत्रणात येतो. त्यासाठी पाणीपुरीच्या पाण्यात पुदीना, कैरी, सैंधव, मिरी, जिरेपूड आणि मीठ असं मिश्रण असणं गरजेचं आहे.

पाणीपुरीत नेहमीच्या मिठाऐवजी सैंधवाचा वापर केल्यास गॅसच्या समस्येपासूनही सुटका होते. तसंच पाणीपुरी खाल्ल्याने मूडही रिफ्रेश होतो. पचनक्रियेसाठीही मदत मिळते. पण, पाणीपुरी खाण्याने काही नुकसानही होऊ शकतं.

अस्वच्छ जागी किंवा अतिसेवनामुळे डायरिया, उल्टी, हगवण, अल्सर किंवा कावीळ होऊ शकते. पोटदुखीची समस्याही होऊ शकते. ज्यांना मीठ उपयुक्त नाही अशांना रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे पाणीपुरी शक्यतो घरी बनवावी. रव्याऐवजी पिठाच्या पुऱ्या खाव्यात. आतल्या सारणासाठी रगडा किंवा मूगच वापरावेत. तसंच ज्यांना लाल चटणी चालत नाही त्यांनी दह्याचा वापर करावा.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स